शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

लोकमत संपादकीय - ‘एनआरसी’चे वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 03:50 IST

‘एनआरसी’ ही भारतीय नागरिकांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्रे देण्याची प्रक्रिया आहे

सुधारित नागरिकत्व कायदा आणि ‘नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स’ (एनआरसी) तयार करण्याची प्रक्रिया आसामनंतर देशभर राबविण्याचा सरकारचा इरादा यावरून विरोधी पक्षांनी सुरू केलेले आंदोलन आणखी पेटण्याची चिन्हे आहेत. निमित्त आहे ‘नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर’ (एनपीआर) च्या कामासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने निधी मंजूर केल्याचे. ‘एनआरसी’ देशभर राबविण्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परस्परविरोधी विधाने केल्याने गैरसमज व गोंधळात भर पडली होती. ‘एनपीआर’ हा ‘एनआरसी’ प्रक्रियेचाच एक भाग आहे, ही वस्तुस्थिती आहे. देशभर ‘एनआरसी’ राबविणे चुकीचे आहे, हे मान्य केले तरी याविरुद्ध रस्त्यावर उतरून आणि हिंसाचार करून जनतेला पुन्हा वेठीस धरण्यापूर्वी वास्तव समजावून घेणे गरजेचे आहे. ते समजावून घेतले की, असे लक्षात येईल की, आज रस्त्यावर उतरलेल्या काँग्रेसनेच या ‘एनपीआर’ नोंदणीस सुरुवात केली होती.

‘एनआरसी’ ही भारतीय नागरिकांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्रे देण्याची प्रक्रिया आहे. तर ‘एनपीआर’ ही एखाद्या विशिष्ट काळात भारतात वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांची नोंदणी करण्याची प्रक्रिया आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेत असताना सन २००३ मध्ये नागरिकत्व कायद्यात सुधारणा करून ज्याच्या जन्माच्या वेळी दोन पालकांपैकी एक ‘बेकायदा स्थलांतरित’ असेल अशी व्यक्ती जन्माने भारतीय नागरिकत्व मिळण्यास अपात्र ठरविली गेली. यासाठी देशात राहणारे ‘बेकायदा स्थलांतरित’ कोण हे हुडकून काढणे गरजेचे ठरले. भारतात वास्तव्य करणाऱ्यांपैकी भारतीय नागरिक कोण हे ठरवून त्यांची नोंद केली की उरलेले ‘बेकायदा स्थलांतरित’ हे आपोआपच स्पष्ट होईल. यासाठी भरतीय नागरिकांची नोंदणी करून त्यांना राष्ट्रीयत्वाचे ओळखपत्र देण्याचे नियमही त्याच वर्षी तयार केले गेले. आधी भारतात वास्तव्य करणाºया सर्व व्यक्तींची नोंद करून ‘नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर’ तयार करायचे व नंतर पुढील टप्प्यात त्या रजिस्टरमधील प्रत्येकाच्या नागरिकत्वाची खात्री करून ‘एनआरसी’ तयार करायचे, अशी व्यवस्था या नियमांनुसार ठरविण्यात आली. हे नियम केल्यानंतर पाच महिन्यांत वाजपेयी सरकार सत्तेवरून गेले. त्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील ‘संपुआ’ची दोन सरकारे सलग १० वर्षे सत्तेवर होती. आज काँग्रेस ‘एनआरसी’ हे भारतात धर्माच्या आधारावर फूट पाडण्याचे भाजपचे कुटिल कारस्थान असल्याचे म्हणून आंदोलन करत आहे. पण या ‘एनआरसी’चे मूळ असलेला २००३ चा कायदा व त्यानंतर तयार केलेली नियमावली रद्द करण्याचे काम काँग्रेसने केले नाही. उलट ‘संपुआ’चे दुसºया सरकारने ‘एनपीआर’साठी माहिती गोळा करण्याचे काम सन २०१० मध्ये सुरू केले. सन २०११ च्या जनगणनेसाठी प्रगणक घरोघरी गेले तेव्हाच ‘एनपीआर’साठीही माहिती गोळा केली गेली.

आधी सन २०१० मध्ये गोळा केलेली माहिती सन २०१५ मध्ये प्रगणकांना घरोघरी पाठवून पुन्हा अद्ययावत केली गेली. त्यानंतर ही माहिती पूर्णपणे डिजिटल स्वरूपात संग्रहित केली गेली. आता मंत्रिमंडळाने निधी मंजूर करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो ‘एनपीआर’साठी सन २०१५ मध्ये अद्ययावत केलेली व डिजिटल स्वरूपात संग्रहित केलेली माहिती पुन्हा अद्ययावत करण्यासाठी आहे. हे काम सन २०२१ च्या जनगणनेसाठी प्रगणक एप्रिल ते सप्टेंबर २०२० या काळात पुन्हा घरोघरी जातील तेव्हा केले जाईल. यावरून स्पष्ट होते की, ‘एनपीआर’ ही ‘एनआरसी’ची पूर्वतयारी आहे. ‘एनआरसी’ ही कल्पना नक्कीच भाजपची आहे. पण त्याची पहिली पायरी म्हणून कराव्या लागणाºया ‘एनपीआर’ची सुरुवात काँग्रेसने केली, हेही लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे केवळ राजकारण करण्यासाठी सत्ताधारी व विरोधक आता सोयीस्कर भूमिका घेत असले तरी प्रसंगी ज्यात जीवही जाऊ शकतो. अशा आंदोलनात उतरण्यापूर्वी सुज्ञ नागरिकांनी हे वास्तव लक्षात घ्यायला हवे.

‘एनपीआर’ हा ‘एनआरसी’ प्रक्रियेचाच एक भाग आहे, ही वस्तुस्थिती आहे. देशभर ‘एनआरसी’ राबविणे चुकीचे आहे, हे मान्य केले तरी याविरुद्ध रस्त्यावर उतरून व हिंसाचार करून जनतेला पुन्हा वेठीस धरण्यापूर्वी वास्तव समजावून घेणे गरजेचे आहे. 

 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNarendra Modiनरेंद्र मोदीMuslimमुस्लीम