शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

वास्तवाचे भान

By admin | Updated: February 29, 2016 02:50 IST

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून सत्तेत आल्यानंतर देशाच्या आर्थिक प्रगतीविषयी भाजपाने जे गुलाबी चित्र रंगविण्याचा प्रयत्न केला होता

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून सत्तेत आल्यानंतर देशाच्या आर्थिक प्रगतीविषयी भाजपाने जे गुलाबी चित्र रंगविण्याचा प्रयत्न केला होता, ते चित्र प्रत्यक्षात उतरविणे किती कठीण आहे या वास्तवाचे त्या पक्षाला आणि पक्षाच्या सरकारला आलेले भान शुक्रवारी संसदेत मांडलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या आर्थिक पाहणी अहवालावरून प्रतीत होते. देशाचा आर्थिक वृद्धीदर दोन अंकी राहील असे तेव्हा आत्मविश्वासाने सांगितले जात होते. पण या अहवालाने आगामी वर्षात तो ७ ते ७.७५ टक्क्यांच्या घरात राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. अर्थात, विद्यमान जागतिक स्थितीचा विचार करता हा दर तरीही समाधानकारकच मानावा लागेल. पण तो तरी साध्य करता येईल का, हाच मोठा प्रश्न अर्थतज्ज्ञांना भेडसावतो आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी येत्या आर्थिक वर्षात करावी लागली तर एकवेळ केन्द्र सरकार ते ओझे पेलू शकेल; पण राज्यांना ते पेलणे कठीण जाणार असल्याने राज्यांना केन्द्राकडून मिळणारा निधी वेतनावर खर्च करणे भाग पडेल व त्याचा विकासाच्या आणि पर्यायाने संपत्ती निर्माण करणाऱ्या योजनांवर अत्यंत प्रतिकूल परिणाम घडून येईल. वित्तीय तूट कमी करण्याचा हेतू साध्य करण्यासाठी अनुदाने कमी करण्याचा आणि श्रीमंतांकडून अधिकचा कर वसूल करण्याचा पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचा इरादा या सर्वेक्षणात दिसून येतो. आज विभिन्न वस्तूंवर सरकारी तिजोरीतून अनुदानांवर खर्च होणारी रक्कम तब्बल एक लक्ष कोटी रुपये इतकी आहे. पण जो वर्ग सांपत्तिकदृष्ट्या संपन्न आहे तो वर्गही या अनुदानांचा लाभ घेत असून, त्यावर तोडगा शोधायचा तर मोठ्या राजकीय इच्छाशक्तीची गरज भासणार आहे. दुसरीकडे देशातील नियमित उत्पन्न प्राप्त करणाऱ्या मतदारांपैकी जेमतेम साडेचार टक्के लोकच प्रत्यक्ष कराच्या म्हणजे आयकराच्या जाळ्यात असून, हे जाळे विस्तृत करण्याची व विद्यमान करप्रणालीत कोणताही बदल न करण्याची शिफारस या आर्थिक सर्वेक्षणाद्वारे केली गेली आहे. याचा अर्थ आज संसदेत मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात व्यक्तिगत पातळीवरील करमुक्त उत्पन्नाच्या कमाल मर्यादेत वृद्धी होण्याची शक्यता या अहवालाने मोडीत काढली आहे. देशांतर्गत आर्थिक स्थितीत सुधार होण्याच्या दृष्टीने आगामी मान्सूनविषयक व्यक्त केले गेलेले अंदाज आशादायक असले, तरी कच्च्या तेलाच्या दरात वृद्धी झाली आणि चीनने पुन्हा आपल्या चलनाचा विनिमय दर घटवला तर त्याचा अनिष्ट परिणाम भारताच्या प्रगतीवर आणि निर्धारित लक्ष्य गाठण्यावर होऊ शकतो अशी भीती अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.