शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ये तो चलता ही है

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 05:24 IST

भरतीचा मुद्दा पुढे रेटत जादा कामाला नकार देऊन मोटरमननी शुक्रवारी केलेले आंदोलन आश्वासन पदरी घेऊन पार पडले. वस्तुत: व्यवस्थापनाशी थेट चर्चा करूनही हा प्रश्न सोडवता आला असता.

भरतीचा मुद्दा पुढे रेटत जादा कामाला नकार देऊन मोटरमननी शुक्रवारी केलेले आंदोलन आश्वासन पदरी घेऊन पार पडले. वस्तुत: व्यवस्थापनाशी थेट चर्चा करूनही हा प्रश्न सोडवता आला असता. त्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील ३५ लाख प्रवाशांना वेठीला धरण्याची आवश्यकता नव्हती. पण दिवसभर प्रवाशांना एकप्रकारे ओलीस ठेवत मोटरमन संघटनेने मागण्या रेटल्या. ज्या प्रवाशांच्या जिवावर ही रेल्वेसेवा सुरू आहे, त्यांची परवड होऊ न देण्याचा मार्ग दोन्ही बाजूंनी स्वीकारायला हवा होता, पण प्रवाशांचे हाल झाल्यानंतरच प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष जाते, असा पायंडा पडल्यासारखी परिस्थिती रेल्वे संघटनांनी निर्माण केल्याचे प्रत्यंतर यातून आले. यात २०० पेक्षा अधिक फेऱ्या रद्द झाल्यानंतरही विभागीय व्यवस्थापकांनी ‘ये तो चलता ही रहता है’ असे त्याचे केलेले समर्थन चीड आणणारे आहे. मोटरमनवर पडणारा कामाचा ताण हा पूर्वीही चर्चेत आलेला विषय आहे. कामाच्या तासात सरासरी १५ मिनिटे वाढवण्याच्या मुद्द्यावर असेच प्रवासी वेठीला धरले होते. कधी मोटरमन, कधी गार्ड; तर कधी अन्य कर्मचारी आंदोलन करून या पद्धतीने लाखो प्रवाशांची पर्यायाने देशाच्या आर्थिक राजधानीची कोंडी करतात आणि सारी व्यवस्था निमूटपणे हे पाहत राहते, हे दुर्दैवी आहे. रेल्वे विस्कळीत झाली की मुंबईची वाहतूक व्यवस्था विकलांग होते हे ठाऊक असल्याने तिला वारंवार लक्ष्य केले जाते. असे आंदोलन प्रवाशांनी केले तर त्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यास तत्पर असलेले रेल्वे प्रशासन कर्मचाºयांबाबत तसे पाऊल उचलत नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरही कारवाई होत नाही. त्यातून प्रवाशांचे नाक दाबून प्रशासनाचे तोंड उघडण्याचा निर्ढावलेपणा वाढत जातो. यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित. लाल सिग्नल ओलांडल्यावर होणाºया कारवाईला केलेल्या विरोधाचा. रेल्वेतच नव्हे, तर रस्त्यावरही तुम्ही सिग्नल ओलांडला तर दंडाची-कारवाईची व्यवस्था आहे. शिस्त लावणे हा त्यामागचा हेतू आहे. रेल्वेत तर सिग्नल ओलांडल्याने लोकलवर लोकल आदळणे, फलाटावर गाड्या चढणे, मार्ग बदलण्यासारख्या दुर्घटना घडल्या आहेत. त्याबाबत कारवाई करू नका, असे म्हणणे आणि सिग्नल तोडण्याचे समर्थन करणे मुळात गैर होते, पण ते केले गेले आणि कारवाईला विरोध झाला. यातून भविष्यात जर भीषण दुर्घटना घडली, तर त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार याचे उत्तर देत प्रशासनाने ही मागणी सार्वजनिकरीत्या प्रवाशांपुढे चर्चेला ठेवावी. आजवरच्या रेल्वे दुर्घटनांचे अहवाल वेळेत आलेले नाहीत, आलेच तर त्यातील दोषींवर कठोर कारवाई झालेली नाही, ती करण्याचा प्रयत्न झाला तर संघटितपणे विरोध केला जातो. या वातावरणात चुकीच्या मागण्या रेटण्याची प्रवृत्ती वाढली नसती तरच नवल. आता मागण्या पदरी पडल्याने वाहतूक सुधारेल ही अपेक्षाही करणे गैर आहे. कारण त्यातून पुन्हा दोषारोप सुरू होतील. त्याचेच दर्शन या आंदोलनातही झाले, इतकेच!

टॅग्स :MumbaiमुंबईMumbai Localमुंबई लोकलcentral railwayमध्य रेल्वे