शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; राज्य सरकारचा शासन निर्णय
2
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
3
“PM मोदी अन् नितीश कुमारांची जादू, बिहारमध्ये NDAचाच विजय होणार”; CM फडणवीसांना विश्वास
4
जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”
5
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी ट्रॅव्हिस हेडचं मोठं वक्तव्य, रोहित-विराटबद्दल म्हणाला...
6
'थामा'मध्ये रश्मिका मंदानाचे दमदार अ‍ॅक्शन सीन्स; म्हणाली, "पहिल्यांदाच मी अशा..."
7
टायटन-रिलायन्ससह 'या' स्टॉक्सचा धमाका! निफ्टीने १२ महिन्यांचा विक्रम मोडला, एका दिवसात २% तेजी
8
दिवाळीत आपलं कुटुंब ठेवा सुरक्षित! फक्त ५ रुपयांत ५०,००० चा विमा; या कंपनीने आणला 'फटाका इन्शुरन्स'
9
‘तुम्ही चुकीचे आहात, पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना घाबरत नाहीत...’; अमेरिकन सिंगरने राहुल गांधींना फटकारले
10
Kolhapur Crime: धक्कादायक! कोल्हापूरमध्ये सहा नृत्यांगनांनी केला सामूहिकरीत्या जीवन संपवण्याचा प्रयत्न
11
"त्या त्या वेळी तुम्ही आडवे झाले आहात"; शिंदेंच्या नेत्याने थोपटले दंड, भाजपच्या आमदारानेही दाखवले 'बळ'
12
पोस्टाने आता २४ तासांत गॅरंटीड डिलिव्हरी सेवा! टपाल विभागाचे प्रायव्हेट कुरिअर कंपन्यांना आव्हान
13
“शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडायचे नाही, आधी १ लाख द्या”; उद्धव ठाकरेंची टीका
14
PM मोदींच्या आईबद्दल अपशब्द भोवले, काँग्रेसच्या मोहम्मद नौशादांची उमेदवारी रद्द...
15
युवा चेहरा, हिरा व्यापारी...कोण आहे हर्ष सांघवी?; सर्वात कमी वयात भाजपानं दिली मोठी जबाबदारी
16
Ranji Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळलं, पठ्ठ्यानं रणजी स्पर्धेत काढला राग, ठोकलं द्विशतक!
17
अफगाण सीमेवर आत्मघातकी हल्ल्यात सात पाकिस्तानी सैनिक ठार, दोन्ही देशांमध्ये तणाव कायम
18
काही मिनिटांत झोमॅटोच्या दीपिंदर गोयल यांचे बुडाले ५५६ कोटी रुपये; छोट्या गुंतवणूकदारांनीही हात वर केले, कारण काय?
19
भारतीय हवाई दलाची ताकद वाढली, शत्रूचे धाबे दणाणणार; स्वदेशी तेजस MK1 A लढाऊ विमानाचं उड्डाण
20
“सढळहस्ते मदत करायची सरकारची तयारी नाही, शेतकऱ्यांची दिवाळी काळी...”; शरद पवारांची टीका

संधिसाधूंचा सुकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 01:05 IST

कोरोनारूपी संकटाने जग भयग्रस्त झाले असताना, अनेक जण संकटात सापडले असताना, मदतीचे अनेक हात पुढे आलेले दिसतात.

माणसाने परोपकाराचा कितीही आव आणला तरी त्याची मूळप्रवृत्ती वेळेवर उफाळून वर येतेच. षड्रिंपूसोबत ही प्रवृत्ती पिंगा घालत असतेच. सद्वर्तनाचा प्रयत्न करून माणूस या सर्वांवर मात करण्याचा प्रयत्न करतो; पण बहुतेक वेळा पराभवच त्याच्या पदरी पडतो. ‘संकटसमयी कोण कामास येतो’ हे वचन वारंवार वास्तवाची जाणीवही करून देत असते; पण जरा काही बरे दिवस आले की, आपल्याला वास्तवाचा विसर पडतो.

कोरोनारूपी संकटाने जग भयग्रस्त झाले असताना, अनेक जण संकटात सापडले असताना, मदतीचे अनेक हात पुढे आलेले दिसतात. त्याचवेळी परिस्थितीची असहायता पाहून हात साफ करणारेही कमी नसतात. कोणत्याही वस्तूची टंचाई नसताना आज बाजारात अन्नधान्य, भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. एकीकडे शेतकऱ्यांवर भाजीपाला, फळे फेकून देण्याची पाळी आली. कारण वाहतूक ठप्प आहे. शहरात भाजीपाला आणला तरी व्यापारी भाव पाडून खरेदी करतात, म्हणजे एक तर भाजीपाला, फळे नाशवंत असल्याने हाती पडेल ते घ्यावे लागते.

