शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

व्यवहारात मराठी वापरासाठी शासनाला आली जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 03:56 IST

शासनाच्या मराठी भाषा विभागाने टपाल कार्यालये, विमान, विमा, पेट्रोलियम कंपन्या, कर विभाग, दूरध्वनी, रेल्वे, मोनो-मेट्रो रेल्वे कंपन्यांनाही दैनंदिन व्यवहारासह पत्रव्यवहार, जनसंपर्क आदींसाठी मराठीवापराची सक्ती केली आहे.

शासनाच्या मराठी भाषा विभागाने टपाल कार्यालये, विमान, विमा, पेट्रोलियम कंपन्या, कर विभाग, दूरध्वनी, रेल्वे, मोनो-मेट्रो रेल्वे कंपन्यांनाही दैनंदिन व्यवहारासह पत्रव्यवहार, जनसंपर्क आदींसाठी मराठीवापराची सक्ती केली आहे. मनसेच्या आंदोलनाच्या इशाºयामुळे हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर हा निर्णय घाईत घेण्यात आला आहे.मराठी भाषा विभागाने केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्र आणि महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ आणि सुधारणा २०१५ ची आठवण मंगळवारी तातडीने काढलेल्या आदेशात करून दिली आहे. त्यानुसार जनतेशी करण्यात येणारा पत्रव्यवहार, मौखिक, दूरध्वनी अन्य माध्यमांद्वारे करण्यात येणाºया संदेशवहनात, पाट्या, जाहिराती, सूचनाफलक, बँक दस्तावेज, रेल्वे, विमान, मेट्रो-मोनोचे आरक्षण अर्ज, तिकिटे, निवेदनात अन् आॅनलाईन-आॅफलाईन व्यवहारात मराठीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कुसुमाग्रजांनी मराठी भाषा मंत्रालयाच्या दारात फाटक्या वस्त्रांत उभी आहे, अशा शब्दांत मराठी भाषेची शासनस्तरावर होत असलेली उपेक्षा अधोरेखित केली होती. असे हे शासन एकदम मराठी सक्तीची करण्याविषयी खडबडून जागे झाले. यामागे मराठीप्रेम निश्चितच नसावे. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर यासंदर्भात आंदोलनाचा इशारा देणाºया मनसेवर राजकीय कुरघोडी करण्याचा सत्ताधाºयांचा हेतू यामागे दिसतो. कारण याबाबतचा निर्णय याआधीच व्हायला हवा होता. कन्नड, मल्याळम, बंगाली भाषांच्या जतन-संवर्धनासाठी त्या भाषांचे शिक्षण संबंधित राज्यांतील शाळांमध्ये सक्तीचे करण्याचा निर्णय तेथील सरकारांनी घेतला. महाराष्ट्र सरकार मात्र याबाबतीत कोणताही ठोस निर्णय घेत नाही. तोपर्यंत असल्या दिखाऊ निर्णयांनी काहीही होणार नाही. दोन हजार वर्षे जुन्या असलेल्या आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे. आपल्याच राज्यातील दैनंदिन व्यवहार आणि पाट्या वगैरे मराठीत असाव्यात, यासाठी आंदोलने करून आपली राजकीय पोळी भाजण्याची पाळी काही पक्षांवर यावी, हेच दुर्दैवी आहे. राजभाषेसंदर्भातील आणि त्रिभाषा सूत्रासंदर्भात अधिनियम असतानाही शासनाच्या बोटचेप्या धोरणांमुळेच काही खासगी बँकांची मराठीतून व्यवहार करण्याकडे दुर्लक्ष करण्याची हिंमत होते. अन्यथा या अधिनियमांची आठवण वारंवार करून देण्याची वेळ शासनावर आली नसती. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लवकरच मिळेल, अशा वल्गना करणारे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे हे शिक्षणमंत्रीही आहेत. त्यांच्याच खात्याच्या माहितीनुसार मराठी शाळांची संख्या घटत असल्याची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या मराठीला कुणी जपायचे, हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात मराठी विद्यापीठ आणि महाराष्ट्र अनुवाद अकादमीची मागणी मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी सत्ताधाºयांकडे केली आहे. त्याबाबतीत शासनस्तरावर तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. शासनाकडून ही अपेक्षा करीत असतानाच मराठी भाषिक म्हणून आपलीही काही कर्तव्ये आहेतच. ही सुरुवात घरापासून झाली पाहिजे. आप्तेष्टांशी, मित्रांशी, कार्यालयातील मराठी-अमराठी सहकाºयांशी आपण मराठीतच बोलायला हवे. एका अर्थाने आपण रोजच्या व्यवहारात स्वत:वरच मराठीची सक्ती केली पाहिजे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार