शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: भरकटलेले भाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 06:38 IST

जीवनमरणाच्या लढाईत असे भरकटलेले भाई हे अस्तनीतील निखाऱ्यांपेक्षा कमी नाहीत.

राजकारणाचा एक साधा, सोपा नियम आहे की, एकाचवेळी दहा शत्रू निर्माण करून त्यांना अंगावर घेऊ नये. मात्र, खेडचे भाई अर्थात रामदास कदम यांच्या पक्षांतर्गत राजकीय शत्रूंची यादी तयार केली तर ती बरीच मोठी होईल. पोटावर पँट, पांढरा हाफ शर्ट, कपाळावर ठळक लाल टिळा, सफेद दाढी आणि विरोधकांना अंगावर घेण्याची खुमखुमी हे भाईंचे वैशिष्ट्य. रामदास कदम हे बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्रमक शिवसेनेचे शिवसैनिक. उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शिवसेनेतील अनेक आक्रमक चेहरे लुप्त झाले. नारायण राणे यांनी २००५ साली बंड केले नसते तर कदाचित कदम हेही आतापर्यंत इतिहासजमा झाले असते; परंतु राणे यांच्यासारखा अत्यंत आक्रमक नेता विरोधात उभा राहिल्यावर सुभाष देसाईंसारखा नेमस्त नेता त्यांच्यासमोर उभा करून चालणार नाही हे उद्धव यांच्या लक्षात आल्याने कदम यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडली. त्या काळात ‘कोंबडी चोर’च्या आरोपाचा तोंडपट्टा भाईंनी चालवला म्हणून त्यांना भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यावर मंत्रिपद दिले गेले. मुलास आमदारकी मिळाली. कदम यांना शिवसेना-भाजप युतीच्या पहिल्या सरकारमध्ये गृहराज्यमंत्रीपद दिले होते. नंतर पर्यावरण मंत्री केले (सध्या हे खाते आदित्य ठाकरे स्वत: सांभाळतात), विरोधी पक्षनेतेपद दिले होते. 

विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अनंत गिते यांच्यावर तोंडसुख घेऊनही ठाकरे यांनी त्यांना विधान परिषदेवर पाठविले. ज्या पक्षाने कदम यांना इतके सारे काही दिले त्या पक्षावर त्यांनी टीका केली. एकेकाळी बाळासाहेब यांचे सहकारी मनोहर जोशी, लीलाधर डाके, दत्ताजी साळवी, दत्ताजी नलावडे आदी होते. उद्धव यांचा राजकारणात उदय झाल्यानंतर वयाची ६५ ते ७० वर्षे पूर्ण झालेल्या शिवसेनेतील नेत्यांनी स्वत:हून राजकारणातून दूर व्हावे, अशी भूमिका खुद्द बाळासाहेबांनी घेतली होती. उद्धव यांच्यासोबत असलेले मिलिंद नार्वेकर, संजय राऊत, अनिल परब, डॉ. नीलम गोऱ्हे वगैरे मंडळी ही त्यांच्या विचारांना व कार्यशैलीला अनुकूल  आहेत. पक्षप्रमुख या नात्याने आपल्याला हवी ती टीम सोबत ठेवण्याचा उद्धव यांना पूर्ण अधिकार आहे. भविष्यात आदित्य ठाकरे जेव्हा शिवसेनेची सूत्रे हाती घेतील तेव्हा वरुण सरदेसाई वगैरे मंडळी ही नार्वेकर-राऊत यांची जागा आपसूक घेणार हे उघड आहे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र, कदम यांची सत्तेची भूक संपली नसल्याने त्यांनी हे आकांडतांडव केले. अनिल परब यांच्या विरोधात काही महिन्यांपूर्वी किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. याबाबतचा तपशील कदम यांनी पुरवल्यासंबंधीची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. परब यांच्याबाबत कदम यांनी व्यक्त केलेली आकसपूर्ण विधाने व परब यांनी धोरणीपणे कदम यांच्या आरोपाबाबत बाळगलेले मौन पाहता छत्रपतींची शपथ घेऊन कदम यांनी आपण सोमय्या यांना कागदपत्रे पुरविली नसल्याचा दावा केला असला तरी तो तकलादू असल्याचेच वाटते. 

आपला पुत्र शिवसेनेचा आमदार असतानाही कदम यांनी घेतलेली टोकाची भूमिका पाहता ते स्वप्रेमात आकंठ बुडालेले असून, दोन पुत्रांची व स्वत:ची राजकीय व्यवस्था लावण्याकरिता धडपडत असल्याचे स्पष्ट जाणवते. सूर्यकांत दळवी यांच्याशी कदम यांचा जुना दावा आहे. औरंगाबादचे पालकमंत्री असताना कदम यांचे चंद्रकांत खैरे यांच्याशीही खटके उडाले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये आपल्याला मंत्री न करताना सुभाष देसाई यांना संधी दिल्याने भाईंचा पापड मोडला. मिलिंद नार्वेकर, अनिल परब अशा अनेकांशी त्यांचा संघर्ष झाला आहे. या संपूर्ण वादात हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी केलेले विधान दखलपात्र आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये केवळ शिवसेनेचा वापर केला जात असल्याची त्यांची खंत आहे. राजकारण असो की जीवनाचे कुठलेही अंग; एकजण दुसऱ्याचा आपल्या स्वार्थाकरिता वापर करून घेण्याचा प्रयत्न करीतच असतो. महाविकास आघाडीचे सरकार भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता स्थापन झाले आहे. भाजप पुन्हा सत्तेत आला असता तर कदाचित शिवसेनेला पोटाशी घेऊन अस्तित्व संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला गेला असता, अशी भीती शिवसेनेला वाटत होती. अपरिहार्यतेतून निर्माण होणाऱ्या सरकारमध्ये तडजोडी कराव्याच लागतात हे दीर्घकाळ राजकारणात वावरणाऱ्या नेत्यांना वेगळे सांगायला नको. जीवनमरणाच्या लढाईत असे भरकटलेले भाई हे अस्तनीतील निखाऱ्यांपेक्षा कमी नाहीत. 

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदम