शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय : अंमलबजावणी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 03:50 IST

पिंपरी-चिंचवड येथे खून, खुनी हल्ले, गँगवॉर, तोडफोड असा गुन्हेगारीचा वाढता आलेख आहे. त्यामुळे येथे पोलीस आयुक्तालयाची नितांत गरज आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर अंमलबजावणीसाठी प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता आहे.

- हणमंत पाटीलपिंपरी-चिंचवड येथे खून, खुनी हल्ले, गँगवॉर, तोडफोड असा गुन्हेगारीचा वाढता आलेख आहे. त्यामुळे येथे पोलीस आयुक्तालयाची नितांत गरज आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर अंमलबजावणीसाठी प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता आहे.पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र आयुक्तालय व्हावे, असा मुद्दा प्रत्येक विधिमंडळ अधिवेशनाच्या वेळी उपस्थित केला जातो. त्यावर हा प्रश्न लवकरच निकाली निघेल, अशी गुळगुळीत घोषणा अनेक वर्षांपासून सुरू आहे. गुरुवारीही मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात ही घोषणा केली. प्रत्यक्षात तो दिवस कधी उजाडणार, असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर स्वतंत्र आयुक्तालय सुरू होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने प्रश्न मार्गी लागणार असल्याचा दावा भाजपाच्या स्थानिक आमदारांनी केला आहे.पिंपरी-चिंचवडची गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढ झाली. येथील विविध रोजगार संधीमुळे स्थलांतरितांचे प्रमाण मोठे आहे. शहराची लोकसंख्या २० लाखांच्या पुढे गेली. उद्योगनगरीच्या नागरीकरणाबरोबरच गुन्हेगारीतही प्रचंड वाढ झाली आहे. सध्या नागपूरनंतर गुन्हेगारीचे सर्वाधिक प्रमाण असलेले हे दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. आठवड्याला दोन ते तीन खुनाच्या घटना घडतात. गँगवार, रस्त्यावरील गाड्यांची तोडफोड, दहशत माजविणे, महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांवर खुनी हल्ले असे प्रकार वारंवार घडतात. त्यामुळे येथे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय व्हावे, अशी स्थानिक नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. स्थानिक पातळीवरील पोलीस यंत्रणेकडून सर्वेक्षण अहवाल व आराखडा गृह विभागाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर शासनाने स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी जागा उपलब्ध करण्याविषयीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने जागा देण्याची तयारी तात्काळ दर्शविली, शिवाय महापालिका पदाधिकारी व प्रशासनाने पोलीस आयुक्तालयासाठी आवश्यक आर्थिक सहकार्य करण्याची तयारी दाखविली आहे. त्यानंतर आयुक्तालयाचा चेंडू गृह विभागाकडून अर्थखात्याकडे गेला आहे. गृहखात्याकडे आयुक्तालयाचे चार प्रस्ताव दाखल झाले. त्यात पिंपरी-चिंचवडसह कोल्हापूर, मीरा-भार्इंदर व अकोला शहराचा समावेश आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची नवी हद्द, जागा, इमारत उभारणी व मनुष्यबळासाठी निधीच्या तरतुदीची आवश्यकता आहे. मात्र, राज्य शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात त्यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद केल्याचे दिसत नाही. विधिमंडळ अधिवेशनात आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबूकस्वार व महेश लांडगे यांनी वेळोवेळी याविषयी प्रश्न मांडले. शिवाय गतवर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोºहे यांनीही लक्षवेधी सूचना मांडून स्वतंत्र आयुक्तालयाची गरज असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. दोन वर्षांतील गुन्हेगारी घटनांचा चढता आलेख आकडेवारीसह सादर करून त्यांनी शासनाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता मिळाली असून, आयुक्तालयाचे कामकाज लवकरच सुरू होईल, असे आश्वासन गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिले होते. आता या घोषणेलाही एक वर्ष झाले. आघाडी सरकारच्या कालखंडापासून शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचे घोंगडे भिजत पडले आहे. महापालिका निवडणुकीतही सर्वच राजकीय पक्षांनी आश्वासने, घोषणा व वचन दिले होते. आता पुन्हा घोषणा झाली पण प्रत्यक्ष अंमलबजावणीे कधी होणार, याची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा