शहरं
Join us  
Trending Stories
1
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
2
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
3
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
4
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
5
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
6
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
7
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
8
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
9
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
10
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
11
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
12
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
13
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...
14
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
15
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
16
२२ सप्टेंबरपासून स्वस्त होणार LPG सिलेंडर? GST कपातीनंतर ग्राहकांना मिळणार दिलासा, समोर येतेय अशी माहिती
17
काजोलने पुन्हा मोडली 'नो-किसिंग पॉलिसी', 'द ट्रायल २'मध्ये ऑनस्क्रीन पतीला केलं किस, व्हिडीओ व्हायरल
18
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
19
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
20
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO

सावळ्यागोंधळावर ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 03:41 IST

अंधेरीतील पादचारी पूल कोसळण्यास रेल्वे कर्मचाऱ्यांचा ढिसाळ कारभार कारणीभूत असल्याचा ठपका रेल्वेच्या सुरक्षा समितीने ठेवल्याने या प्रकरणातील जबाबदारीची टोलवाटोलवी आता संपेल, अशी आशा आहे.

अंधेरीतील पादचारी पूल कोसळण्यास रेल्वे कर्मचाऱ्यांचा ढिसाळ कारभार कारणीभूत असल्याचा ठपका रेल्वेच्या सुरक्षा समितीने ठेवल्याने या प्रकरणातील जबाबदारीची टोलवाटोलवी आता संपेल, अशी आशा आहे. आम्ही दुरुस्ती-देखभालीचे पैसे देत होतो, असे सांगत रेल्वेवर जबाबदारी टाकून मुंबई महापालिकेचे अधिकारी मोकळे झाले असले; तरी त्यांनीही पादचारी पुलावर क्षमतेपेक्षा ४४ टक्के म्हणजेच १२४ टनांचा अतिरिक्त भार टाकल्याने त्यांनाही या प्रकरणात दोषी धरण्यात आले आहे. अर्थात हा झाला चौकशीचा प्राथमिक भाग. त्याचा अहवाल सादर होताच पालिकेच्या अधिकाºयांनी पुन्हा रेल्वेकडे आणि रेल्वेच्या अधिकाºयांनी पुन्हा पालिकेकडे बोट दाखवत परस्परांवर चिखलफेक केलीच. त्यामुळे या अहवालाच्या आधारे कारवाई काय होणार हा पश्चिम रेल्वेवरील ३५ लाख प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे. गोखले पुलाला लागून असलेल्या पादचारी पुलावर वाळू, सिमेंट, पेव्हर ब्लॉक, केबल यांचे वजन वाढत गेले. त्यातून पूल वाकला आणि नंतर तो कोसळून एका पादचारी महिलेचा मृत्यू झाला, तर चौघे जखमी झाले आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक दिवसभरासाठी ठप्प झाली. तरीही या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. या अहवालानंतर तो दाखल होईल, अशी अपेक्षा आहे. पालिकेने कोणाच्या आदेशाने पुलावर वजन वाढवले, ते स्पष्टपणे समोर यायला हवे. तसेच ते वाढवले जात असताना रेल्वेचे अधिकारी झोपले होते का, या न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरही समोर यायला हवे; तरच या चौकशीला अर्थ राहील. अन्यथा हाही दोषी आणि तोही दोषी या पद्धतीने अहवालाचा फक्त सोपस्कार उरकला जाईल. या दुर्घटनेनंतर जवळपास पाचशे पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटचा निर्णय झाला. उच्च न्यायालयाने रेल्वे, राज्य सरकार आणि पालिकेची कानउघाडणी केल्यानंतर या यंत्रणांनी परस्परांकडे बोट न दाखवता नेमक्या काय उपाययोजना करता येतील, यावर लक्ष केंद्रित केले. अंधेरीतील घटनेनंतर तीन ते चार पुलांना तडे गेल्याचे लक्षात आल्याने वाहतूक थांबवावी लागण्याच्या घटना घडल्या. अजूनही मुंबईत रेल्वेवरून जाणाºया पुलांत दादरचा टिळक पूल, करी रोड, चिंचपोकळी रेल्वे स्थानकांवरील उड्डाणपूल, भायखळ्याचा एस ब्रिज यांचा समावेश आहे. त्यांच्या दुरुस्तीचा निर्णय लवकरात लवकर व्हायला हवा. अहवालानंतर रेल्वे दोषी की पालिका, एवढ्यापुरता हा विषय मर्यादित न राहतानेमके विभाग-अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित व्हायला हवी. तसे झाले तरच वेगवेगळ्या यंत्रणांच्या अखत्यारीतील प्रकल्प, त्यांच्या दुरुस्ती-देखभालीतील सावळा गोंधळ रोखला जाईल. अंधेरीत घडले त्याप्रमाणे पुलावर अतिरिक्त भार टाकण्यापूर्वी संबंधित यंत्रणांनीत्याची कल्पना परस्परांना देण्याचा पायंडा पडेल. प्रवाशांच्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे.

टॅग्स :Andheri Bridge Collapsedअंधेरी पूल दुर्घटनाrailwayरेल्वे