शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : रावेरविषयी राष्टÑवादीचा हटवादीपणा की हतबलता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 15:59 IST

मिलिंद कुलकर्णी लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित होणाऱ्या घटना नुकत्याच घडल्या. काँग्रेस पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या ...

मिलिंद कुलकर्णीलोकसभा निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित होणाऱ्या घटना नुकत्याच घडल्या. काँग्रेस पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या शरद पवार यांनी १९९९ मध्ये राष्टÑवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. केंद्रातील सरकारशी त्यांनी जुळवून घेतल्याचे दिसून आले. राष्टÑीय लोकशाही आघाडी सरकरच्या काळात आपत्ती व्यवस्थापनविषयक समितीचे अध्यक्षपद त्यांनी स्विकारले होते. सोनीया गांधी यांच्या परकीयत्वाचा मुद्दा घेऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या पवारांनी नंतर महाराष्टÑात आणि नंतर केंद्रातही काँग्रेससोबत सत्तेत भागीदारी पत्करली. महाराष्टÑात तर काँग्रेससोबत अक्षरश: दादागिरी केली गेली. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना पवारांचे ‘धोरणलकवा’ हे विधान गाजले होते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविषयी सुरुवातीला शंका घेणारे आणि मोदींचे कौतुक करणारे पवार आता २०१९ च्या निवडणुकीत राहुल गांधी यांचे कौतुक तर मोदींवर टीका करीत आहेत. मात्र महाराष्टÑात काँग्रेसच्या अडचणीत वाढ करण्याचे प्रयत्नदेखील राष्टÑवादीकडून सुरु आहेत.नगरच्या जागेविषयी घेतलेल्य आग्रही भूमिकेवरुन बरेच वादळ उठले. काँग्रेसच्या घरात वादंग झाले आणि विखे कुटुंबाचा वारसदार भाजपाच्या गोटात जाऊन मिळाला. आता अशीच भूमिका खान्देशातील रावेरविषयी राष्टÑवादी काँग्रेस पक्षाने स्विकारलेली आहे. या मतदारसंघातून राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कधीही निवडून आलेला नाही. हा मतदारसंघ गेल्या ४० वर्षांत एकदा अपवाद वगळता भाजपाकडे राहिलेला आहे. तत्कालीन खासदार वाय.जी.महाजन यांना संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या स्टिंग आॅपरेशनमध्ये पकडल्यानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द झाले आणि २००७ मध्ये पोटनिवडणूक झाली असताना भाजपाचेच हरिभाऊ जावळे निवडून आले होते. याउलट जळगाव जिल्ह्यातीलच चाळीसगाव मतदारसंघात भाजपा उमेदवार डॉ.बी.एस.पाटील पराभूत झाले होते. त्यामुळे भाजपाचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाची ओळख असताना दोन्ही काँग्रेसने या मतदारसंघात धरसोडीची भूमिका घेतलेली दिसून येते. दोघांपैकी एकाही पक्षाने एखाद्या उमेदवारावर पाच वर्षे मेहनत घेतली, असे दिसून येत नाही. काँग्रेसच्या डॉ.उल्हास पाटील यांना कॉंग्रेसने संधी दिली आणि त्यांनी ती सार्थ ठरवली. परंतु, १९९९ मध्ये राष्टÑवादीची स्थापना झाली आणि मतविभाजन झाले आणि डॉ.पाटील यांना पुन्हा दिल्ली गाठणे शक्य झाले नाही. २००४ मध्ये दोन्ही काँग्रेसतर्फे ते पुन्हा मैदानात उभे राहिले, परंतु अवघ्या २० हजार मतांनी ते पराभूत झाले. काँग्रेसचा उमेदवार दोनदा पराभूत झाल्याने राष्टÑवादी काँग्रेसने हा मतदारसंघ मागीतला. हा निकष त्या काळातील पदाधिकाऱ्यांनी मान्य केला. डॉ.अर्जुन भंगाळे, अ‍ॅड.रवींद्र पाटील आणि मनीष जैन या तीन उमेदवारांचा सलग तीन निवडणुकांमध्ये पराभव झाला. जुना निकष लावून या मतदारसंघावर गेल्यावेळीच म्हणजे २०१४ मध्ये काँग्रेसने दावा करायला हवा होता. यंदाही हा दावा मजबूतपणे केला गेला नाही. हुकुमी नेतृत्वाचा अभाव दिसून आला. त्यासोबतच मैदानात जिंकणारी काँग्रेस तहात हरते, हे पुन्हा दिसून आले. डॉ.उल्हास पाटील यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराला राष्टÑवादीकडून तिकीट देण्याची आॅफर दिली जाते, मग त्यांच्या मूळ पक्षाला जागा द्यायला काय हरकत आहे? असा प्रश्न पक्षश्रेष्ठींनी विचारण्याची गरज आहे.आतापर्यंत राष्टÑवादीपुढे अ‍ॅड.रवींद्र पाटील, संतोष चौधरी आणि अरुणभाई गुजराथी या नावांची चर्चा होती. अ‍ॅड.पाटील हे यापूर्वी निवडणूक लढलेले आहेत. संतोष चौधरी यांनी नकार दिल्याची चर्चा आहे तर अरुणभाई गुजराथी स्वत: अनुत्सुक आहेत. अशी स्थिती असताना माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी श्रीराम पाटील यांचे नाव अचानक पुढे केले. गेल्यावेळी असेच मनीष जैन यांचे नाव आले होते. त्याची पुनरावृत्ती करण्याचा तर राष्टÑवादीचा विचार नाही ना? सक्षम उमेदवार नसताना राष्टÑवादी काँग्रेसचा जागेचा आग्रह धरण्याचा हटवादीपणा दिसतो. तशीच अधिसूचनेच्या दोन दिवस आधीपर्यंत उमेदवाराचा शोध सुरु ठेवावा लागण्याची हतबलता देखील दिसून येत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव