शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
3
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
4
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
5
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
6
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
7
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
8
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
9
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
10
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
11
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
12
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
13
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
14
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
15
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
16
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
17
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
18
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
19
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
20
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

हे राजकारण दुहीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 23:48 IST

केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यात आता जोराचे वाक्युद्ध सुरु झाले आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यात आता जोराचे वाक्युद्ध सुरु झाले आहे. उत्तर प्रदेशची निवडणूक ज्या धार्मिक दुहीकरणाच्या बळावर भाजपने जिंकली त्याचाच वापर केरळात करण्याच्या इराद्याने अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ केरळ या देशातील सर्वाधिक साक्षर राज्यात उतरत आहेत. केरळात काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडी विधिमंडळात दुस-या क्रमांकाच्या जागा मिळवलेली आहे. केरळात आजवर भाजपला यशाचा चेहरा पाहता आला नाही. उत्तरेतील विजयानंतर तो दक्षिणेतही मिळविण्याच्या जिद्दीने शाह आणि योगी हे तेथील विधानसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत. तेथे जाताना त्यांनी त्यांची जुनीच हत्यारे सोबत घेतली आहेत. पिनारायी सरकार हे प्रामुख्याने डाव्या कम्युनिस्ट पक्षाचे आहे आणि ते ‘जिहादी मुसलमानांना हाताशी धरून तेथील संघ परिवाराच्या कार्यकर्त्यांच्या हत्या करीत आहे,’ या आरोपासह शाह आणि योगी यांनी त्यांच्या प्रचारकार्याला सुरुवात केली आहे. राजकारणाला धर्मद्वेषाची जोड देण्याचा भाजपचा प्रयत्न आता साºयांच्या परिचयाचा झाला आहे. केरळात कम्युनिस्ट आणि संघ परिवाराचे लोक यांच्यात आजवर अनेक हाणामाºया झाल्या आणि त्यात दोन्हीकडची बरीच माणसे मारली गेली हे वास्तव आहे. मात्र या हाणामारीला आजवर कुणी धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला नाही. शाह असा प्रयत्न आता प्रथमच करीत आहेत. धर्म न मानणाºया कम्युनिस्ट पक्षाची सांधेजोड त्यांनी जिहादी मुसलमानांशी त्यासाठी केली आहे. हा प्रयत्न समाजाला राजकीय वैराकडून धार्मिक तेढीकडे नेणारा आहे. मात्र याच प्रकारातून आपण विजयी होऊ शकतो याची अनुभवसिद्ध खात्री पटलेल्या शाह यांना त्यात काही गैर दिसत नाही. पिनारायी विजयन किंवा त्यांचा कम्युनिस्ट पक्ष यांच्यावर आतापर्यंत कोणी धर्मांधतेचा आरोप केला नाही आणि केला तरी तो त्यांना चिकटलाही नाही. मात्र आपल्या राजकीय हातोटीविषयी नको तेवढी खात्री असणाºया शाह यांना तसा प्रयत्न तेथे करावासा वाटला तर तो त्यांच्या सवयीचा भाग आहे, असेच आपण मानले पाहिजे. पिनारायी विजयन हेही कमालीचे लढाऊ नेते आहेत. त्यांनी शाह यांच्या आरोपाला आपल्या जवळच्या तडाखेबंद आकडेवारीनिशी उत्तर देऊन त्यांच्या प्रचाराची धार बोथट केली आहे. सन २००० पासून २०१७ पर्यंत केरळात ज्या राजकीय हत्या नोंदविल्या गेल्या त्यातील ८५ कम्युनिस्टांच्या तर ६५ संघ परिवाराच्या आहेत, असे सांगून त्यांनी एवढ्या काळाची पोलिसांची कागदपत्रेच देशाला दाखविली आहेत. या काळात केरळात एकट्या डाव्या कम्युनिस्टांचेच राज्य होते असे नाही. काँग्रेसप्रणीत उजवी व कम्युनिस्टांच्या नेतृत्वातील डावी अशा दोन्ही आघाड्यांनी तेथे आळीपाळीने राज्य केले आहे आणि ही आकडेवारी या काळातील आहे. एवढ्या काळात झालेल्या कोणत्याही हत्येला कोणी धर्म चिकटविला नाही. शाह यांनी त्यात धर्माला ओढले आहे आणि आपला आरोप अधिक गडद दिसावा म्हणून तो करताना योगी आदित्यनाथ या भगव्या वस्त्रातल्या पुढाºयाला त्यांनी सोबत घेतले आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत साºया देशात धार्मिक दुहीकरण घडवून आणण्याचे हे राजकारण देशविघातक आहे. मात्र ज्यांना राजकीय विजय देशहिताहून मोठा व महत्त्वाचा वाटतो त्या सत्ताकांक्षी लोकांना त्याचे सोयरसुतक नसते. विचार किंवा विकास यांची भाषा समजायला अवघड तर जात व धर्म या बाबी समजायला सोप्या असतात हा आजवरचा देशाचा अनुभव आहे आणि त्याबाबत पुढाकार घेणाºयांत शाह अग्रेसर आहेत.

टॅग्स :Amit Shahअमित शाहyogi adityanathयोगी आदित्यनाथ