शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

राजकारणी उठले प्राण्यांच्या जीवावर!

By अतुल कुलकर्णी | Updated: April 9, 2018 01:24 IST

साप, मुंगूस, लांडगे, कोल्हे, गांडूळ, उंदीर, कुत्रे, मांजर तमाम प्राण्यांना मनुष्यजातीचा प्रचंड राग यावा अशा घटना गेल्या आठवड्यात घडल्या.

साप, मुंगूस, लांडगे, कोल्हे, गांडूळ, उंदीर, कुत्रे, मांजर तमाम प्राण्यांना मनुष्यजातीचा प्रचंड राग यावा अशा घटना गेल्या आठवड्यात घडल्या. कुणी कुणाला गांडूळाची उपमा दिली तर कुणी कुणाला सापाची, लांडग्याची, कुत्र्यांची उपमा दिलीय. कुणी स्वकियांना उंदीर म्हणाले तर कुणी विरोधकांना मांजरांची उपमा दिली. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. विचारांची लढाई विचारांनी लढावी याचे बाळकडू ज्या भूमीने समस्त जगाला दिले त्याच मातीत स्वत:च्या स्वार्थासाठी नेते मंडळी मुक्या प्राण्यांना वापरू लागली आहेत. त्यामुळे प्राण्यांच्या विरोधातील स्वस्वार्थासाठी सुरू झालेली लढाई पाहून विचारी माणूस जातीचा प्राणी मात्र अस्वस्थ झाला आहे. बिचाऱ्या प्राण्यांनी यांचे असे काय घोडे मारले होते... असेही म्हणायची सोय राहिलेली नाही कारण घोड्यांना अजूनतरी कुणी त्यांच्या राजकीय लढाईत ओढलेले नाही.लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका विकासाच्या मुद्यावर भाजपाने लढवल्या. विकास होणार, अच्छे दिन येणार, या आनंदाने भारून धर्म, पंथ, जात बाजूला सारून देशातील अठरापगड जातीच्या कोट्यवधी जनतेने देशात आणि राज्यात भाजपाचे सरकार निवडून दिले. लोकसभेचा चार वर्षांचा आणि विधानसभेचा साडेतीन वर्षांचा काळ लोटून गेला. मात्र विकासावर मतं मागणारे हे सरकार आणि त्यातील नेते अचानक कुणाच्याही अध्यात मध्यात नसणाºया प्राण्यांवर घसरले. लांडगा धूर्त, साप डंख मारतो, किंवा कुत्रा चावतो या प्रथमदर्शनी गुणांकडे पाहून त्यांची उपमा मानवजातीच्या प्राण्यांना दिली गेली पण ती देणाºयांनी सोयीस्करपणे प्राण्यांच्या चांगल्या गुणांकडे दुर्लक्षच केले. अगदी विकास आणि अच्छे दिनाकडे केले तसेच.आपल्याकडे सांगण्यासारखे काही नसले की माणसं चिडतात किंवा विषयाशी संबंध नसणाºया गोष्टी पुढे करतात, रागराग करतात, तापटपणे बोलतात, असा एक समज आहे. अर्थात हा समज कुत्री, मांजर, कोल्हे, साप, कोल्हे, गांडूळ यांना आपल्या भाषणात आणणाºयांना लागू होतोच असे नाही.अच्छे दिन आले की नाही माहिती नाही पण लोकांची अच्छी करमणूक यानिमित्ताने सुरू झाली आहे. जी यापुढेही होत राहील. राष्टÑवादीने शिवसेनेला गांडूळाची उपमा देताच शिवसेनेनेसुद्धा स्वभावधर्माप्रमाणे हा विषय थेट औलादीपर्यंत नेला. यासाठी लोकांनी भाजपा शिवसेनेला निवडून दिले होते का? आधीचे सरकार वाईट होते, त्यांनी चुकीची कामं केली, त्यांनी जनतेला गृहीत धरणे सुरू केले. त्यामुळे वैतागलेल्या जनतेने भाजपवाले नवीन आहेत, ते चांगलं काहीतरी करतील, अच्छे दिन आणतील या विश्वासाने हाताची साथ सोडून कमळ हातात धरले होते.आज राज्यात तीन वर्षानंतरदेखील भाजपाचे मंत्री तुम्ही असे केले होते, आम्ही तर फक्त एवढेच केले अशी तुलना रोज कोणत्या ना कोणत्या विषयात करू लागले आहेत. काँग्रेस, राष्टÑवादीने जे केले त्याची शिक्षा त्यांना मिळाली. त्यांची सत्ता गेली, पण आता भाजपा सत्तेवर आल्यानंतर त्यांनी काय चांगले केले, कोणती विकासाची कामे केली हे सांगायला हवे, सांगण्यासारखे खूप काही असेल तर त्यावर भाषणांचा भर असायला हवा की निष्कारण कुत्री, मुंगूस, साप अशी प्राणी भाषणात आणावीत? विरोधक तर सरकार पाडण्याचे प्रयत्न करणारच, पण तुम्ही विकासाचे राजकारण करण्याचे सोडून गारुड्यांचा खेळ का करताय...? कदाचित भाजपावाले खासगीत आमचे काही खरे नाही म्हणतात, त्यातून तर हे असे होत नसावे? 

टॅग्स :Amit Shahअमित शाहAtul Kulkarniअतुल कुलकर्णी