शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Lok Sabha Election 2019 : रावेरविषयी राष्टÑवादीचा हटवादीपणा की हतबलता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 15:59 IST

मिलिंद कुलकर्णी लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित होणाऱ्या घटना नुकत्याच घडल्या. काँग्रेस पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या ...

मिलिंद कुलकर्णीलोकसभा निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित होणाऱ्या घटना नुकत्याच घडल्या. काँग्रेस पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या शरद पवार यांनी १९९९ मध्ये राष्टÑवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. केंद्रातील सरकारशी त्यांनी जुळवून घेतल्याचे दिसून आले. राष्टÑीय लोकशाही आघाडी सरकरच्या काळात आपत्ती व्यवस्थापनविषयक समितीचे अध्यक्षपद त्यांनी स्विकारले होते. सोनीया गांधी यांच्या परकीयत्वाचा मुद्दा घेऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या पवारांनी नंतर महाराष्टÑात आणि नंतर केंद्रातही काँग्रेससोबत सत्तेत भागीदारी पत्करली. महाराष्टÑात तर काँग्रेससोबत अक्षरश: दादागिरी केली गेली. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना पवारांचे ‘धोरणलकवा’ हे विधान गाजले होते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविषयी सुरुवातीला शंका घेणारे आणि मोदींचे कौतुक करणारे पवार आता २०१९ च्या निवडणुकीत राहुल गांधी यांचे कौतुक तर मोदींवर टीका करीत आहेत. मात्र महाराष्टÑात काँग्रेसच्या अडचणीत वाढ करण्याचे प्रयत्नदेखील राष्टÑवादीकडून सुरु आहेत.नगरच्या जागेविषयी घेतलेल्य आग्रही भूमिकेवरुन बरेच वादळ उठले. काँग्रेसच्या घरात वादंग झाले आणि विखे कुटुंबाचा वारसदार भाजपाच्या गोटात जाऊन मिळाला. आता अशीच भूमिका खान्देशातील रावेरविषयी राष्टÑवादी काँग्रेस पक्षाने स्विकारलेली आहे. या मतदारसंघातून राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कधीही निवडून आलेला नाही. हा मतदारसंघ गेल्या ४० वर्षांत एकदा अपवाद वगळता भाजपाकडे राहिलेला आहे. तत्कालीन खासदार वाय.जी.महाजन यांना संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या स्टिंग आॅपरेशनमध्ये पकडल्यानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द झाले आणि २००७ मध्ये पोटनिवडणूक झाली असताना भाजपाचेच हरिभाऊ जावळे निवडून आले होते. याउलट जळगाव जिल्ह्यातीलच चाळीसगाव मतदारसंघात भाजपा उमेदवार डॉ.बी.एस.पाटील पराभूत झाले होते. त्यामुळे भाजपाचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाची ओळख असताना दोन्ही काँग्रेसने या मतदारसंघात धरसोडीची भूमिका घेतलेली दिसून येते. दोघांपैकी एकाही पक्षाने एखाद्या उमेदवारावर पाच वर्षे मेहनत घेतली, असे दिसून येत नाही. काँग्रेसच्या डॉ.उल्हास पाटील यांना कॉंग्रेसने संधी दिली आणि त्यांनी ती सार्थ ठरवली. परंतु, १९९९ मध्ये राष्टÑवादीची स्थापना झाली आणि मतविभाजन झाले आणि डॉ.पाटील यांना पुन्हा दिल्ली गाठणे शक्य झाले नाही. २००४ मध्ये दोन्ही काँग्रेसतर्फे ते पुन्हा मैदानात उभे राहिले, परंतु अवघ्या २० हजार मतांनी ते पराभूत झाले. काँग्रेसचा उमेदवार दोनदा पराभूत झाल्याने राष्टÑवादी काँग्रेसने हा मतदारसंघ मागीतला. हा निकष त्या काळातील पदाधिकाऱ्यांनी मान्य केला. डॉ.अर्जुन भंगाळे, अ‍ॅड.रवींद्र पाटील आणि मनीष जैन या तीन उमेदवारांचा सलग तीन निवडणुकांमध्ये पराभव झाला. जुना निकष लावून या मतदारसंघावर गेल्यावेळीच म्हणजे २०१४ मध्ये काँग्रेसने दावा करायला हवा होता. यंदाही हा दावा मजबूतपणे केला गेला नाही. हुकुमी नेतृत्वाचा अभाव दिसून आला. त्यासोबतच मैदानात जिंकणारी काँग्रेस तहात हरते, हे पुन्हा दिसून आले. डॉ.उल्हास पाटील यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराला राष्टÑवादीकडून तिकीट देण्याची आॅफर दिली जाते, मग त्यांच्या मूळ पक्षाला जागा द्यायला काय हरकत आहे? असा प्रश्न पक्षश्रेष्ठींनी विचारण्याची गरज आहे.आतापर्यंत राष्टÑवादीपुढे अ‍ॅड.रवींद्र पाटील, संतोष चौधरी आणि अरुणभाई गुजराथी या नावांची चर्चा होती. अ‍ॅड.पाटील हे यापूर्वी निवडणूक लढलेले आहेत. संतोष चौधरी यांनी नकार दिल्याची चर्चा आहे तर अरुणभाई गुजराथी स्वत: अनुत्सुक आहेत. अशी स्थिती असताना माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी श्रीराम पाटील यांचे नाव अचानक पुढे केले. गेल्यावेळी असेच मनीष जैन यांचे नाव आले होते. त्याची पुनरावृत्ती करण्याचा तर राष्टÑवादीचा विचार नाही ना? सक्षम उमेदवार नसताना राष्टÑवादी काँग्रेसचा जागेचा आग्रह धरण्याचा हटवादीपणा दिसतो. तशीच अधिसूचनेच्या दोन दिवस आधीपर्यंत उमेदवाराचा शोध सुरु ठेवावा लागण्याची हतबलता देखील दिसून येत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव