शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

Lok Sabha Election 2019 : रावेरविषयी राष्टÑवादीचा हटवादीपणा की हतबलता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 15:59 IST

मिलिंद कुलकर्णी लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित होणाऱ्या घटना नुकत्याच घडल्या. काँग्रेस पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या ...

मिलिंद कुलकर्णीलोकसभा निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित होणाऱ्या घटना नुकत्याच घडल्या. काँग्रेस पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या शरद पवार यांनी १९९९ मध्ये राष्टÑवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. केंद्रातील सरकारशी त्यांनी जुळवून घेतल्याचे दिसून आले. राष्टÑीय लोकशाही आघाडी सरकरच्या काळात आपत्ती व्यवस्थापनविषयक समितीचे अध्यक्षपद त्यांनी स्विकारले होते. सोनीया गांधी यांच्या परकीयत्वाचा मुद्दा घेऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या पवारांनी नंतर महाराष्टÑात आणि नंतर केंद्रातही काँग्रेससोबत सत्तेत भागीदारी पत्करली. महाराष्टÑात तर काँग्रेससोबत अक्षरश: दादागिरी केली गेली. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना पवारांचे ‘धोरणलकवा’ हे विधान गाजले होते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविषयी सुरुवातीला शंका घेणारे आणि मोदींचे कौतुक करणारे पवार आता २०१९ च्या निवडणुकीत राहुल गांधी यांचे कौतुक तर मोदींवर टीका करीत आहेत. मात्र महाराष्टÑात काँग्रेसच्या अडचणीत वाढ करण्याचे प्रयत्नदेखील राष्टÑवादीकडून सुरु आहेत.नगरच्या जागेविषयी घेतलेल्य आग्रही भूमिकेवरुन बरेच वादळ उठले. काँग्रेसच्या घरात वादंग झाले आणि विखे कुटुंबाचा वारसदार भाजपाच्या गोटात जाऊन मिळाला. आता अशीच भूमिका खान्देशातील रावेरविषयी राष्टÑवादी काँग्रेस पक्षाने स्विकारलेली आहे. या मतदारसंघातून राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कधीही निवडून आलेला नाही. हा मतदारसंघ गेल्या ४० वर्षांत एकदा अपवाद वगळता भाजपाकडे राहिलेला आहे. तत्कालीन खासदार वाय.जी.महाजन यांना संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या स्टिंग आॅपरेशनमध्ये पकडल्यानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द झाले आणि २००७ मध्ये पोटनिवडणूक झाली असताना भाजपाचेच हरिभाऊ जावळे निवडून आले होते. याउलट जळगाव जिल्ह्यातीलच चाळीसगाव मतदारसंघात भाजपा उमेदवार डॉ.बी.एस.पाटील पराभूत झाले होते. त्यामुळे भाजपाचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाची ओळख असताना दोन्ही काँग्रेसने या मतदारसंघात धरसोडीची भूमिका घेतलेली दिसून येते. दोघांपैकी एकाही पक्षाने एखाद्या उमेदवारावर पाच वर्षे मेहनत घेतली, असे दिसून येत नाही. काँग्रेसच्या डॉ.उल्हास पाटील यांना कॉंग्रेसने संधी दिली आणि त्यांनी ती सार्थ ठरवली. परंतु, १९९९ मध्ये राष्टÑवादीची स्थापना झाली आणि मतविभाजन झाले आणि डॉ.पाटील यांना पुन्हा दिल्ली गाठणे शक्य झाले नाही. २००४ मध्ये दोन्ही काँग्रेसतर्फे ते पुन्हा मैदानात उभे राहिले, परंतु अवघ्या २० हजार मतांनी ते पराभूत झाले. काँग्रेसचा उमेदवार दोनदा पराभूत झाल्याने राष्टÑवादी काँग्रेसने हा मतदारसंघ मागीतला. हा निकष त्या काळातील पदाधिकाऱ्यांनी मान्य केला. डॉ.अर्जुन भंगाळे, अ‍ॅड.रवींद्र पाटील आणि मनीष जैन या तीन उमेदवारांचा सलग तीन निवडणुकांमध्ये पराभव झाला. जुना निकष लावून या मतदारसंघावर गेल्यावेळीच म्हणजे २०१४ मध्ये काँग्रेसने दावा करायला हवा होता. यंदाही हा दावा मजबूतपणे केला गेला नाही. हुकुमी नेतृत्वाचा अभाव दिसून आला. त्यासोबतच मैदानात जिंकणारी काँग्रेस तहात हरते, हे पुन्हा दिसून आले. डॉ.उल्हास पाटील यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराला राष्टÑवादीकडून तिकीट देण्याची आॅफर दिली जाते, मग त्यांच्या मूळ पक्षाला जागा द्यायला काय हरकत आहे? असा प्रश्न पक्षश्रेष्ठींनी विचारण्याची गरज आहे.आतापर्यंत राष्टÑवादीपुढे अ‍ॅड.रवींद्र पाटील, संतोष चौधरी आणि अरुणभाई गुजराथी या नावांची चर्चा होती. अ‍ॅड.पाटील हे यापूर्वी निवडणूक लढलेले आहेत. संतोष चौधरी यांनी नकार दिल्याची चर्चा आहे तर अरुणभाई गुजराथी स्वत: अनुत्सुक आहेत. अशी स्थिती असताना माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी श्रीराम पाटील यांचे नाव अचानक पुढे केले. गेल्यावेळी असेच मनीष जैन यांचे नाव आले होते. त्याची पुनरावृत्ती करण्याचा तर राष्टÑवादीचा विचार नाही ना? सक्षम उमेदवार नसताना राष्टÑवादी काँग्रेसचा जागेचा आग्रह धरण्याचा हटवादीपणा दिसतो. तशीच अधिसूचनेच्या दोन दिवस आधीपर्यंत उमेदवाराचा शोध सुरु ठेवावा लागण्याची हतबलता देखील दिसून येत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव