शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

गुण नव्हे गुणवत्ता हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 04:19 IST

सरकार बदलले की भूमिका, निर्णय बदलायचे किंवा सत्तेत असताना एक भूमिका घ्यायची व विरोधी बाकावर बसल्यावर दुसरी भूमिका घ्यायची, अशा दुटप्पी राजकारणाला फाटा देऊन चांगल्या निर्णयाचा पाठपुरावा केला, तर त्यातून नक्कीच काही सकारात्मक हाती लागते, याचेच प्रत्यंतर ‘बालभारती’च्या दहावीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचे अवलोकन केले असता आले.

सरकार बदलले की भूमिका, निर्णय बदलायचे किंवा सत्तेत असताना एक भूमिका घ्यायची व विरोधी बाकावर बसल्यावर दुसरी भूमिका घ्यायची, अशा दुटप्पी राजकारणाला फाटा देऊन चांगल्या निर्णयाचा पाठपुरावा केला, तर त्यातून नक्कीच काही सकारात्मक हाती लागते, याचेच प्रत्यंतर ‘बालभारती’च्या दहावीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचे अवलोकन केले असता आले. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना शिक्षण हक्क कायदा लागू झाला व शिक्षणात ज्ञानरचनावादाला महत्त्व देण्याचा धोरणात्मक निर्णय झाला. एसएससीची परीक्षा देणारी मुले सीबीएसई, आयसीएसई बोर्डाची परीक्षा देणाऱ्या मुलांच्या तुलनेत पिछाडीवर राहतात, हे वास्तव हेरून राज्यातील काँग्रेस सरकारने अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय घेतला होता. राजेंद्र दर्डा शिक्षणमंत्री असताना त्यांनी २०१९ पर्यंत टप्प्याटप्प्याने अभ्यासक्रम कसा बदलायचा, याचे वेळापत्रक ठरवून दिले होते. दरम्यानच्या काळात राज्यात सत्ताबदल होऊन विनोद तावडे शिक्षणमंत्री झाले. त्यांनी त्याच निर्णयांचा पाठपुरावा केला व नवी ज्ञानरचनावादी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या हातात पडण्याचा मार्ग मोकळा झाला. एकेकाळी टीव्ही, संगणक, मोबाइल उपलब्ध नव्हते तेव्हा पुस्तके हाच ज्ञान मिळवण्याचा मार्ग होता. त्या वेळी हॅरी पॉटर किंवा अकबर-बिरबल यांच्या गोष्टी वाचल्यावर प्रत्येक मुलगा-मुलगी त्याच्या कल्पनेनुसार या व्यक्तिरेखा व त्यामधील प्रसंग डोळ्यांसमोर रंगवत होता. तंत्रज्ञानामुळे तरुण पिढीला अनेक गोष्टी सहज प्राप्त झाल्या. मात्र, त्यांची कल्पनाशक्ती क्षीण होत गेली. एकेकाळी वक्तृत्व, वादविवाद स्पर्धांमध्ये असलेली चुरस संपुष्टात आली, इतकेच नव्हे तर या स्पर्धा जवळपास बंद झाल्या. शाळा, क्लास किंवा अपेक्षित प्रश्नसंच पुस्तिकांमध्ये दिलेल्या उत्तरांची घोकंपट्टी करायची व तसेच्या तसे उत्तर लिहून पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे, असा सुलभ पॅटर्न रूढ झाला होता. नव्या अभ्यासक्रमात मुलांना वेगवेगळ्या विषयांवर स्वप्रतिभेतून व्यक्त व्हावे लागेल. जुनाट संकल्पना हद्दपार होऊन सध्याच्या जीवनातील आर्थिक, राजकीय, सामाजिक व्यवस्थेतील संकल्पनांची माहिती दिली जाणार असल्याने मुलांना तो अभ्यास हवाहवासा तर वाटेलच, पण भविष्यात रोजगाराभिमुख ठरेल. चित्रांचा वापर करून शिक्षण देण्यामुळे अनेक बाबींचे आकलन सहजगत्या होते. गणिताच्या परीक्षेत आतापर्यंत एखाद्याने वेगळी रीत वापरून अचूक उत्तर दिले, तरी त्याच्या नशिबी भोपळा येत होता. आता रीत नव्हे तर गणिताच्या गाभ्याचे आकलन विद्यार्थ्याला झाले आहे किंवा कसे, हे पाहिले जाणार आहे, ही खरोखरच नवी दृष्टी आहे. समाजशास्त्र व तत्सम विषयांमधील तोंडी परीक्षेचे हक्काचे गुण जाऊन त्याची जागा परीक्षेने घेतल्याने अव्वाच्या सव्वा गुणांचे डोंगर पुढील वर्षी पाहायला मिळणार नाहीत. या नव्या अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांचे गुण काही अंशी घटले तरी चालतील, पण गुणवत्ता वाढणे गरजेचे आहे.

टॅग्स :educationशैक्षणिकEducation Sectorशिक्षण क्षेत्रMaharashtraमहाराष्ट्र