शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

जागतिक तापमानवाढीचा हा वणवा विझवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 05:14 IST

संयुक्त राष्ट्रांनी यापूर्वी भारताद्वारे सादर करण्यात आलेल्या वनांच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

संयुक्त राष्ट्रांनी यापूर्वी भारताद्वारे सादर करण्यात आलेल्या वनांच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आकड्यांसोबतचा असा खेळ सरकारची गरज भागवत असला, तरी ते देशाच्या आणि जगाच्या हिताचे नाही. जंगलांशी संबंधित दोन घडामोडींनी गत आठवड्यात लक्ष वेधून घेतले. त्यापैकी एक घडामोड आपल्या देशाशी संबंधित आहे, तर दुसरी सुदूर ऑस्ट्रेलियातील! प्रथमदर्शनी या दोन घडामोडींमध्ये काहीही संबंध दिसत नाही; पण जरा खोलात जाऊन विचार केल्यास, संबंधही दिसतो आणि मानवजातीसाठी धोक्याचा इशारादेखील! त्यापैकी एक घडामोड म्हणजे ऑस्ट्रेलियात भडकलेला भीषण वणवा आणि दुसरी म्हणजे भारतातील वन आच्छादनात गत दोन वर्षांत पाच हजार चौरस किलोमीटरपेक्षाही जास्त वाढ झाल्याचा अहवाल! ऑस्ट्रेलियात वणवा भडकणे यामध्ये नवे काही नाही. त्या देशात दरवर्षीच वणवे भडकत असतात आणि अनेक दिवस धुमसतही असतात; परंतु या वर्षी भडकलेला वणवा अभूतपूर्वच म्हणावा लागेल. ऑस्ट्रेलियामधील आजवरचा सर्वांत मोठा असा हा वणवा तब्बल चार महिन्यांपासून धुमसत आहे आणि त्यामध्ये आतापर्यंत सुमारे ५० कोटी पशू-पक्षी होरपळून गतप्राण झाले आहेत.

ऑस्ट्रेलियात या विषयावरून वादंग माजले आणि हवामान बदल, तापमानवाढीकडे पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधले आहे. इंटर गव्हर्नमेंट पॅनल ऑन क्लायमेट चेंज म्हणजेच आयपीसीसीने एक दशकाच्याही आधी जागतिक तापमानवाढीमुळे ऑस्ट्रेलियातील वणव्यांचे प्रमाण आणि हानीमध्ये वाढ होणार असल्याचा निष्कर्ष काढला होता. तो खरा ठरताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाला भेडसावत असलेली ही समस्या आगामी काळात जगाच्या इतर भागांनाही कवेत घेऊ शकते. विशेषत: भारतासारख्या उष्ण कटिबंधातील देशाला तर हा धोका अधिकच संभवतो. या पार्श्वभूमीवर भारतासाठी सुखद म्हणता येईल, अशी एक बातमी आली आहे. ‘फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया’ या संस्थेचा अहवाल नुकताच जारी झाला आणि त्यानुसार भारतातील वन आच्छादनात गत दोन वर्षांत पाच हजार चौरस किलोमीटरपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. प्रथमदर्शनी ही आकडेवारी आशेचा किरण निर्माण करणारी वाटत असली तरी, त्यासाठी सरकारने निर्धारित केलेल्या मानकांचा वापर करण्यात आल्याच्या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तज्ज्ञांच्या मते, केवळ वनाच्छादित क्षेत्रातील वाढच महत्त्वाची नसते, तर जंगलांची गुणवत्ता त्यापेक्षाही जास्त महत्त्वाची असते. शेकडो वर्षांच्या कालखंडात नैसर्गिकरीत्या वाढलेले जंगल (ज्यामध्ये जलस्रोत, नद्या-नाले, मौल्यवान औषधी वनस्पतीसारख्या वनसंपदेचा समावेश असतो.) त्याची तुलना वृक्षारोपणाच्या माध्यमातून वाढवलेल्या एकलजातीय जंगलाशी केली जाऊ शकत नाही. अनेकदा नैसर्गिक जंगलातील वृक्षांची तोड करून आर्थिकदृष्ट्या लाभदायक वृक्षांची लागवड केली जाते. त्यामधून सरकारला महसूल मिळत असला तरी, पर्यावरणाची अपरिमित हानी होते.
संयुक्त राष्ट्रांनी यापूर्वी भारताने सादर केलेल्या वनांच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने ताज्या आकडेवारीवर कितपत विश्वास ठेवायचा हा प्रश्नच आहे. आकड्यांसोबतचा असा खेळ सरकारची गरज भागवत असला तरी, ते देशाच्या आणि जगाच्या हिताचे नाही. अलीकडे दिल्लीवासी दरवर्षीच हिवाळ्यात वाढत्या प्रदूषणाचा तडाखा सहन करतात. सध्या ते जात्यात असले तरी, तातडीने उपाययोजना न केल्यास, देशाच्या उर्वरित भागांचीही दिल्ली होण्यास वेळ लागणार नाही. ऑस्ट्रेलियातील निष्पाप पशू-पक्ष्यांच्या जागी उद्या मनुष्यही असू शकतात. ही बाब ध्यानात घेऊन, जागतिक तापमानवाढीचा वणवा विझविण्यासाठी तातडीने उपाय योजणे गरजेचे आहे. त्यासाठी भारतात सरकारी पातळीवर पावले उचलली जाण्याची अपेक्षा व्यर्थ असली तरी, न्यायालये संवेदनशील भूमिका घेत आहेत, ही समाधानाची बाब आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी या मुद्द्यावरून नवी मुंबई महापालिकेची चांगलीच खरडपट्टी काढली. खारफुटीअभावी ऑस्ट्रेलियात वणवा भडकला आहे आणि तुम्ही खारफुटी वाचविण्यासाठी काहीच करीत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. सर्व काही संपलेले नाही, असा दिलासा न्यायालयाच्या या भूमिकेमुळे नक्कीच मिळाला आहे.