शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

रेल्वे खासगीच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 5:58 AM

मुंबईत मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे़ बुलेट ट्रेनच्या जमीन अधिग्रहणासाठी सरकार उत्सुक आहे़

मुंबईत मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे़ बुलेट ट्रेनच्या जमीन अधिग्रहणासाठी सरकार उत्सुक आहे़ लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या सेवेतील, खाद्यपदार्थांमधील दर्जा वाढविण्याबाबत कार्यवाही सुरू आहे़ एकीकडे हे सारे घडत असताना ७५ लाख मुंबईकर प्रवाशांच्या जिवाची मात्र रेल्वेला काळजी आहे की नाही, असे चित्र निर्माण झाले आहे़ मुंबईकरांचा सोशिकपणा प्रचंड आहे, पण अन्य ठिकाणच्या उपनगरी सेवा वेगाने सुधारत असताना मुंबईच्या उपनगरी सेवेकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत आहे़ या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या उपायांवर चर्चा करण्यासाठी परवा मुंबई उच्च न्यायालयाने खासगीकरणाचा उपाय सुचविला़ तसेच मुंबईसाठी स्वतंत्र मंडळाचाही विचार करण्याची सूचना केली़ विमानतळाचे खासगीकरण झाल्याने स्पर्धा वाढली आणि प्रवाशांना दर्जेदार सेवा मिळू लागली. त्याच धर्तीवर रेल्वेच्या खासगीकरणाची न्यायालयाची सूचना आहे़याआधीही हा विषय चर्चेला आला होता़ त्यावर निर्णय घेण्याचे धाडस कोणत्याच सरकारला झाले नाही़ कारण देशातील रेल्वे प्रवाशांच्या संख्येतील जवळपास दहा टक्के प्रवासी याच विभागात असल्याने रेल्वेला सर्वाधिक महसूल मुंबई विभागातून मिळतो़ लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांतून मुंबईत येणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे़ त्यामुळे मुंबईतील रेल्वेमार्गाचा विकास अधिक चांगला व दर्जेदार होणे आवश्यक आहे़ मुंबईतून मिळणाºया महसुलातील किती वाटा येथील विकासावर खर्च होतो, हा संशोधनाचा विषय ठरेल़ रेल्वेच्या पादचारी पुलावरील चेंगराचेंगरी, पादचारी पूल पडल्यावर प्रवाशांचा बळी गेल्यानंतर रेल्वेसेवा सुधारणा, त्यातील सुरक्षेसाठी कोट्यवधी रुपयांचे पॅकेज जाहीर होते़ पण त्यातील कामे जलदगतीने होत नाहीत़ ती झाली, तरी त्यांच्या दर्जाचा प्रश्न येतो. न्यायालयाने फटकारल्याशिवाय सरकार काम करत नाही, हा आजवरचा इतिहास आहे़ त्यामुळे रेल्वेच्या खासगीकरणाचा मुद्दा न्यायालयानेच उपस्थित केल्याने यावर गांभीर्याने विचार करण्याची, निर्णय घेण्याची वेळ आली आहे़ रेल्वेच्या उपनगरी सेवेचे विभाजन झाले, खासगीकरण झाले, तर त्यातून दर्जा सुधारेल; उत्तरदायित्व वाढेल ही भूमिका वारंवार मांडली गेली. मुंबईचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला दिल्लीत का जावे लागते, असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला. रेल्वेमंत्री पीयूष गोयल मुंबईचेच असल्याने त्यांना ७५ लाख उपनगरी प्रवाशांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे त्यांनीच खासगीकरणामागची भूमिका समजावून घेत शक्य त्या सेवांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव पुढे रेटायला हवा़ त्यातून प्रश्न कमी होतील आणि सेवा सुधारण्याचे पाऊल पुढे पडेल.