शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 09:13 IST

ते (राहुल गांधी) दावा करतात त्याप्रमाणे त्यांच्याकडे ठोस पुरावे असतील तर त्यांनी हे प्रकरण तडीस न्यायला हवे. त्यासाठी शपथेवर आरोप करण्याचे निवडणूक आयोगाचे आव्हान स्वीकारायला हवे आणि आयोगानेही या आरोपांची चाैकशी गंभीरपणे, नीरक्षीरविवेक बुद्धीने करावी. जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काश्मीरमधील दहशतवाद्यांचा खात्मा करणारे ऑपरेशन महादेव गाजले, तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेतील घोटाळ्याशी संबंधित महादेवपुरा नावाचा बाॅम्ब गुरुवारी टाकला. महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात लाखावर मताधिक्यामुळेच कर्नाटकातील मध्य बंगळुरू लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला विजय मिळाला आणि त्या विधानसभा मतदारसंघात जवळपास १ लाख मतांचा घोळ झाला, असा राहुल गांधी यांचा आरोप आहे. 

ते म्हणतात, आपल्या एका चमूने जवळपास सहा महिने तिथल्या हजारो पानांच्या मतदार यादीचे पान न् पान धुंडाळले, तेव्हा त्यात मोठा गोंधळ झाल्याचे लक्षात आले. डुप्लिकेट मतदार, खोटे किंवा संशयास्पद पत्ते, पन्नास-साठ, ऐंशी मतदारांचा एकच पत्ता, मतदार यादीत फोटोंचा गोंधळ आणि पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी भरल्या जाणाऱ्या ६ क्रमांकाच्या फाॅर्मचा गैरवापर अशा स्वरूपाचा हा गोंधळ असून, ही एकप्रकारे व्होटचोरी आहे, असे गांधी म्हणतात. हा सरळसरळ भारतीय राज्यघटना व लोकशाहीवर हल्ला असून, त्यामागे निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची मिली भगत असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप आहे. या ‘ऑपरेशन महादेवपुरा’शी त्यांनी महाराष्ट्र, हरयाणा विधानसभा निवडणुकीचाही संबंध जोडला आहे. निवडणूक आयोग ही घटनात्मक व स्वायत्त संस्था आहे, तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी हेदेखील घटनात्मक पदावर आहेत. थोडक्यात, मामला खूपच गंभीर आहे. विरोधी पक्षांचा आरोप आहे की, त्यांच्याशी आयोगाची वागणूक पूर्वग्रहदूषित, आकसपूर्ण आहे. 

महाराष्ट्र व हरयाणा विधानसभा निवडणुकीनंतर लोकसभा ते विधानसभा निवडणुकीदरम्यान पाच महिन्यांमध्ये वाढलेले लाखो मतदार, मतदानाच्या दिवशी उशिरा झालेले मोठे मतदान याविषयी प्रश्न उपस्थित करताच ४५ दिवसांत सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्यासारखे निर्णय आयोगाने घेतले, या आरोपाचा राहुल गांधी यांनी गुरुवारी पुनरुच्चार केला. आपण वारंवार डिजिटल मतदार यादीची मागणी करीत आहोत, जेणेकरून तिच्यातील गोंधळ शोधता येईल. परंतु, आयोग ती यादी देण्यास टाळाटाळ करीत आहे, असाही आरोप आहे. या आरोपांना निवडणूक आयोग, तसेच भाजपच्या नेत्यांनी दिलेले उत्तर वैशिष्ट्यपूर्ण आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बहुतेक भाजप नेत्यांनी हे आरोप हसण्यावारी नेले आहेत. राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे. सोशल मीडियावर जसे ट्रोल केले जाते तसे त्यांना वेडा ठरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तथापि, हे आरोप गंभीर आहेत. हे प्रकरण ट्रोलिंगने संपणारे नाही. पक्षीय राजकारणातील हेवेदावे व स्पर्धा बाजूला ठेवून या प्रकरणाकडे पाहायला हवे. नेते तसे पाहात नसले तरी मतदार नक्कीच तसा विचार करणार. कारण, लोकशाही, त्यातील निवडणुका, निवडणूक आयोगाची विश्वासार्हता, मतदानाचा अधिकार, त्याचे पावित्र्य, कोट्यवधी भारतीयांचा या यंत्रणेवरील विश्वास, श्रद्धा हे सारे राजकीय आरोप-प्रत्यारोपापेक्षा मोठे आहे. 

लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केल्यामुळे लोकशाही आणि तिचे पावित्र्य पणाला लागले आहे. अशावेळी मतदान प्रक्रियेच्या रूपाने लोकशाहीचे संरक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या निवडणूक आयोगाने सामान्य भारतीयांच्या मनातील सर्व प्रकारच्या शंका दूर करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. तसे न करता कर्नाटक व महाराष्ट्राच्या निवडणूक आयुक्तांनी उलट राहुल गांधी यांनाच आव्हान दिले आहे की, त्यांनी हे आरोप शपथेवर करावेत. शपथेवर आरोप केले आणि ते खोटे निघाले तर कायद्यानुसार आरोप करणाऱ्याविरुद्ध फाैजदारी कारवाई करता येते. तेव्हा, लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यांना असे आव्हान देण्यामागे त्यात कारवाईची धमकी तर नाही ना, अशी शंका घेतली जाऊ शकते. आपण आधीच लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी या आव्हानाला उत्तर दिले असले तरी ते पुरेसे नाही. ते दावा करतात त्याप्रमाणे त्यांच्याकडे ठोस पुरावे असतील तर त्यांनी हे प्रकरण तडीस न्यायला हवे. त्यासाठी शपथेवर आरोप करण्याचे निवडणूक आयोगाचे आव्हान स्वीकारायला हवे आणि आयोगानेही या आरोपांची चाैकशी गंभीरपणे, नीरक्षीरविवेक बुद्धीने करावी. जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीElectionनिवडणूक 2024Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेस