शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

सेवाभावाचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:57 IST

विदर्भ ही संत गाडगेबाबांची भूमी आहे. गाडगेबाबांनी रुजविलेल्या सेवाभावाने या भूमीत चांगलेच मूळ धरले आहे. देशाच्या ६९ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांनी त्याची प्रचिती दिली. गोरगरिबांसाठीच्या आरोग्य सुविधांच्या क्षेत्रात क्रांती घडविणारे डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग हे दाम्पत्य आणि सिकलसेल रुग्णांसाठी आयुष्य वेचलेले दिवंगत संपत रामटेके या विदर्भाच्या सुपुत्रांना पद्मश्री पुरस्कार देऊन, भारत सरकारने त्यांच्या सेवाकार्याची पोचपावती दिली आहे.

विदर्भ ही संत गाडगेबाबांची भूमी आहे. गाडगेबाबांनी रुजविलेल्या सेवाभावाने या भूमीत चांगलेच मूळ धरले आहे. देशाच्या ६९ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांनी त्याची प्रचिती दिली. गोरगरिबांसाठीच्या आरोग्य सुविधांच्या क्षेत्रात क्रांती घडविणारे डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग हे दाम्पत्य आणि सिकलसेल रुग्णांसाठी आयुष्य वेचलेले दिवंगत संपत रामटेके या विदर्भाच्या सुपुत्रांना पद्मश्री पुरस्कार देऊन, भारत सरकारने त्यांच्या सेवाकार्याची पोचपावती दिली आहे. एकाच भागातील तिघांना एकाच वर्षी सेवाकार्यासाठी पद्म पुरस्कार मिळण्याचे कदाचित हे एकमेव उदाहरण असावे. सेवाकार्यासाठी यापूर्वी पद्म पुरस्कार मिळालेले आमटे पितापुत्र असोत, की यावर्षीचे विजेते बंग दाम्पत्य वा संपत रामटेके असो, त्यांनी काही पुरस्कारांच्या अभिलाषेने सेवाकार्यास वाहून घेतले नव्हते. आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर, सेवाकार्य हेच त्यांच्या जीवनाचे इतिकर्तव्य असल्याची जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी त्यासाठी स्वत:ला झोकून दिले. डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग या दोघांनीही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण विद्यापीठात सर्वोच्च स्थान मिळवित पूर्ण केले होते. ठरवले असते तर ते खोºयाने पैसा ओढू शकले असते; पण त्यांनी आयुष्य वेचले ते गोरगरीब आदिवासींना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी, गरीब कुटुंबे उद्ध्वस्त करणारी दारू हद्दपार करण्यासाठी! हे काम करीत असताना त्यांनी त्यांच्या मूळ क्षेत्राकडे दुर्लक्ष केले असेही नाही. वैद्यकीय क्षेत्रातील एकदोन नव्हे, तर तब्बल २८ संशोधनपर प्रकाशने बंग दाम्पत्याच्या नावावर आहेत! वर्धेच्या सेवाग्राम आश्रमात बालपण घालविताना मिळालेले गांधीवादी विचारसरणीचे बाळकडू डॉ. अभय बंग यांना सेवाकार्याच्या मार्गावर घेऊन गेले, तर मुलाच्या आजाराने संपत रामटेकेंना सिकलसेलच्या रुग्णांसाठी लढा देण्याची दीक्षा दिली. सिकलसेलग्रस्तांसाठी तब्बल चाळीस वर्षे संघर्ष करून, तो प्रश्न पार आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविण्यासाठी रामटेके यांनी दिलेला लढा, हे एखादी ध्येयवेडी व्यक्ती काय करू शकते, याचे उत्तम उदाहरण आहे. गाडगेबाबांनी पेटविलेली सेवाभावाची ज्योत अखंड तेवत ठेवण्याचे काम, आमटे पितापुत्र, बंग दाम्पत्य, संपत रामटेके, शंकरबाबा पापळकर यासारख्या लोकांनी केले आहे. सुदैवाने सेवाभावाची ही जाणीव पुढील पिढीतही जागृत असल्याची उदाहरणे विदर्भात दृष्टोत्पतीस पडत आहेत. त्यामुळे बंग दाम्पत्य वा संपत रामटेकेंना मिळालेले पद्म पुरस्कार हे विदर्भाच्या वाट्याचे सेवाकार्यासाठीचे अखेरचे पुरस्कार नसतील, हे निश्चित!

टॅग्स :Abhay Bangअभय बंगIndiaभारत