शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक तापमानवाढीचा हा वणवा विझवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 05:14 IST

संयुक्त राष्ट्रांनी यापूर्वी भारताद्वारे सादर करण्यात आलेल्या वनांच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

संयुक्त राष्ट्रांनी यापूर्वी भारताद्वारे सादर करण्यात आलेल्या वनांच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आकड्यांसोबतचा असा खेळ सरकारची गरज भागवत असला, तरी ते देशाच्या आणि जगाच्या हिताचे नाही. जंगलांशी संबंधित दोन घडामोडींनी गत आठवड्यात लक्ष वेधून घेतले. त्यापैकी एक घडामोड आपल्या देशाशी संबंधित आहे, तर दुसरी सुदूर ऑस्ट्रेलियातील! प्रथमदर्शनी या दोन घडामोडींमध्ये काहीही संबंध दिसत नाही; पण जरा खोलात जाऊन विचार केल्यास, संबंधही दिसतो आणि मानवजातीसाठी धोक्याचा इशारादेखील! त्यापैकी एक घडामोड म्हणजे ऑस्ट्रेलियात भडकलेला भीषण वणवा आणि दुसरी म्हणजे भारतातील वन आच्छादनात गत दोन वर्षांत पाच हजार चौरस किलोमीटरपेक्षाही जास्त वाढ झाल्याचा अहवाल! ऑस्ट्रेलियात वणवा भडकणे यामध्ये नवे काही नाही. त्या देशात दरवर्षीच वणवे भडकत असतात आणि अनेक दिवस धुमसतही असतात; परंतु या वर्षी भडकलेला वणवा अभूतपूर्वच म्हणावा लागेल. ऑस्ट्रेलियामधील आजवरचा सर्वांत मोठा असा हा वणवा तब्बल चार महिन्यांपासून धुमसत आहे आणि त्यामध्ये आतापर्यंत सुमारे ५० कोटी पशू-पक्षी होरपळून गतप्राण झाले आहेत.

ऑस्ट्रेलियात या विषयावरून वादंग माजले आणि हवामान बदल, तापमानवाढीकडे पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधले आहे. इंटर गव्हर्नमेंट पॅनल ऑन क्लायमेट चेंज म्हणजेच आयपीसीसीने एक दशकाच्याही आधी जागतिक तापमानवाढीमुळे ऑस्ट्रेलियातील वणव्यांचे प्रमाण आणि हानीमध्ये वाढ होणार असल्याचा निष्कर्ष काढला होता. तो खरा ठरताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाला भेडसावत असलेली ही समस्या आगामी काळात जगाच्या इतर भागांनाही कवेत घेऊ शकते. विशेषत: भारतासारख्या उष्ण कटिबंधातील देशाला तर हा धोका अधिकच संभवतो. या पार्श्वभूमीवर भारतासाठी सुखद म्हणता येईल, अशी एक बातमी आली आहे. ‘फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया’ या संस्थेचा अहवाल नुकताच जारी झाला आणि त्यानुसार भारतातील वन आच्छादनात गत दोन वर्षांत पाच हजार चौरस किलोमीटरपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. प्रथमदर्शनी ही आकडेवारी आशेचा किरण निर्माण करणारी वाटत असली तरी, त्यासाठी सरकारने निर्धारित केलेल्या मानकांचा वापर करण्यात आल्याच्या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तज्ज्ञांच्या मते, केवळ वनाच्छादित क्षेत्रातील वाढच महत्त्वाची नसते, तर जंगलांची गुणवत्ता त्यापेक्षाही जास्त महत्त्वाची असते. शेकडो वर्षांच्या कालखंडात नैसर्गिकरीत्या वाढलेले जंगल (ज्यामध्ये जलस्रोत, नद्या-नाले, मौल्यवान औषधी वनस्पतीसारख्या वनसंपदेचा समावेश असतो.) त्याची तुलना वृक्षारोपणाच्या माध्यमातून वाढवलेल्या एकलजातीय जंगलाशी केली जाऊ शकत नाही. अनेकदा नैसर्गिक जंगलातील वृक्षांची तोड करून आर्थिकदृष्ट्या लाभदायक वृक्षांची लागवड केली जाते. त्यामधून सरकारला महसूल मिळत असला तरी, पर्यावरणाची अपरिमित हानी होते.
संयुक्त राष्ट्रांनी यापूर्वी भारताने सादर केलेल्या वनांच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने ताज्या आकडेवारीवर कितपत विश्वास ठेवायचा हा प्रश्नच आहे. आकड्यांसोबतचा असा खेळ सरकारची गरज भागवत असला तरी, ते देशाच्या आणि जगाच्या हिताचे नाही. अलीकडे दिल्लीवासी दरवर्षीच हिवाळ्यात वाढत्या प्रदूषणाचा तडाखा सहन करतात. सध्या ते जात्यात असले तरी, तातडीने उपाययोजना न केल्यास, देशाच्या उर्वरित भागांचीही दिल्ली होण्यास वेळ लागणार नाही. ऑस्ट्रेलियातील निष्पाप पशू-पक्ष्यांच्या जागी उद्या मनुष्यही असू शकतात. ही बाब ध्यानात घेऊन, जागतिक तापमानवाढीचा वणवा विझविण्यासाठी तातडीने उपाय योजणे गरजेचे आहे. त्यासाठी भारतात सरकारी पातळीवर पावले उचलली जाण्याची अपेक्षा व्यर्थ असली तरी, न्यायालये संवेदनशील भूमिका घेत आहेत, ही समाधानाची बाब आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी या मुद्द्यावरून नवी मुंबई महापालिकेची चांगलीच खरडपट्टी काढली. खारफुटीअभावी ऑस्ट्रेलियात वणवा भडकला आहे आणि तुम्ही खारफुटी वाचविण्यासाठी काहीच करीत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. सर्व काही संपलेले नाही, असा दिलासा न्यायालयाच्या या भूमिकेमुळे नक्कीच मिळाला आहे.