शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

सेवाभावाचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:57 IST

विदर्भ ही संत गाडगेबाबांची भूमी आहे. गाडगेबाबांनी रुजविलेल्या सेवाभावाने या भूमीत चांगलेच मूळ धरले आहे. देशाच्या ६९ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांनी त्याची प्रचिती दिली. गोरगरिबांसाठीच्या आरोग्य सुविधांच्या क्षेत्रात क्रांती घडविणारे डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग हे दाम्पत्य आणि सिकलसेल रुग्णांसाठी आयुष्य वेचलेले दिवंगत संपत रामटेके या विदर्भाच्या सुपुत्रांना पद्मश्री पुरस्कार देऊन, भारत सरकारने त्यांच्या सेवाकार्याची पोचपावती दिली आहे.

विदर्भ ही संत गाडगेबाबांची भूमी आहे. गाडगेबाबांनी रुजविलेल्या सेवाभावाने या भूमीत चांगलेच मूळ धरले आहे. देशाच्या ६९ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांनी त्याची प्रचिती दिली. गोरगरिबांसाठीच्या आरोग्य सुविधांच्या क्षेत्रात क्रांती घडविणारे डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग हे दाम्पत्य आणि सिकलसेल रुग्णांसाठी आयुष्य वेचलेले दिवंगत संपत रामटेके या विदर्भाच्या सुपुत्रांना पद्मश्री पुरस्कार देऊन, भारत सरकारने त्यांच्या सेवाकार्याची पोचपावती दिली आहे. एकाच भागातील तिघांना एकाच वर्षी सेवाकार्यासाठी पद्म पुरस्कार मिळण्याचे कदाचित हे एकमेव उदाहरण असावे. सेवाकार्यासाठी यापूर्वी पद्म पुरस्कार मिळालेले आमटे पितापुत्र असोत, की यावर्षीचे विजेते बंग दाम्पत्य वा संपत रामटेके असो, त्यांनी काही पुरस्कारांच्या अभिलाषेने सेवाकार्यास वाहून घेतले नव्हते. आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर, सेवाकार्य हेच त्यांच्या जीवनाचे इतिकर्तव्य असल्याची जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी त्यासाठी स्वत:ला झोकून दिले. डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग या दोघांनीही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण विद्यापीठात सर्वोच्च स्थान मिळवित पूर्ण केले होते. ठरवले असते तर ते खोºयाने पैसा ओढू शकले असते; पण त्यांनी आयुष्य वेचले ते गोरगरीब आदिवासींना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी, गरीब कुटुंबे उद्ध्वस्त करणारी दारू हद्दपार करण्यासाठी! हे काम करीत असताना त्यांनी त्यांच्या मूळ क्षेत्राकडे दुर्लक्ष केले असेही नाही. वैद्यकीय क्षेत्रातील एकदोन नव्हे, तर तब्बल २८ संशोधनपर प्रकाशने बंग दाम्पत्याच्या नावावर आहेत! वर्धेच्या सेवाग्राम आश्रमात बालपण घालविताना मिळालेले गांधीवादी विचारसरणीचे बाळकडू डॉ. अभय बंग यांना सेवाकार्याच्या मार्गावर घेऊन गेले, तर मुलाच्या आजाराने संपत रामटेकेंना सिकलसेलच्या रुग्णांसाठी लढा देण्याची दीक्षा दिली. सिकलसेलग्रस्तांसाठी तब्बल चाळीस वर्षे संघर्ष करून, तो प्रश्न पार आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविण्यासाठी रामटेके यांनी दिलेला लढा, हे एखादी ध्येयवेडी व्यक्ती काय करू शकते, याचे उत्तम उदाहरण आहे. गाडगेबाबांनी पेटविलेली सेवाभावाची ज्योत अखंड तेवत ठेवण्याचे काम, आमटे पितापुत्र, बंग दाम्पत्य, संपत रामटेके, शंकरबाबा पापळकर यासारख्या लोकांनी केले आहे. सुदैवाने सेवाभावाची ही जाणीव पुढील पिढीतही जागृत असल्याची उदाहरणे विदर्भात दृष्टोत्पतीस पडत आहेत. त्यामुळे बंग दाम्पत्य वा संपत रामटेकेंना मिळालेले पद्म पुरस्कार हे विदर्भाच्या वाट्याचे सेवाकार्यासाठीचे अखेरचे पुरस्कार नसतील, हे निश्चित!

टॅग्स :Abhay Bangअभय बंगIndiaभारत