शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानच्या अधिकाऱ्याचा फोन चीनच्या विमानतळावर चोरीला गेला; अणुऊर्जा प्रकल्पांसह अत्यंत गोपनीय माहिती लीक होण्याचा धोका...
2
डोनाल्ड ट्रम्प यांची तेल कंपन्यांसोबत बैठक, अमेरिका भारताला व्हेनेझुएलाचे तेल देण्यास तयार; पण एका अटीवर...
3
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
4
भयंकर प्रकार! 'द राजा साब'च्या स्क्रीनिंगदरम्यान प्रभासच्या चाहत्यांनी कागदाचे तुकडे जाळले, व्हिडीओ व्हायरल
5
बांगलादेशात नव्या युगाची नांदी! खालिदा जिया यांच्यानंतर आता सुपुत्र तारिक रहमान यांच्याकडे बीएनपीची धुरा
6
आजचे राशीभविष्य १० जानेवारी २०२६ : धनु राशीला पदोन्नतीचे योग, तर तूळ राशीने राहावे सतर्क; वाचा काय सांगते तुमचे नशीब!
7
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
8
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
9
विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
10
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
11
अजित पवारांची मिळाली साथ; अंबरनाथमध्ये शिंदेसेनेने भाजपचे ‘सत्तास्वप्न’ लावले उधळून
12
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
13
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
14
ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात
15
आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ
16
सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर
17
राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले
18
तीन वर्षांत किती बांगलादेशींना पकडून मायदेशी परत पाठवले? काँग्रेसचा सवाल; भाजपचा दावा फसवा
19
कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई
20
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: भारत सरकार ‘अद्याप’ पाकिस्तानचे नाव का घेत नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 05:44 IST

Delhi Red Fort Car Blast: लाल किल्ल्याजवळ कारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर देशात संतापाची लाट उसळली. 

हरीष गुप्तानॅशनल एडिटर, लोकमतनवी दिल्ली: लाल किल्ल्याजवळ कारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर देशात संतापाची लाट उसळली. उच्चस्तरीय बैठका सुरू झाल्या. विविध संस्थांनी एकत्र तपास सुरू केला. असे असले, तरी एक  गोष्ट घडलेली नाही. पाकिस्तान आणि जैश-ए-मोहम्मद यांच्याकडे भारत सरकारने अजूनही बोट दाखवलेले नाही. श्रीनगरमध्ये झालेल्या तपासात जैश-ए- मोहम्मदची पोस्टर्स समोर आली. ‘व्हाइट कोट’ मोड्युल लक्षात आले. याचा अर्थ दहशतवादी गटाने पुन्हा कारवाया सुरू केल्या हे स्पष्ट दिसत असूनही सरकार अजून काही बोलायला तयार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानमध्ये बोलताना ‘हा बॉम्बस्फोट एक कट असून, तो रचणाऱ्यांना क्षमा नाही’, असे सांगितले. ‘तपास यंत्रणा गुन्हेगारांचा पूर्णपणे समाचार घेतील’, असा इशारा गृहमंत्री अमित शाह यांनी दिला. परंतु, जैश-ए-मोहम्मद, पाकिस्तान किंवा सीमेपलीकडून दहशतवाद हाताळणाऱ्यांचे नाव घेतले नाही. एप्रिलमध्ये पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर जे घडले त्याच्या हे बरोबर उलटे आहे. पहलगाममध्ये पाकिस्तान आणि जैश-ए-मोहम्मदचा संबंध स्पष्टपणे दिसला होता आणि त्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ झाले.

यातून काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात. काश्मीरमध्ये जर जैश-ए-मोहम्मदचे जाळे पुन्हा काम करू लागले असेल, तर सरकार स्पष्टपणे त्यांना त्यात गोवत का नाही? यात आणखी काही गुंतागुंत दिसत आहे काय? कदाचित एखादे संमिश्र मोड्युल असेल, काही वेगळे फाटे फुटत असतील किंवा देशांतर्गत लागेबांधे असू शकतील. जे पूर्णपणे उकलण्यासाठी काळजी घेतली जात आहे. आरोप करण्याची घाई केली आणि ते उलटले, तर होणारे राजनैतिक नुकसान टाळण्याचा नवी दिल्लीचा विचार असावा.अधिकारी तीन कारणे देतात. जाहीरपणे कोणाचे नाव घेण्यापूर्वी पक्का पुरावा हाती असला पाहिजे. यापूर्वी नाव घेण्याची घाई केल्यामुळे तपासात अडथळे उत्पन्न झाले होते. राजनैतिक स्तरावर आता सज्जड पुरावे असतील, तरच जागतिक स्तरावरील दहशतवादविरोधी मंच, तसेच एफएटीएफमध्ये विषय मांडता येतो. तिसरे म्हणजे आरोप करण्याची घाई केली, तर इस्लामाबादकडून ‘राजकीय हेतूने केलेला आरोप आहे’, असे म्हणून तो फेटाळला जाऊ शकतो. याशिवाय ‘व्हाइट कोट’ म्हणजे डॉक्टर मंडळी गुंतलेल्या या दहशतवादी कृत्यात पहिल्यांदाच तुर्कस्थानचा संबंध लक्षात आला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. भूराजकीय व्यासपीठावर हे प्रकरण येण्याआधी पहिल्यांदा तपासानेच काय ते निर्णायक बोलावे, असा सरकारचा हिशेबी इरादा दिसतोय.

हे दहशतवादी कृत्य वेळेत उघड झाले, याबाबतीत भारत नशीबवान म्हटला पाहिजे. २०१० साली वैद्यकशास्त्राची पदवी घेतलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हा कट उघडकीस आणला. वैद्यकाची पदवी घेतल्यानंतर त्याने पोलिस दलात जायचे ठरवले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन तो २०२५ साली श्रीनगरमध्ये वरिष्ठ पोलिस अधीक्षक म्हणून रुजू झाला. नवगाम पोलिस ठाणे त्याच्या हद्दीत येत होते. १८ ऑक्टोबरला जैश-ए-मोहम्मदची पोस्टर्स झळकली. डॉ. संदीप चक्रवर्ती या वरिष्ठ पोलिस अधीक्षकाने या घटनेकडे ‘दिशाभूल झालेल्या तरुणांनी केलेला उद्योग’ म्हणून दुर्लक्ष केले नाही. चौकशीचे आदेश दिले. १८ ऑक्टोबरला काश्मीर खोऱ्यात जैश-ए-मोहम्मदच्या पोस्टर्समुळे ज्याची सुरुवात झाली, त्याची अखेर १० नोव्हेंबरला लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात होताना दिसली.   

सतर्क पोलिसिंग कागदावर

पोलिस ठाणी सतर्क नसतील, तर गुन्हेगार कसे निसटतात, याचे हे नमुनेदार उदाहरण. जवळपास १०  वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी ‘स्मार्ट पोलिसिंग’ ही संज्ञा रूढ केली. मात्र, आजही भारतात असे स्मार्ट पोलिस स्टेशन पाहायला मिळत नाही. स्मार्ट पोलिसिंगची पहिली व्यवस्था म्हणजे रस्त्यांवर अडथळे उभारून तपासणी हे असते. मुख्य संशयित डॉक्टर उमरला हरयाणा तपास नाक्यांवर हटकले गेले असते, तर अनर्थ टळला असता. या नाक्यांवर ओळखपत्रांची स्वयंचलित तपासणी, गुन्हेगारांची माहिती सर्वत्र उपलब्ध असणे, वाहनाविषयी सावध करणे, राष्ट्रीय सायबर क्रिमिनल पोर्टलशी जोडले जाऊन योग्यवेळी इशारा मिळणे या गोष्टी स्मार्ट पोलिसिंगमध्ये येतात. परंतु, दुर्दैवाने भारतातील तपास नाकी अजूनही माणसे चालवतात. राष्ट्रीय माहितीजालाशी जोडलेली नसल्याने कागदपत्रांच्या ‘मानवी’ छाननीला फारसा अर्थ नसतो. अव्याहत असे डिजिटल काम, वर्तन विश्लेषण, सायबरशी जोडलेले आज्ञा केंद्र किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने संशयिताचा शोध हे सारे करू शकणारी ‘स्मार्ट पोलिस यंत्रणा’ आपण अद्यापही उभारू शकलेलो नाही, हे दुर्दैवच म्हणायचे.

English
हिंदी सारांश
Web Title : Why is India 'Yet' to Name Pakistan in Recent Incidents?

Web Summary : Despite evidence linking Pakistan-based Jaish-e-Mohammad to recent attacks, India hesitates to directly accuse them. Authorities cite the need for solid proof to avoid diplomatic backlash and strengthen international pressure, while also pointing to potential new elements like Turkish involvement.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोट