शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

किन गांग : आकाशाने गिळले की धरतीने खाल्ले?

By विजय दर्डा | Updated: July 31, 2023 07:55 IST

आपला कुरापतखोर शेजारी देश चीन ही ठसठसती जखम होय! भारताच्या नशिबी असलेल्या या डोकेदुखीशी झगडणे अपरिहार्य!

डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह -चीनमधून आलेली ताजी बातमी अशी की परराष्ट्रमंत्री म्हणून संपूर्ण जगात ख्याती पावत असलेले किन गांग अचानक गायब झाले आहेत. महिना उलटला, त्यांचा ठावठिकाणा लागत नाही. कम्युनिस्ट पक्षाच्या परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रमुख वांग यी यांनी परराष्ट्रमंत्र्यांचा कार्यभार सांभाळला आहे. हे गांग राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे अत्यंत निकटचे मानले जात; परंतु ते गायब झाल्यानंतर चीन सरकारने मौन बाळगले आहे. अर्थात चीनसाठी अशा प्रकारच्या घटना नवीन नाहीत. यापूर्वी गायब झालेले मंत्री किंवा अधिकारी पुष्कळ !  त्यांच्यातल्या अनेकांचा नंतर काही तपासही लागला नाही. ऑक्टोबर २०२० मध्ये चीनचे सर्वात मोठे उद्योगपती जॅक मा एका जाहीर कार्यक्रमात म्हणाले, देशातल्या बॅंका सरकारचे प्यादे झाल्या आहेत ! त्यानंतर जॅक मा अचानक गायब झाले. त्यांच्या कंपन्यांना ८५० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागले. तब्बल तीन वर्षांनी ते चीनमध्ये दिसले म्हणतात. कोणी कितीही प्रभावशाली असो त्याने जर सरकारी धोरणांवर थोडीही टीका केली तर चीनमध्ये ही अशी हालत होऊ शकते. गांग यांनी अशी काही टीका केली असेल तर त्याची माहिती कोणाजवळ नाही. पण मग ते गायब का झाले? एका टीव्ही प्रेझेन्टरसमवेत त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाल्याची चर्चा समाजमाध्यमांवर होत आहे. परंतु, हा काही गुन्हा नाही. म्हणजे दुसरे काही तरी कारण असले पाहिजे आणि तेच चीन लपवत आहे.चीन आपल्या देशांतर्गत गोष्टी बाहेर येऊ देत नाही. तिथला कम्युनिस्ट पक्ष हुकूमशाही पद्धतीने काम करतो. शी जिनपिंग राष्ट्रपती झाल्यानंतर ही हुकूमशाही वाढतच गेली. जिनपिंग एकीकडे आपल्या देशातल्या गोष्टी लपवतात आणि दुसरीकडे अन्य देशांवर कब्जा करण्याच्या कटकारस्थानात गुंतलेले असतात. एकीकडे चीन अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देतो, तर दुसरीकडे  तैवान गिळंकृत करण्याच्या खटपटीत राहतो. युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यानंतर चीनचे मनोबल आणखी वाढले. सध्या चीन गप्प आहे, कारण तैवानला वाचविण्यासाठी अमेरिका पुढे आली तर चित्रच बदलेल ! युद्ध परवडणारे नाही, कारण चीनच्या अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजतील. आज जगातल्या ६०पेक्षा जास्त देशांना गुलाम करण्याचे प्रयत्न चीनने चालवले आहेत.  श्रीलंका कर्ज फेडू न शकल्याने हंबनटोटा बंदर ९९ वर्षांसाठी चीनने वापरायला घेतले आणि भारतासाठी नवी डोकेदुखी तयार झाली.  अमली पदार्थांचे तस्कर आणि म्यानमारमध्ये राहणारे बहुसंख्य दहशतवादी यांच्या माध्यमातून मणिपूर पेटते ठेवण्यात चीन प्रमुख भूमिका पार पाडतो आहे. माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी गेल्याच आठवड्यात ही शंका बोलून दाखविली. चीनची आणखी एक ताजी कुरापत म्हणजे भारतीय मार्शल आर्टस संघाच्या तीन खेळाडूंना चीनमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी स्टेपल व्हिसा जारी केला गेला. हा व्हिसा म्हणजे एक कागद असतो ! व्हिसा जारी करत असल्याचा शिक्का पासपोर्टवर न मारता त्या कागदावर मारला जातो. अरुणाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्यांची अशी खोडी चीनने यापूर्वी वारंवार काढली आहे. स्वाभाविक भारताने आक्षेप घेतला आणि संपूर्ण संघाचा दौरा रद्द केला. २०१९ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा दौरा आणि २०२० मध्ये गृहमंत्री अमित शाह यांच्या अरुणाचल दौऱ्याला चीनने हरकत घेतली होती. सद्य:स्थितीत आपल्या नकाशात चीनने अरुणाचल प्रदेशातील अनेक शहरांची आणि गावांची नावे बदलली आहेत. ९० हजार चौरस किलोमीटरचा प्रदेश आपला असल्याचा दावा चीन करतो. परंतु अक्साई चीनमध्ये त्याने आपली ३८ हजार चौरस किलोमीटर जमीन हडपली हे उलटे वास्तव आहे. कधी डोकलाममध्ये, तर कधी तवांग किंवा सीमेच्या दुसऱ्या भागात चीन कुरापती काढत असतो. जवळपास ३ हजार ५०० किलोमीटर सीमारेषेच्या अगदी जवळ चीनने सैनिकी तळ उभारले आहेत. अर्थात, चीनला याचीही जाणीव आहे की भारत आता १९६२चा भारत राहिलेला नाही.दुसऱ्या एका मोठ्या खेळीत चीनने भारताला फसविले आहे. गेल्या आर्थिक वर्षातील आकडेवारी पाहिली तर दिसते की भारताच्या एकूण आयात खर्चातील सर्वाधिक १५.४२ टक्के खर्च चीनच्या वाट्याला गेला. अणुभट्टीपासून रसायने, खते, प्लास्टिकचे सामान, गाड्यांचे सुटे भाग, लोखंड, पोलाद आणि ॲल्युमिनियमच्या बाबतीत भारत  चीनवर अवलंबित झाला आहे. चीनकडून खतांची आयात बंद झाली तर आपल्या शेतीचे बारा वाजतील, अशी अस्वस्था आहे. कूटनीतीमध्ये एक जुनी म्हण आहे: ज्या देशांकडून धोक्याची शंका असेल त्याच्यावर अवलंबून राहता कामा नये ! परंतु दुर्भाग्याची गोष्ट अशी की एकीकडे चीनबरोबर तणाव वाढत असताना दुसरीकडे व्यापारही वाढत चालला आहे. गतवर्षी दोन्ही देशांतील व्यापार ८.४ टक्क्यांनी वाढला. चीनमधून भारतात होणारी आयात २१.७ टक्के वाढली. भारतातून चीनला होणाऱ्या निर्यातीत ३७.९ टक्के घसरण झाली. भारताची व्यापार तूट १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे. चीनवर अवलंबून राहणे आपल्याला थांबवावे लागेल; तरच आपण त्याचा सामना करू शकू. जगासाठी चिघळलेली जखम झालेल्या या देशाचा इलाज करणे अत्यंत गरजेचे आहे. ही जखम अतिशय वेदनादायी आहे.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतVijay Dardaविजय दर्डाXi Jinpingशी जिनपिंगNarendra Modiनरेंद्र मोदी