शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

चकमकींचे कवित्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:19 IST

एप्रिल महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांदरम्यान उडालेल्या दोन चकमकींचे कवित्व संपायचे नाव घेत नाही. त्या चकमकींची सत्यता तपासण्यासाठी एक स्वयंघोषित सत्य शोधन समिती नुकतीच चकमकी घडलेल्या ठिकाणी भेट देऊन गेली. समितीमध्ये मानवाधिकारांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या तीन संघटनांच्या सदस्यांचा समावेश होता. पोलिसांनी नक्षलवाद्यांना सर्व बाजूंनी घेरले आणि त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, असे सत्य शोधन समितीने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.

एप्रिल महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांदरम्यान उडालेल्या दोन चकमकींचे कवित्व संपायचे नाव घेत नाही. त्या चकमकींची सत्यता तपासण्यासाठी एक स्वयंघोषित सत्य शोधन समिती नुकतीच चकमकी घडलेल्या ठिकाणी भेट देऊन गेली. समितीमध्ये मानवाधिकारांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या तीन संघटनांच्या सदस्यांचा समावेश होता. पोलिसांनी नक्षलवाद्यांना सर्व बाजूंनी घेरले आणि त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, असे सत्य शोधन समितीने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. समिती सदस्यांचा डाव्या विचारसरणीप्रतिचा झुकाव जगजाहीर असल्याने, समितीचा निष्कर्ष काय असेल, याबाबत अजिबात शंका नव्हती. निष्कर्ष बरोबर असल्याचे मान्य केले तरी, पोलीस कारवाईत ठार झालेले लोक नि:शस्त्र व निष्पाप होते, असे म्हणण्यास तर समिती सदस्यही धजावणार नाहीत. समितीच्या अहवालातच ठार झालेल्या लोकांना नक्षलवादी संबोधण्यात आले आहे. ज्याअर्थी ते नक्षलवादी होते त्याअर्थी नक्कीच सशस्त्र असतील आणि त्यांना या देशाची राज्यघटना, कायदे मान्य असण्याचे तर काही कारणच नव्हते! या देशातील संपूर्ण व्यवस्था उलथून टाकणे, हेच नक्षलवाद्यांचे ध्येय आहे. या देशाची व्यवस्थाच मान्य नसलेल्या आणि ती उलथवण्यासाठी शस्त्र हाती घेतलेल्या लोकांना पोलिसांनी संपविल्यास वाईट काय, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात नेहमीच उभा ठाकतो. नक्षलवाद्यांनाही मानवाधिकार असतात आणि त्यांचे रक्षण झाले पाहिजे, हा मानवाधिकार संघटनांचा त्यावरील युक्तिवाद असतो. त्या युक्तिवादाची हवा काढणारे बिनतोड प्रश्न काही नक्षलवादग्रस्त कुटुंबांनी सत्य शोधन समितीपुढे उपस्थित केले. आमच्या मानवाधिकारांचे काय, नक्षलवाद्यांतर्फे त्यांचे हनन होते तेव्हा तुम्ही कुठे असता, पोलिसांचे खबरे ठरवून नक्षलवादी हत्या घडवितात तेव्हा तुम्हाला आमचे दु:ख दिसत नाही का, या त्यांच्या प्रश्नांची उत्तरे समिती सदस्यांकडे नव्हती. मानवाधिकारांचे तत्त्व आमच्या राज्यघटनेतच अंतर्भूत आहे. गुन्हेगारांच्याही मानवाधिकारांचा आदर करण्यास आमची घटना सांगते. बहुतांश वेळा त्याचे पालनही होते. क्वचितप्रसंगी व्यवस्थेतील एखाद्या घटकाकडून कुणाच्या मानवाधिकारांचे हनन होतही असेल; पण म्हणून ज्यांना आमची संपूर्ण व्यवस्थाच मान्य नाही, त्यांच्या मानवाधिकारांच्या रक्षणासाठी गळे काढणे आणि नि:शस्त्र निरपराधांच्या मानवाधिकारांचे हनन होत असताना मात्र तोंडात मिठाची गुळणी धरणे कितपत तर्कसंगत आहे, याचे उत्तर सत्य शोधन समितीच्या सदस्यांनी द्यायलाच हवे!

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली