शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थान : पहिली फेरी, विजेता : अशोक गेहलोत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 05:54 IST

सध्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाला व त्यायोगे त्यांच्या खुर्चीलाच आतापर्यंतचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी थेट आव्हान दिल्यानंतर साऱ्या देशाचे लक्ष जयपूरकडे लागले.

- भारतकुमार राऊत(ज्येष्ठ पत्रकार)एका बाजूला सारा देश कोविड-१९च्या संकटाशी लढत असतानाच राजस्थानात सत्तासंघर्ष टिपेला पोहोचला आहे. कुस्तीच्या व्यूहरचनेत आधी खडाखडी झाल्यानंतर शेवटी मल्ल एकमेकांना थेट भिडतात व हातघाईची लढाई सुरू होते. राजस्थानात काहीशी तशीच परिस्थिती येत्या दोन-चार दिवसांत सुरू होईल, अशी चिन्हे आहेत.सध्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाला व त्यायोगे त्यांच्या खुर्चीलाच आतापर्यंतचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी थेट आव्हान दिल्यानंतर साऱ्या देशाचे लक्ष जयपूरकडे लागले. गेले दहा दिवस चाललेल्या या युद्धात सध्या तरी गेहलोत यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केलेले दिसते. त्यामुळेच त्यांनी पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरून तर हटवलेच, शिवाय त्यांची राजस्थान प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावरूनही उचलबांगडी केली. याचाच अर्थ आता काँग्रेस पायलट यांच्याशी तह करण्याच्या मन:स्थितीत नाही.जर परिस्थिती अशीच राहिली, तर पायलट यांच्या पाठीशी उघडपणे उभ्या राहिलेल्या दोन मंत्र्यांनाही शिस्तभंगाचा बडगा सोसावा लागेल. काँग्रेसमध्ये राजीव गांधी व त्यांच्यापाठोपाठ राहुल गांधी यांच्या वर्चस्वाचे युग सुरू झाल्यानंतर ज्या नेतृत्वाचा उदय होऊन वेगाने विकास झाला, त्यात मध्य प्रदेशचे ज्योतिरादित्य शिंदे, राजस्थानातील सचिन पायलट, मुंबईतील मिलिंद देवरा यांचा समावेश होता. या तिघांचेही वडील इंदिरा व राजीव गांधी यांच्या जमान्यात मोठे झाले. तिघांचेही अकाली निधन झाल्याने त्यांची पुढली पिढी सत्तेच्या रिंगणात आली व प्रस्थापितही झाली. या तिन्ही नेत्यांना आपण ‘यंग टर्क’ व ‘युवक नेते’ म्हणत असलो, तरी ते तिघे चाळीशी ओलांडलेले नेते आहेत. अर्थात सत्तरीच्या घरातील गेहलोत यांच्या मानाने पायलट युवकच!पायलट यांनी बंडाचा झेंडा का उभारला, याचा विचार करायचा, तर त्यांचा २००८-०९ पासूनचा इतिहास पाहायला लागेल. जिथे भाजपने आपला जम बसवला होता, अशा राजस्थानातून लोकसभेवर निवडून गेलेल्या पायलट यांनी दिल्लीत जम बसवतानाच राजस्थानवरही लक्ष ठेवले, पण त्या काळात सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाची एकहाती सत्ता आल्याने पक्षात जुने-जाणते विरुद्ध तरुण तुर्क असे छुपे युद्ध सुरू झाले. त्यात अनेक तरुणांचा राजकीय बळी गेला. त्याचाच एक परिणाम म्हणून ज्योतिरादित्यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपचा झेंडा हाती घेतला.एका बाजूला जुनी मंडळी हातातले बॅटन सोडायला तयार नाहीत व दुसºया बाजूला राहुल गांधी स्वत:च्या नेतृत्वाला भविष्यात शह देऊ शकेल, अशांचा विचारही करायला तयार नाहीत; त्यामुळे मध्य प्रदेशात जेमतेम बहुमत मिळाल्यावरही सोनिया व राहुलजींनी तरुण नेत्याचा विचार न करता कमलनाथ या गांधी घराण्याला निष्ठा वाहिलेल्या जुन्या नेत्याकडेच जबाबदारी दिली. मध्य प्रदेशात काँग्रेसकडे १५ वर्षांनंतर सत्ता आली होती. अशावेळी जुनी पाटी पुसून नव्याने सुरुवात करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात जुन्यांनीच पुन्हा सत्ता बळकावल्या. त्यामुळे ज्योतिरादित्य बाहेर पडले.

राजस्थानात २०१३ मध्ये काँग्रेसचा भाजपने दारुण पराभव केला, तेव्हा गेहलोत मुख्यमंत्री होते. यावेळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पायलट यांनी दिल्लीतून आपला मुक्काम हलवला व पुढील पाच वर्षे राजस्थानावरच लक्ष केंद्रित केले. राज्याच्या सर्वच्या सर्व १०० मतदारसंघांत त्यांनी दौरे केले. कार्यकर्ते पुन्हा संघटित केले व तेव्हाच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेंविरुद्ध मोर्चेबांधणी केली. त्याचा परिणाम म्हणूनच गतवर्षी विधानसभा निवडणुकीत राजस्थानात भाजपचा भक्कम गड ढासळला व काँग्रेसची पुन्हा सत्ता आली. याचवेळी २०१९च्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या होत्या.खरे तर पक्षश्रेष्ठींनी कमान पायलट यांच्या हाती द्यायला हवी होती, पण पुन्हा तोच प्रश्न उभा राहिला. पायलट यांनी भविष्यात गांधी परिवाराला (विशेषत: राहुल गांधींनाच) आव्हान उभे केले तर काय? ६९ वर्षांच्या गेहलोत यांना पुन्हा आणले गेले. पायलट उपमुख्यमंत्री झाले खरे, पण हाती सत्ता काहीच नाही. त्यांच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यक्रमपत्रिकांवरही पायलट यांचे नाव नसायचे व खात्याच्याही फायली थेट मुख्यमंत्र्यांकडे जाव्यात, असे आदेश निघाले. त्यामुळेच पायलट यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असावा.प्रारंभी त्यांच्यासोबत पक्षाचे ३० आमदार होते. इतके आमदार सदस्यत्वाचा राजीनामा देण्यास तयार झाले, तर गेहलोत सरकार अल्पमतात गेले असते. कारण काँग्रेसची सदस्यसंख्या २०० सदस्यांच्या सभागृहात १०७ इतकीच आहे, पण इथे गेहलोत यांचा अनुभव कामी आला. त्यांनी तातडीने विधिमंडळ काँग्रेसची अधिकृत बैठक बोलावली व त्यास उपस्थित असलेल्या सदस्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते चित्रणच जाहीर केले. इथेच डाव पलटला व आतापर्यंत आत्मविश्वास दाखवत असलेले पायलट अचानक बचावात्मक पवित्रा घेत बॅकफूटवर जाताना दिसले.‘मी भाजपमध्ये कधीही जाणार नाही,’ असेच पायलट यांनी जाहीर केल्याने भाजप व पायलट यांच्यासमोरही मर्यादित पर्याय शिल्लक आहेत. पायलट यांना मुख्यमंत्रीच व्हायचे आहे, हे नक्की. अशावेळी ७२ आमदार असलेल्या भाजपला जेमतेम १५ सदस्यवाल्या पायलट यांच्या बंडखोर गटाला बाहेरून पाठिंबा द्यावा लागेल. शिवाय जर गेहलोत यांच्या काँग्रेसने विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करून बंडखोरांचे सदस्यत्वच रद्द होण्याची तजवीज केली, तर पुन्हा निवडून येईपर्यंत पायलट व त्यांच्या साथीदारांना काहीही करता येणार नाही. थोडक्यात, गेहलोत यांनी शिताफीने लढाईची पहिली फेरी तर जिंकली आहे. पुढे काय होते, ते पाहायचे.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतSachin Pilotसचिन पायलटRajasthanराजस्थान