शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
6
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
7
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
8
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
9
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
10
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
11
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
12
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
13
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
14
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
15
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
16
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
17
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
18
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
19
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
20
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार

विदर्भ विकासाचे नियोजन व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:30 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी दोन मंडळाचे अध्यक्ष व दोन महामंडळाच्या उपाध्यक्षपदांच्या नियुक्तीस मान्यता दिली आणि सरकार स्थापनेच्या पावणे चार वर्षांनी का होईना विदर्भ विकास मंडळाला आमदार चैनसुख संचेती यांच्या रूपात अध्यक्ष मिळाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी दोन मंडळाचे अध्यक्ष व दोन महामंडळाच्या उपाध्यक्षपदांच्या नियुक्तीस मान्यता दिली आणि सरकार स्थापनेच्या पावणे चार वर्षांनी का होईना विदर्भ विकास मंडळाला आमदार चैनसुख संचेती यांच्या रूपात अध्यक्ष मिळाला. वेगळ्या विदर्भाचे छातीठोकपणे समर्थन करणाºया, विदर्भ विकासाचे शिलेदार म्हणवणाºया भाजपाची राज्यात एकहाती सत्ता असतानाही विदर्भ विकास मंडळाला गेली पावणे चार वर्षे अध्यक्षच मिळाला नाही, हा चिंतेचा अन् चिंतनाचा विषय आहे. विशेष म्हणजे पक्षांतर्गत कोंडींत अडकलेल्या विरोधकांनाही या मुद्यावर भाजपाची कोंडी करता आली नाही. भाजपाची कोंडी झाली ती पक्षांतर्गत इच्छुकांकडून आणि शेवटी मंडळाला अध्यक्ष मिळाले. एखाद्या मंडळाला अध्यक्ष नाही, म्हणून विकास रखडला का, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. याचं उत्तर नक्कीच नाही, असं राहील. कारण विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. मात्र, या वेळीच अध्यक्ष नेमला तर या विकासाच्या प्रक्रियेला दुप्पट वेगाने गती मिळाली असती हे देखील नाकारता येत नाही. वैधानिक विकास मंडळ हे पांढरा हत्ती ठरल्याची राजकीय टीका होत असली तरी विदर्भ विकासाच्या नियोजनात या मंडळाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे, हे नाकारून चालणार नाही. याच मंडळाच्या अभ्यासातून पुढे आलेल्या आकडेवारीच्या आधारे आताच्या सत्ताधाºयांनी तेव्हा विरोधकांच्या भूमिकेत असताना सरकारला आरसा दाखविण्याचे काम केले होते, हे ही विसरता येणार नाही. माजी मंत्री मधुकरराव किंमतकर यांनी विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विदर्भाच्या हक्कासाठी लढा दिला. या मंडळाच्या माध्यमातून जीव ओतून त्यांनी विदर्भाचा आवाज बुलंद केला. विदर्भाचा अनुशेष, मिळालेला निधी, प्रत्यक्षात झालेला विकास याचा लेखाजोखा सरकारसमोर मांडून विदर्भाचा खरंच किती विकास झाला याची जाणीव वेळोवेळी सत्ताधाºयांना करून दिली. तीच अपेक्षा आता या मंडळाकडून आहे. या मंडळातील तज्ज्ञ मार्गदर्शक अभ्यास करून सरकारला विविध सूचना करतात. शिफारशी करतात. त्यावर सरकारने एक नजर फिरवून अंमलबजावणी करण्याचीही गरज आहे. चैनसुख संचेती यांच्या रूपात एक अनुभवी नेत्याच्या हाती विदर्भ विकासाची धुरा सोपविण्यात आली आहे. ते आता आपल्या नियोजनातून विदर्भालाही सुखाचे दिवस आणतील, एवढीच अपेक्षा आहे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्र