शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

चकमकींचे कवित्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:19 IST

एप्रिल महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांदरम्यान उडालेल्या दोन चकमकींचे कवित्व संपायचे नाव घेत नाही. त्या चकमकींची सत्यता तपासण्यासाठी एक स्वयंघोषित सत्य शोधन समिती नुकतीच चकमकी घडलेल्या ठिकाणी भेट देऊन गेली. समितीमध्ये मानवाधिकारांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या तीन संघटनांच्या सदस्यांचा समावेश होता. पोलिसांनी नक्षलवाद्यांना सर्व बाजूंनी घेरले आणि त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, असे सत्य शोधन समितीने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.

एप्रिल महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांदरम्यान उडालेल्या दोन चकमकींचे कवित्व संपायचे नाव घेत नाही. त्या चकमकींची सत्यता तपासण्यासाठी एक स्वयंघोषित सत्य शोधन समिती नुकतीच चकमकी घडलेल्या ठिकाणी भेट देऊन गेली. समितीमध्ये मानवाधिकारांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या तीन संघटनांच्या सदस्यांचा समावेश होता. पोलिसांनी नक्षलवाद्यांना सर्व बाजूंनी घेरले आणि त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, असे सत्य शोधन समितीने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. समिती सदस्यांचा डाव्या विचारसरणीप्रतिचा झुकाव जगजाहीर असल्याने, समितीचा निष्कर्ष काय असेल, याबाबत अजिबात शंका नव्हती. निष्कर्ष बरोबर असल्याचे मान्य केले तरी, पोलीस कारवाईत ठार झालेले लोक नि:शस्त्र व निष्पाप होते, असे म्हणण्यास तर समिती सदस्यही धजावणार नाहीत. समितीच्या अहवालातच ठार झालेल्या लोकांना नक्षलवादी संबोधण्यात आले आहे. ज्याअर्थी ते नक्षलवादी होते त्याअर्थी नक्कीच सशस्त्र असतील आणि त्यांना या देशाची राज्यघटना, कायदे मान्य असण्याचे तर काही कारणच नव्हते! या देशातील संपूर्ण व्यवस्था उलथून टाकणे, हेच नक्षलवाद्यांचे ध्येय आहे. या देशाची व्यवस्थाच मान्य नसलेल्या आणि ती उलथवण्यासाठी शस्त्र हाती घेतलेल्या लोकांना पोलिसांनी संपविल्यास वाईट काय, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात नेहमीच उभा ठाकतो. नक्षलवाद्यांनाही मानवाधिकार असतात आणि त्यांचे रक्षण झाले पाहिजे, हा मानवाधिकार संघटनांचा त्यावरील युक्तिवाद असतो. त्या युक्तिवादाची हवा काढणारे बिनतोड प्रश्न काही नक्षलवादग्रस्त कुटुंबांनी सत्य शोधन समितीपुढे उपस्थित केले. आमच्या मानवाधिकारांचे काय, नक्षलवाद्यांतर्फे त्यांचे हनन होते तेव्हा तुम्ही कुठे असता, पोलिसांचे खबरे ठरवून नक्षलवादी हत्या घडवितात तेव्हा तुम्हाला आमचे दु:ख दिसत नाही का, या त्यांच्या प्रश्नांची उत्तरे समिती सदस्यांकडे नव्हती. मानवाधिकारांचे तत्त्व आमच्या राज्यघटनेतच अंतर्भूत आहे. गुन्हेगारांच्याही मानवाधिकारांचा आदर करण्यास आमची घटना सांगते. बहुतांश वेळा त्याचे पालनही होते. क्वचितप्रसंगी व्यवस्थेतील एखाद्या घटकाकडून कुणाच्या मानवाधिकारांचे हनन होतही असेल; पण म्हणून ज्यांना आमची संपूर्ण व्यवस्थाच मान्य नाही, त्यांच्या मानवाधिकारांच्या रक्षणासाठी गळे काढणे आणि नि:शस्त्र निरपराधांच्या मानवाधिकारांचे हनन होत असताना मात्र तोंडात मिठाची गुळणी धरणे कितपत तर्कसंगत आहे, याचे उत्तर सत्य शोधन समितीच्या सदस्यांनी द्यायलाच हवे!

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली