शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

सेवाभावाचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:57 IST

विदर्भ ही संत गाडगेबाबांची भूमी आहे. गाडगेबाबांनी रुजविलेल्या सेवाभावाने या भूमीत चांगलेच मूळ धरले आहे. देशाच्या ६९ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांनी त्याची प्रचिती दिली. गोरगरिबांसाठीच्या आरोग्य सुविधांच्या क्षेत्रात क्रांती घडविणारे डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग हे दाम्पत्य आणि सिकलसेल रुग्णांसाठी आयुष्य वेचलेले दिवंगत संपत रामटेके या विदर्भाच्या सुपुत्रांना पद्मश्री पुरस्कार देऊन, भारत सरकारने त्यांच्या सेवाकार्याची पोचपावती दिली आहे.

विदर्भ ही संत गाडगेबाबांची भूमी आहे. गाडगेबाबांनी रुजविलेल्या सेवाभावाने या भूमीत चांगलेच मूळ धरले आहे. देशाच्या ६९ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांनी त्याची प्रचिती दिली. गोरगरिबांसाठीच्या आरोग्य सुविधांच्या क्षेत्रात क्रांती घडविणारे डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग हे दाम्पत्य आणि सिकलसेल रुग्णांसाठी आयुष्य वेचलेले दिवंगत संपत रामटेके या विदर्भाच्या सुपुत्रांना पद्मश्री पुरस्कार देऊन, भारत सरकारने त्यांच्या सेवाकार्याची पोचपावती दिली आहे. एकाच भागातील तिघांना एकाच वर्षी सेवाकार्यासाठी पद्म पुरस्कार मिळण्याचे कदाचित हे एकमेव उदाहरण असावे. सेवाकार्यासाठी यापूर्वी पद्म पुरस्कार मिळालेले आमटे पितापुत्र असोत, की यावर्षीचे विजेते बंग दाम्पत्य वा संपत रामटेके असो, त्यांनी काही पुरस्कारांच्या अभिलाषेने सेवाकार्यास वाहून घेतले नव्हते. आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर, सेवाकार्य हेच त्यांच्या जीवनाचे इतिकर्तव्य असल्याची जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी त्यासाठी स्वत:ला झोकून दिले. डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग या दोघांनीही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण विद्यापीठात सर्वोच्च स्थान मिळवित पूर्ण केले होते. ठरवले असते तर ते खोºयाने पैसा ओढू शकले असते; पण त्यांनी आयुष्य वेचले ते गोरगरीब आदिवासींना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी, गरीब कुटुंबे उद्ध्वस्त करणारी दारू हद्दपार करण्यासाठी! हे काम करीत असताना त्यांनी त्यांच्या मूळ क्षेत्राकडे दुर्लक्ष केले असेही नाही. वैद्यकीय क्षेत्रातील एकदोन नव्हे, तर तब्बल २८ संशोधनपर प्रकाशने बंग दाम्पत्याच्या नावावर आहेत! वर्धेच्या सेवाग्राम आश्रमात बालपण घालविताना मिळालेले गांधीवादी विचारसरणीचे बाळकडू डॉ. अभय बंग यांना सेवाकार्याच्या मार्गावर घेऊन गेले, तर मुलाच्या आजाराने संपत रामटेकेंना सिकलसेलच्या रुग्णांसाठी लढा देण्याची दीक्षा दिली. सिकलसेलग्रस्तांसाठी तब्बल चाळीस वर्षे संघर्ष करून, तो प्रश्न पार आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविण्यासाठी रामटेके यांनी दिलेला लढा, हे एखादी ध्येयवेडी व्यक्ती काय करू शकते, याचे उत्तम उदाहरण आहे. गाडगेबाबांनी पेटविलेली सेवाभावाची ज्योत अखंड तेवत ठेवण्याचे काम, आमटे पितापुत्र, बंग दाम्पत्य, संपत रामटेके, शंकरबाबा पापळकर यासारख्या लोकांनी केले आहे. सुदैवाने सेवाभावाची ही जाणीव पुढील पिढीतही जागृत असल्याची उदाहरणे विदर्भात दृष्टोत्पतीस पडत आहेत. त्यामुळे बंग दाम्पत्य वा संपत रामटेकेंना मिळालेले पद्म पुरस्कार हे विदर्भाच्या वाट्याचे सेवाकार्यासाठीचे अखेरचे पुरस्कार नसतील, हे निश्चित!

टॅग्स :Abhay Bangअभय बंगIndiaभारत