शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

धर्मांध राजकारण अन् धार्मिकतेला राजकारणाची जोड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 3:16 AM

धर्मवेडाने आंधळेपण आलेली माणसे सर्वधर्मसमभाव व देशप्रेम याहून परधर्मद्वेषाचे राजकारणच अधिक करतात. मग अकबराने अलाहाबाद उभारले तेव्हा त्याने इस्लामचा त्याग केला होता याचेही स्मरण करावेसे त्यांना वाटत नाही.

उत्तर प्रदेशातील आदित्यनाथ सरकारचे धर्मांध इरादे त्याने कधी लपविले नाहीत. त्या राज्यात साडेतीन कोटी मुसलमान नागरिक आहेत. मात्र, त्यातील एकालाही आदित्यनाथांनी त्यांच्या पक्षाचे तिकीट लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत मिळू दिले नाही. २०१४ व २०१७च्या निवडणुकी तशाच स्वरूपाच्या पार पडल्या. धर्मांध राजकारण व धार्मिकतेला राजकारणाची जोड, यामुळे त्या राज्यात त्यांचे सरकार मोठ्या संख्येने विजयीही झाले. मात्र, निवडणुकीने दिलेला अधिकार विकासासाठी व कायदा आणि सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी असतो. तो धार्मिक वा सांस्कृतिक अन्यायासाठी किंवा इतिहास पुसून टाकण्यासाठी नसतो. मुद्दा आदित्यनाथ सरकारने ‘अलाहाबाद’ या शहराचे नाव बदलून त्याला ‘प्रयागराज’ बनविण्याचा घेतलेल्या निर्णयाचा आहे. अलाहाबाद हे गंगा, यमुना व सरस्वतीच्या त्रिवेणी संगमाचे पवित्र क्षेत्र आणि ते ‘प्रयागराज’ म्हणून ओळखलेही जाते. एके काळी अत्यंत सधन व औद्योगिक उभारणीसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहराला मोठा सांस्कृतिक लौकिकही लाभला होता. मात्र, गेल्या काही दशकांत त्याला अधोगतीची अवकळा लाभली आणि त्याचे स्वरूप दिवसेंदिवस दरिद्री व दयनीय होत गेले. मुळात हिंदूंना पवित्र वाटणाऱ्या या शहराची उभारणीच सम्राट अकबराने केली. त्याने तिथे किल्ला उभारला, नदीचे तट बांधून यात्रेकरूंची सोय केली. त्यांच्यासाठी पागोळ्या बांधल्या. हे काम अकबराने इस्लामचा त्याग केल्यानंतर व त्याचा दीने इलाही हा नवा धर्म स्थापन केल्यानंतरच्या काळात केले आहे. त्याचमुळे त्याचे नाव ‘लाहाबाद’ (इलाहीबाद) असे ठेवले गेले. हे सर्वतोमुखी झाले व आजतागायत हे शहर त्याच नावाने ओळखले जाते, पण संघ व भाजपाच्या राजकारणात विकासकारणाहून राजकारण अधिक बळकट आहे. त्यामुळे विकास झाला नाही तरी चालेल. देशाचा इतिहास पुसून काढून त्याला भगवा रंग देण्याचे व त्याचे जमेल तेवढे हिंदूकरण करण्याचे धोरण त्या पक्षाने गेली चार वर्षे चालविले आहे व देशाने ते अनुभवले आहे. अलाहाबादचे ‘प्रयागराज’ करणे हा त्याच राजकारणाचा एक पवित्रा आहे. नावे बदलली की संस्कृती बदलते वा विकासाची गंगा वाहू लागते असे नाही. गेल्या काही वर्षांत अनेक शहरांची व स्थळांची नावे बदलली गेली, पण ती पूर्वी होती तशीच राहिली. आदित्यनाथांच्या राजकारणाचा हेतू मुसलमानांना डिवचण्याचा व डावलण्याचा आहे. हे राज्य वा हा देश तुमचा नाही, हे त्यांना बजावण्याचा आहे. तुमचे सारे काही आम्ही नाहिसे करू, हा त्यांचा हेका आहे. ताजमहालची त्यांनी चालविलेली दुर्दशा त्यातूनच सुरू झाली आहे. इतिहास हा कुणा एका धर्माचा, वर्गाचा वा जातीचा नसतो, तो देशाचा असतो. त्याचा वारसा जपणे व त्याकडे पाहात वर्तमानाची वाट प्रकाशित करणे हे नव्या पिढ्यांचे काम असते. मात्र, धर्मवेडाने आंधळेपण आलेली माणसे सर्वधर्मसमभाव व देशप्रेम याहून परधर्मद्वेषाचे राजकारणच अधिक करतात. मग त्यांना बाबर, अकबर व औरंगजेब सारखेच दिसतात. काही काळापूर्वी या आदित्यनाथाने सगळ्या सरकारी इमारती व राज्य सरकारच्या बसेस यांना भगवा रंग देण्याचा निर्णय घेतला. कुणा दुसºयाच्या शहाण्या सल्ल्याने तो अंमलात मात्र आला नाही. देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई परवा एका भाषणात म्हणाले, देश म्हणजे सर्वसमावेशकता, पण ते न्यायमूर्ती आहेत. आदित्यनाथासारखे महंत पदावरून मुख्यमंत्री पदावर आलेले राजकारणी नाहीत. निळ्या आकाशाला भगवा रंग फासण्याच्या महत्त्वाकांक्षेने ते पछाडलेले नाहीत. आदित्यनाथ तसे आहेत. ते दुहीचे व द्वेषाचे राजकारण करीत आहेत. त्यांना मोदी अडवत नाहीत आणि भागवतांना हे चालणारेही आहे. लोक गप्प राहतात. कारण त्यांच्या मनात हिंदुत्ववाद्यांनी अलीकडे केलेल्या हिंसाचाराची धास्ती आहे. विरोधकांना कैद करता येते आणि मुसलमान? ते तर धास्तावलेलेच आहेत. देशात भय आणि संशयाचे राजकारण काही काळ यशस्वी होते. मात्र, त्यातून त्याची विभागणी होत नाही, हे आदित्यनाथांएवढेच त्यांच्या चाहत्यांनीही लक्षात घेतले पाहिजे. हा देश त्यात राहणाºया साºयांचा आहे व त्याचा इतिहासही त्या साºयांचा आहे. तो जपणे याचेच नाव राष्ट्रकारण आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथ