शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

गुण नव्हे गुणवत्ता हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 04:19 IST

सरकार बदलले की भूमिका, निर्णय बदलायचे किंवा सत्तेत असताना एक भूमिका घ्यायची व विरोधी बाकावर बसल्यावर दुसरी भूमिका घ्यायची, अशा दुटप्पी राजकारणाला फाटा देऊन चांगल्या निर्णयाचा पाठपुरावा केला, तर त्यातून नक्कीच काही सकारात्मक हाती लागते, याचेच प्रत्यंतर ‘बालभारती’च्या दहावीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचे अवलोकन केले असता आले.

सरकार बदलले की भूमिका, निर्णय बदलायचे किंवा सत्तेत असताना एक भूमिका घ्यायची व विरोधी बाकावर बसल्यावर दुसरी भूमिका घ्यायची, अशा दुटप्पी राजकारणाला फाटा देऊन चांगल्या निर्णयाचा पाठपुरावा केला, तर त्यातून नक्कीच काही सकारात्मक हाती लागते, याचेच प्रत्यंतर ‘बालभारती’च्या दहावीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचे अवलोकन केले असता आले. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना शिक्षण हक्क कायदा लागू झाला व शिक्षणात ज्ञानरचनावादाला महत्त्व देण्याचा धोरणात्मक निर्णय झाला. एसएससीची परीक्षा देणारी मुले सीबीएसई, आयसीएसई बोर्डाची परीक्षा देणाऱ्या मुलांच्या तुलनेत पिछाडीवर राहतात, हे वास्तव हेरून राज्यातील काँग्रेस सरकारने अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय घेतला होता. राजेंद्र दर्डा शिक्षणमंत्री असताना त्यांनी २०१९ पर्यंत टप्प्याटप्प्याने अभ्यासक्रम कसा बदलायचा, याचे वेळापत्रक ठरवून दिले होते. दरम्यानच्या काळात राज्यात सत्ताबदल होऊन विनोद तावडे शिक्षणमंत्री झाले. त्यांनी त्याच निर्णयांचा पाठपुरावा केला व नवी ज्ञानरचनावादी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या हातात पडण्याचा मार्ग मोकळा झाला. एकेकाळी टीव्ही, संगणक, मोबाइल उपलब्ध नव्हते तेव्हा पुस्तके हाच ज्ञान मिळवण्याचा मार्ग होता. त्या वेळी हॅरी पॉटर किंवा अकबर-बिरबल यांच्या गोष्टी वाचल्यावर प्रत्येक मुलगा-मुलगी त्याच्या कल्पनेनुसार या व्यक्तिरेखा व त्यामधील प्रसंग डोळ्यांसमोर रंगवत होता. तंत्रज्ञानामुळे तरुण पिढीला अनेक गोष्टी सहज प्राप्त झाल्या. मात्र, त्यांची कल्पनाशक्ती क्षीण होत गेली. एकेकाळी वक्तृत्व, वादविवाद स्पर्धांमध्ये असलेली चुरस संपुष्टात आली, इतकेच नव्हे तर या स्पर्धा जवळपास बंद झाल्या. शाळा, क्लास किंवा अपेक्षित प्रश्नसंच पुस्तिकांमध्ये दिलेल्या उत्तरांची घोकंपट्टी करायची व तसेच्या तसे उत्तर लिहून पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे, असा सुलभ पॅटर्न रूढ झाला होता. नव्या अभ्यासक्रमात मुलांना वेगवेगळ्या विषयांवर स्वप्रतिभेतून व्यक्त व्हावे लागेल. जुनाट संकल्पना हद्दपार होऊन सध्याच्या जीवनातील आर्थिक, राजकीय, सामाजिक व्यवस्थेतील संकल्पनांची माहिती दिली जाणार असल्याने मुलांना तो अभ्यास हवाहवासा तर वाटेलच, पण भविष्यात रोजगाराभिमुख ठरेल. चित्रांचा वापर करून शिक्षण देण्यामुळे अनेक बाबींचे आकलन सहजगत्या होते. गणिताच्या परीक्षेत आतापर्यंत एखाद्याने वेगळी रीत वापरून अचूक उत्तर दिले, तरी त्याच्या नशिबी भोपळा येत होता. आता रीत नव्हे तर गणिताच्या गाभ्याचे आकलन विद्यार्थ्याला झाले आहे किंवा कसे, हे पाहिले जाणार आहे, ही खरोखरच नवी दृष्टी आहे. समाजशास्त्र व तत्सम विषयांमधील तोंडी परीक्षेचे हक्काचे गुण जाऊन त्याची जागा परीक्षेने घेतल्याने अव्वाच्या सव्वा गुणांचे डोंगर पुढील वर्षी पाहायला मिळणार नाहीत. या नव्या अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांचे गुण काही अंशी घटले तरी चालतील, पण गुणवत्ता वाढणे गरजेचे आहे.

टॅग्स :educationशैक्षणिकEducation Sectorशिक्षण क्षेत्रMaharashtraमहाराष्ट्र