शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

Lok Sabha Election 2019 : रावेरविषयी राष्टÑवादीचा हटवादीपणा की हतबलता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 15:59 IST

मिलिंद कुलकर्णी लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित होणाऱ्या घटना नुकत्याच घडल्या. काँग्रेस पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या ...

मिलिंद कुलकर्णीलोकसभा निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित होणाऱ्या घटना नुकत्याच घडल्या. काँग्रेस पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या शरद पवार यांनी १९९९ मध्ये राष्टÑवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. केंद्रातील सरकारशी त्यांनी जुळवून घेतल्याचे दिसून आले. राष्टÑीय लोकशाही आघाडी सरकरच्या काळात आपत्ती व्यवस्थापनविषयक समितीचे अध्यक्षपद त्यांनी स्विकारले होते. सोनीया गांधी यांच्या परकीयत्वाचा मुद्दा घेऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या पवारांनी नंतर महाराष्टÑात आणि नंतर केंद्रातही काँग्रेससोबत सत्तेत भागीदारी पत्करली. महाराष्टÑात तर काँग्रेससोबत अक्षरश: दादागिरी केली गेली. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना पवारांचे ‘धोरणलकवा’ हे विधान गाजले होते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविषयी सुरुवातीला शंका घेणारे आणि मोदींचे कौतुक करणारे पवार आता २०१९ च्या निवडणुकीत राहुल गांधी यांचे कौतुक तर मोदींवर टीका करीत आहेत. मात्र महाराष्टÑात काँग्रेसच्या अडचणीत वाढ करण्याचे प्रयत्नदेखील राष्टÑवादीकडून सुरु आहेत.नगरच्या जागेविषयी घेतलेल्य आग्रही भूमिकेवरुन बरेच वादळ उठले. काँग्रेसच्या घरात वादंग झाले आणि विखे कुटुंबाचा वारसदार भाजपाच्या गोटात जाऊन मिळाला. आता अशीच भूमिका खान्देशातील रावेरविषयी राष्टÑवादी काँग्रेस पक्षाने स्विकारलेली आहे. या मतदारसंघातून राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कधीही निवडून आलेला नाही. हा मतदारसंघ गेल्या ४० वर्षांत एकदा अपवाद वगळता भाजपाकडे राहिलेला आहे. तत्कालीन खासदार वाय.जी.महाजन यांना संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या स्टिंग आॅपरेशनमध्ये पकडल्यानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द झाले आणि २००७ मध्ये पोटनिवडणूक झाली असताना भाजपाचेच हरिभाऊ जावळे निवडून आले होते. याउलट जळगाव जिल्ह्यातीलच चाळीसगाव मतदारसंघात भाजपा उमेदवार डॉ.बी.एस.पाटील पराभूत झाले होते. त्यामुळे भाजपाचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाची ओळख असताना दोन्ही काँग्रेसने या मतदारसंघात धरसोडीची भूमिका घेतलेली दिसून येते. दोघांपैकी एकाही पक्षाने एखाद्या उमेदवारावर पाच वर्षे मेहनत घेतली, असे दिसून येत नाही. काँग्रेसच्या डॉ.उल्हास पाटील यांना कॉंग्रेसने संधी दिली आणि त्यांनी ती सार्थ ठरवली. परंतु, १९९९ मध्ये राष्टÑवादीची स्थापना झाली आणि मतविभाजन झाले आणि डॉ.पाटील यांना पुन्हा दिल्ली गाठणे शक्य झाले नाही. २००४ मध्ये दोन्ही काँग्रेसतर्फे ते पुन्हा मैदानात उभे राहिले, परंतु अवघ्या २० हजार मतांनी ते पराभूत झाले. काँग्रेसचा उमेदवार दोनदा पराभूत झाल्याने राष्टÑवादी काँग्रेसने हा मतदारसंघ मागीतला. हा निकष त्या काळातील पदाधिकाऱ्यांनी मान्य केला. डॉ.अर्जुन भंगाळे, अ‍ॅड.रवींद्र पाटील आणि मनीष जैन या तीन उमेदवारांचा सलग तीन निवडणुकांमध्ये पराभव झाला. जुना निकष लावून या मतदारसंघावर गेल्यावेळीच म्हणजे २०१४ मध्ये काँग्रेसने दावा करायला हवा होता. यंदाही हा दावा मजबूतपणे केला गेला नाही. हुकुमी नेतृत्वाचा अभाव दिसून आला. त्यासोबतच मैदानात जिंकणारी काँग्रेस तहात हरते, हे पुन्हा दिसून आले. डॉ.उल्हास पाटील यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराला राष्टÑवादीकडून तिकीट देण्याची आॅफर दिली जाते, मग त्यांच्या मूळ पक्षाला जागा द्यायला काय हरकत आहे? असा प्रश्न पक्षश्रेष्ठींनी विचारण्याची गरज आहे.आतापर्यंत राष्टÑवादीपुढे अ‍ॅड.रवींद्र पाटील, संतोष चौधरी आणि अरुणभाई गुजराथी या नावांची चर्चा होती. अ‍ॅड.पाटील हे यापूर्वी निवडणूक लढलेले आहेत. संतोष चौधरी यांनी नकार दिल्याची चर्चा आहे तर अरुणभाई गुजराथी स्वत: अनुत्सुक आहेत. अशी स्थिती असताना माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी श्रीराम पाटील यांचे नाव अचानक पुढे केले. गेल्यावेळी असेच मनीष जैन यांचे नाव आले होते. त्याची पुनरावृत्ती करण्याचा तर राष्टÑवादीचा विचार नाही ना? सक्षम उमेदवार नसताना राष्टÑवादी काँग्रेसचा जागेचा आग्रह धरण्याचा हटवादीपणा दिसतो. तशीच अधिसूचनेच्या दोन दिवस आधीपर्यंत उमेदवाराचा शोध सुरु ठेवावा लागण्याची हतबलता देखील दिसून येत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव