शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
2
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
3
‘मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलंय, भाजपानं त्यांच्यावर…’, संजय राऊतांची बोचरी टीका 
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
5
AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं
6
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
7
दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."
8
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
9
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
10
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
11
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
12
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
13
मुंबईतील ६ पैकी ३ जागांवर शिवसेना vs शिवसेना; एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, कोण पडणार भारी?
14
प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश देशमुख - श्रेयस तळपदेने वाहिली श्रद्धांजली
15
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
16
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
17
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
18
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
19
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
20
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त

मानवतेचा पुजारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 5:45 AM

सेवेचा वारसा घेऊन मानवसेवा, शांती, शाकाहार यांच्या प्रसारासाठी आयुष्य झोकून देणारे दादा जे. पी. वासवानी यांच्या निधनाने मानवतेचा पुजारी आपल्यातून हरपला आहे. सिंधी समाजाचे धर्मगुरू ही दादांची ओळख तशी अपुरीच.

सेवेचा वारसा घेऊन मानवसेवा, शांती, शाकाहार यांच्या प्रसारासाठी आयुष्य झोकून देणारे दादा जे. पी. वासवानी यांच्या निधनाने मानवतेचा पुजारी आपल्यातून हरपला आहे. सिंधी समाजाचे धर्मगुरू ही दादांची ओळख तशी अपुरीच. अखिल मानवजातीच्या कल्याणाची त्यांना आस होती. जगभरात पसरलेल्या आपल्या शिष्यांच्या माध्यमातून विश्वाला त्यांनी शांततेचा संदेश दिला. याचीच दखल घेत संयुक्त राष्ट्रसंघाकडून देण्यात येणारा ‘यू थन्स शांतता पुरस्कार’ त्यांना प्राप्त झाला होता. दादांचे आयुष्य म्हणजे एक चित्तरकथाच. सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतातील हैदराबादमधील संपन्न कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच अत्यंत हुशार असलेल्या दादांनी एकाच वर्षात दोन-तीन इयत्ता उत्तीर्ण केल्या. दादांनी आयएएस व्हावे, अशी त्यांच्या आईची इच्छा होती. मात्र, आपले चुलते साधू वासवानी यांच्या पावलावर पाऊल ठेवून दादांनी अध्यात्माचा, जगाला शांततेचा संदेश देण्याचा रस्ता पकडला. एम.एस्सी., एलएल.बी. झालेला हा तरुण साधू वासवानी यांचा शिष्योत्तम झाला. फाळणीनंतर त्यांना भारतात यावे लागले; परंतु त्याची कोणतीही कटुता कधी त्यांच्या वागण्या-बोलण्यामध्ये आली नाही. त्यांनी कधीही सर्वसंगपरित्यागाचा सल्ला दिला नाही; उलट कर्मसिद्धांताला व्यापक स्वरूप दिले. कर्मसिद्धांतानुसार आपण जे पेरू, तेच उगवते. आपण जर दुसऱ्याला आनंद वाटला, तर त्याबदल्यात आपल्या वाट्याला आनंदच येईल, अशी शिकवण त्यांनी दिली. मानवसेवा, परस्परांवर स्नेहाचा वर्षाव आणि प्राणिमात्रांवरही दया करण्यातूनच जीवन सफल बनेल, ही त्यांची शिकवण होती. जातिधर्मांतील भेद त्यांनी दूर केले. दादा नेहमी म्हणत, की आपण कोणत्या जातीचे, धर्माचे किंवा वंशाचे आहोत यापेक्षा आपण भारतमातेची लेकरे आहोत, हे ध्यानात ठेवले पाहिजे. आज प्रत्येक व्यक्ती मी काय करू शकतो, असे म्हणत असते. मात्र, व्यक्तीतील आत्मविश्वास जागृत असेल, तर प्रत्येक गोष्ट साध्य करता येते. या आत्मविश्वासाच्या बळावरच नवीन भारताची निर्मिती होणार आहे. मांसाहाराविरुद्ध त्यांनी चालविलेल्या मोहिमेने शाकाहाराच्या चळवळीला बळ मिळाले. ती चळवळ पुढे एवढी फोफावली, की साधू वासवानी यांच्या जन्मदिनी २५ नोव्हेंबरला ‘पशू अधिकार दिन’ साजरा केला जाऊ लागला. लाखो लोकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन शाकाहाराचा अंगीकार केला. याचबरोबर शिक्षण, आरोग्य, रुग्णसेवा या क्षेत्रांत दादांच्या प्रेरणेने प्रचंड संस्थात्मक कार्य उभे राहिले. देशात वेगवेगळ््या ठिकाणी पसरलेल्या सिंधी समाजाला आध्यात्मिक बळ देण्याचे काम साधू वासवानी यांनी केले होते. त्याला दादांनी नवा आयाम दिला. सिंधी वयाच्या नव्याण्णवव्या वर्षापर्यंत अखंड कार्यरत राहून सेवेचे महाव्रत घेतलेला मानवतेचा पुजारी काळाच्या पडद्याआड गेला आहे. पण, विविध माध्यमांतून त्यांचे कार्य हे अमर राहील.

टॅग्स :newsबातम्या