शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

दर्या मे खसखस!

By admin | Updated: April 12, 2016 04:04 IST

जवळजवळ तीन लक्ष कोटी रुपयांचे कर्ज अभिमानाने डोक्यावर घेऊन मिरविणाऱ्या महाराष्ट्र सरकारला शंभर कोटी रुपयांची मातब्बरी वाटण्याचे काही कारण असू शकेल काय?

जवळजवळ तीन लक्ष कोटी रुपयांचे कर्ज अभिमानाने डोक्यावर घेऊन मिरविणाऱ्या महाराष्ट्र सरकारला शंभर कोटी रुपयांची मातब्बरी वाटण्याचे काही कारण असू शकेल काय? तुलनेने ही चिमुकली रक्कम म्हणजे दर्या मे खसखस! पण या शंभर कोटींची राज्य सरकारला मातब्बरी वाटावी असा भाजपाचेच खासदार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव अनुराग ठाकूर यांचा आग्रह असावा असे दिसते. त्यामुळेच पाण्याच्या टंचाईचे ‘निमित्त’ पुढे करुन राज्य सरकारने आयपीएल नावाच्या क्रिकेटच्या जुगाराचे सामने महाराष्ट्रातून बहिष्कृत केले तर या ‘इतक्या मोठ्या’ रकमेवर पाणी सोडावे लागेल असा धमकीमिश्रित इशारा त्यांनी दिला आहे. मुळात राज्य सरकारचा निर्णय आत्मप्रेरणेतून आलेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झक्कू लावला तेव्हां कुठे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ठोस भूमिका घेणे भाग पडले. भाजपा सरकारला त्यांच्याच एका खासदाराने असा खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला असता भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान महेन्द्रसिंग धोनी यालाही यात मध्येच तोंड खुपसण्याचे काही कारण नव्हते. त्याने थेट मुंबई उच्च न्यायालयाला अंगावर घेत न्यायालयाच्या निर्णयाने आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळविले गेले तरी महाराष्ट्रातील दुष्काळाचा म्हणजे पाण्याचा प्रश्न सुटणार नाही असा तारा तोडला आहे. खुद्द न्यायालयदेखील तसे म्हणत नाही. मुद्दा प्राथम्यक्रमाचा आहे, दुष्काळ निवारणाचा नाही. तो निवारण्याचे काम निसर्गाच्या हाती आहे आणि निसर्ग आपले काम आणखी दोन महिन्यांनंतर सुरु करील असा वेधशाळेचा अंदाज आहे. तोवर पाण्याचा जो काही साठा उपलब्ध आहे त्याचा काटकसरीने वापर करण्याचा आजचा प्रश्न आहे. दर्याभर गोडे पाणी उपलब्ध असते तर न्यायालयाला मध्यस्थी करण्याची गरजच भासली नसती