शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

हे राजकारण दुहीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 23:48 IST

केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यात आता जोराचे वाक्युद्ध सुरु झाले आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यात आता जोराचे वाक्युद्ध सुरु झाले आहे. उत्तर प्रदेशची निवडणूक ज्या धार्मिक दुहीकरणाच्या बळावर भाजपने जिंकली त्याचाच वापर केरळात करण्याच्या इराद्याने अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ केरळ या देशातील सर्वाधिक साक्षर राज्यात उतरत आहेत. केरळात काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडी विधिमंडळात दुस-या क्रमांकाच्या जागा मिळवलेली आहे. केरळात आजवर भाजपला यशाचा चेहरा पाहता आला नाही. उत्तरेतील विजयानंतर तो दक्षिणेतही मिळविण्याच्या जिद्दीने शाह आणि योगी हे तेथील विधानसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत. तेथे जाताना त्यांनी त्यांची जुनीच हत्यारे सोबत घेतली आहेत. पिनारायी सरकार हे प्रामुख्याने डाव्या कम्युनिस्ट पक्षाचे आहे आणि ते ‘जिहादी मुसलमानांना हाताशी धरून तेथील संघ परिवाराच्या कार्यकर्त्यांच्या हत्या करीत आहे,’ या आरोपासह शाह आणि योगी यांनी त्यांच्या प्रचारकार्याला सुरुवात केली आहे. राजकारणाला धर्मद्वेषाची जोड देण्याचा भाजपचा प्रयत्न आता साºयांच्या परिचयाचा झाला आहे. केरळात कम्युनिस्ट आणि संघ परिवाराचे लोक यांच्यात आजवर अनेक हाणामाºया झाल्या आणि त्यात दोन्हीकडची बरीच माणसे मारली गेली हे वास्तव आहे. मात्र या हाणामारीला आजवर कुणी धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला नाही. शाह असा प्रयत्न आता प्रथमच करीत आहेत. धर्म न मानणाºया कम्युनिस्ट पक्षाची सांधेजोड त्यांनी जिहादी मुसलमानांशी त्यासाठी केली आहे. हा प्रयत्न समाजाला राजकीय वैराकडून धार्मिक तेढीकडे नेणारा आहे. मात्र याच प्रकारातून आपण विजयी होऊ शकतो याची अनुभवसिद्ध खात्री पटलेल्या शाह यांना त्यात काही गैर दिसत नाही. पिनारायी विजयन किंवा त्यांचा कम्युनिस्ट पक्ष यांच्यावर आतापर्यंत कोणी धर्मांधतेचा आरोप केला नाही आणि केला तरी तो त्यांना चिकटलाही नाही. मात्र आपल्या राजकीय हातोटीविषयी नको तेवढी खात्री असणाºया शाह यांना तसा प्रयत्न तेथे करावासा वाटला तर तो त्यांच्या सवयीचा भाग आहे, असेच आपण मानले पाहिजे. पिनारायी विजयन हेही कमालीचे लढाऊ नेते आहेत. त्यांनी शाह यांच्या आरोपाला आपल्या जवळच्या तडाखेबंद आकडेवारीनिशी उत्तर देऊन त्यांच्या प्रचाराची धार बोथट केली आहे. सन २००० पासून २०१७ पर्यंत केरळात ज्या राजकीय हत्या नोंदविल्या गेल्या त्यातील ८५ कम्युनिस्टांच्या तर ६५ संघ परिवाराच्या आहेत, असे सांगून त्यांनी एवढ्या काळाची पोलिसांची कागदपत्रेच देशाला दाखविली आहेत. या काळात केरळात एकट्या डाव्या कम्युनिस्टांचेच राज्य होते असे नाही. काँग्रेसप्रणीत उजवी व कम्युनिस्टांच्या नेतृत्वातील डावी अशा दोन्ही आघाड्यांनी तेथे आळीपाळीने राज्य केले आहे आणि ही आकडेवारी या काळातील आहे. एवढ्या काळात झालेल्या कोणत्याही हत्येला कोणी धर्म चिकटविला नाही. शाह यांनी त्यात धर्माला ओढले आहे आणि आपला आरोप अधिक गडद दिसावा म्हणून तो करताना योगी आदित्यनाथ या भगव्या वस्त्रातल्या पुढाºयाला त्यांनी सोबत घेतले आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत साºया देशात धार्मिक दुहीकरण घडवून आणण्याचे हे राजकारण देशविघातक आहे. मात्र ज्यांना राजकीय विजय देशहिताहून मोठा व महत्त्वाचा वाटतो त्या सत्ताकांक्षी लोकांना त्याचे सोयरसुतक नसते. विचार किंवा विकास यांची भाषा समजायला अवघड तर जात व धर्म या बाबी समजायला सोप्या असतात हा आजवरचा देशाचा अनुभव आहे आणि त्याबाबत पुढाकार घेणाºयांत शाह अग्रेसर आहेत.

टॅग्स :Amit Shahअमित शाहyogi adityanathयोगी आदित्यनाथ