शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

विदर्भ विकासाचे नियोजन व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:30 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी दोन मंडळाचे अध्यक्ष व दोन महामंडळाच्या उपाध्यक्षपदांच्या नियुक्तीस मान्यता दिली आणि सरकार स्थापनेच्या पावणे चार वर्षांनी का होईना विदर्भ विकास मंडळाला आमदार चैनसुख संचेती यांच्या रूपात अध्यक्ष मिळाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी दोन मंडळाचे अध्यक्ष व दोन महामंडळाच्या उपाध्यक्षपदांच्या नियुक्तीस मान्यता दिली आणि सरकार स्थापनेच्या पावणे चार वर्षांनी का होईना विदर्भ विकास मंडळाला आमदार चैनसुख संचेती यांच्या रूपात अध्यक्ष मिळाला. वेगळ्या विदर्भाचे छातीठोकपणे समर्थन करणाºया, विदर्भ विकासाचे शिलेदार म्हणवणाºया भाजपाची राज्यात एकहाती सत्ता असतानाही विदर्भ विकास मंडळाला गेली पावणे चार वर्षे अध्यक्षच मिळाला नाही, हा चिंतेचा अन् चिंतनाचा विषय आहे. विशेष म्हणजे पक्षांतर्गत कोंडींत अडकलेल्या विरोधकांनाही या मुद्यावर भाजपाची कोंडी करता आली नाही. भाजपाची कोंडी झाली ती पक्षांतर्गत इच्छुकांकडून आणि शेवटी मंडळाला अध्यक्ष मिळाले. एखाद्या मंडळाला अध्यक्ष नाही, म्हणून विकास रखडला का, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. याचं उत्तर नक्कीच नाही, असं राहील. कारण विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. मात्र, या वेळीच अध्यक्ष नेमला तर या विकासाच्या प्रक्रियेला दुप्पट वेगाने गती मिळाली असती हे देखील नाकारता येत नाही. वैधानिक विकास मंडळ हे पांढरा हत्ती ठरल्याची राजकीय टीका होत असली तरी विदर्भ विकासाच्या नियोजनात या मंडळाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे, हे नाकारून चालणार नाही. याच मंडळाच्या अभ्यासातून पुढे आलेल्या आकडेवारीच्या आधारे आताच्या सत्ताधाºयांनी तेव्हा विरोधकांच्या भूमिकेत असताना सरकारला आरसा दाखविण्याचे काम केले होते, हे ही विसरता येणार नाही. माजी मंत्री मधुकरराव किंमतकर यांनी विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विदर्भाच्या हक्कासाठी लढा दिला. या मंडळाच्या माध्यमातून जीव ओतून त्यांनी विदर्भाचा आवाज बुलंद केला. विदर्भाचा अनुशेष, मिळालेला निधी, प्रत्यक्षात झालेला विकास याचा लेखाजोखा सरकारसमोर मांडून विदर्भाचा खरंच किती विकास झाला याची जाणीव वेळोवेळी सत्ताधाºयांना करून दिली. तीच अपेक्षा आता या मंडळाकडून आहे. या मंडळातील तज्ज्ञ मार्गदर्शक अभ्यास करून सरकारला विविध सूचना करतात. शिफारशी करतात. त्यावर सरकारने एक नजर फिरवून अंमलबजावणी करण्याचीही गरज आहे. चैनसुख संचेती यांच्या रूपात एक अनुभवी नेत्याच्या हाती विदर्भ विकासाची धुरा सोपविण्यात आली आहे. ते आता आपल्या नियोजनातून विदर्भालाही सुखाचे दिवस आणतील, एवढीच अपेक्षा आहे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्र