शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

वास्तवाचे भान

By admin | Updated: February 29, 2016 02:50 IST

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून सत्तेत आल्यानंतर देशाच्या आर्थिक प्रगतीविषयी भाजपाने जे गुलाबी चित्र रंगविण्याचा प्रयत्न केला होता

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून सत्तेत आल्यानंतर देशाच्या आर्थिक प्रगतीविषयी भाजपाने जे गुलाबी चित्र रंगविण्याचा प्रयत्न केला होता, ते चित्र प्रत्यक्षात उतरविणे किती कठीण आहे या वास्तवाचे त्या पक्षाला आणि पक्षाच्या सरकारला आलेले भान शुक्रवारी संसदेत मांडलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या आर्थिक पाहणी अहवालावरून प्रतीत होते. देशाचा आर्थिक वृद्धीदर दोन अंकी राहील असे तेव्हा आत्मविश्वासाने सांगितले जात होते. पण या अहवालाने आगामी वर्षात तो ७ ते ७.७५ टक्क्यांच्या घरात राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. अर्थात, विद्यमान जागतिक स्थितीचा विचार करता हा दर तरीही समाधानकारकच मानावा लागेल. पण तो तरी साध्य करता येईल का, हाच मोठा प्रश्न अर्थतज्ज्ञांना भेडसावतो आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी येत्या आर्थिक वर्षात करावी लागली तर एकवेळ केन्द्र सरकार ते ओझे पेलू शकेल; पण राज्यांना ते पेलणे कठीण जाणार असल्याने राज्यांना केन्द्राकडून मिळणारा निधी वेतनावर खर्च करणे भाग पडेल व त्याचा विकासाच्या आणि पर्यायाने संपत्ती निर्माण करणाऱ्या योजनांवर अत्यंत प्रतिकूल परिणाम घडून येईल. वित्तीय तूट कमी करण्याचा हेतू साध्य करण्यासाठी अनुदाने कमी करण्याचा आणि श्रीमंतांकडून अधिकचा कर वसूल करण्याचा पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचा इरादा या सर्वेक्षणात दिसून येतो. आज विभिन्न वस्तूंवर सरकारी तिजोरीतून अनुदानांवर खर्च होणारी रक्कम तब्बल एक लक्ष कोटी रुपये इतकी आहे. पण जो वर्ग सांपत्तिकदृष्ट्या संपन्न आहे तो वर्गही या अनुदानांचा लाभ घेत असून, त्यावर तोडगा शोधायचा तर मोठ्या राजकीय इच्छाशक्तीची गरज भासणार आहे. दुसरीकडे देशातील नियमित उत्पन्न प्राप्त करणाऱ्या मतदारांपैकी जेमतेम साडेचार टक्के लोकच प्रत्यक्ष कराच्या म्हणजे आयकराच्या जाळ्यात असून, हे जाळे विस्तृत करण्याची व विद्यमान करप्रणालीत कोणताही बदल न करण्याची शिफारस या आर्थिक सर्वेक्षणाद्वारे केली गेली आहे. याचा अर्थ आज संसदेत मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात व्यक्तिगत पातळीवरील करमुक्त उत्पन्नाच्या कमाल मर्यादेत वृद्धी होण्याची शक्यता या अहवालाने मोडीत काढली आहे. देशांतर्गत आर्थिक स्थितीत सुधार होण्याच्या दृष्टीने आगामी मान्सूनविषयक व्यक्त केले गेलेले अंदाज आशादायक असले, तरी कच्च्या तेलाच्या दरात वृद्धी झाली आणि चीनने पुन्हा आपल्या चलनाचा विनिमय दर घटवला तर त्याचा अनिष्ट परिणाम भारताच्या प्रगतीवर आणि निर्धारित लक्ष्य गाठण्यावर होऊ शकतो अशी भीती अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.