‘अडला हरी’ यापेक्षा वेगळे काही करू शकत नाही. दुसरीकडे सुगी संपत आल्याने गहू, ज्वारीसारख्या धान्याचे साठे भरपूर आहेत. डाळी मुबलक आहेत; पण किरकोळ विक्रीत यांचीही भाववाढ झाली. सरकारही अशा नफेखोरांवर नजर ठेवून आहे; परंतु सरकारसमोर आजच्या घडीला हा प्राधान्याचा विषय होऊ शकत नाही. अशी संधी साधत नफेखोर उखळ पांढरे करीत आहेत. मागणी आणि पुरवठा यापैकी कोणत्याही घटकात तफावत नसताना अशी भाववाढ अनैसर्गिक असते आणि ती केवळ नफेखोरांनीच केलेली असते, अशीच परिस्थिती दुधाचीही आहे.

दुधाचे उत्पादन नाशवंत असल्याने अनेक शेतकऱ्यांना ते फेकून द्यावे लागते किंवा कवडीमोल दराने तरी विकावे लागते; पण शहरांमध्ये दूध महागले आहे. या साखळीमध्ये सर्वात जास्त नागवला जातो तो शेतकरी. कारण या उत्पादनामध्ये खरी गुंतवणूक त्याची असते. तो जसा पैसा गुंतवतो तसाच तो श्रमही खर्ची घालतो; पण त्याची झोळी फाटकीच राहते. यावर्षी तर पावसाने झोडपल्याने त्याचे खरीप गेले. कोरोनाचा पहिला फटका त्याला बसला. कोरोनामुळे चीनवर संकट आले त्यावेळी कापसाचे भाव गडगडले. हा काळ नेमका कापूस विक्रीला काढण्याचा होता. अतिवृष्टीमुळे मक्याचे उत्पादन घटले आणि आयातही ठप्प झाल्याने मक्याचे भाव कधी नव्हे ते दोन हजारांवर पोहोचले होते; पण कोरोनाने पोल्ट्री उद्योगाचे कंबरडे मोडल्याने मक्याची पार घसरगुंडी झाली. ती सहा-सातशे रुपयांपर्यंत म्हणजे येथेही नुकसान झाले.

आताही रबीची सुगी झाली आणि घाऊक बाजारातील भाव नैसर्गिकपणे उतरले. शिवाय कोरोनाच्या प्रकोपाचाही परिणाम झाला. बाजारपेठा बंद असल्याने स्थानिक पातळीवरच आतबट्ट्याचे व्यवहार करावे लागले. शेवटी नुकसान शेतकºयाचेच झाले आहे. अन्नधान्याचे भाव स्थिर ठेवणे तसेच नफेखोरीला आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणा असली तरी ती सध्या वेगळ्या आघाडीवर व्यस्त आहे. संकटात जशा आशादायक बातम्या लढण्याची ऊर्मी वाढवतात, तशा अशा संधिसाधूंच्या कृत्यामुळे एक निराशेचे मळभही येते. तरी लढताना धीर सोडता येत नाही आणि आता तर अदृश्य शत्रूशी अस्तित्वाची लढाई आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव जगभर असला तरी प्रामुख्याने युरोप, अमेरिकेत ही प्रवृत्ती दिसत नाही किंवा तशा बातम्याही नाहीत. त्याचवेळी नागरिकही तितक्याच जबाबदारीने वागताना दिसतात. बाजारात अनावश्यक मागणी झाली, तर नफेखोरांसाठी ती संधी असते. देशात जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधी, फळे, इंधन, अशी कोणत्याही वस्तूंची टंचाई नाही. सरकारही वारंवार याचा दिलासा देताना दिसते; पण लोकच अनावश्यक खरेदी करून अशा वस्तूंचे साठे करीत आहेत. कारण बाजार बंद राहील ही भीती वाटते. या अकारण काळजीपोटी ही वारेमाप आणि बेभाव खरेदी चालू आहे. कारण कोरोनाच्या भीतीने सारासार विचार करणे समाजाने सोडून दिलेले दिसते.

महाराष्ट्रात तर वर्षभर पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा आहे, तरी जनतेच्या मनात संभ्रम का निर्माण होतो, असा प्रश्न पडतोच. भीतीमुळे सारासार विवेक शिल्लक राहत नाही. अशावेळी उमेद वाढवणाºया गोष्टी असताना मानवी प्रवृत्तीचे दर्शनही प्रकर्षाने होते. शेवटी लोभ, हाव, स्वार्थ याला काहीही म्हणता येते. शेवटी ती मूळप्रवृत्ती आहे आणि आपल्या गूणसूत्रांसह आलेली, म्हणूनच संधिसाधंूसाठी सुकाळ म्हणावा आणि आपला संघर्ष चालू ठेवावा.

देशात जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधी, फळे, इंधन, अशी कोणत्याही वस्तूंची टंचाई नाही. सरकारही वारंवार याचा दिलासा देताना दिसते; पण लोकच अनावश्यक खरेदी करून अशा वस्तूंचे साठे करीत आहेत. कारण बाजार बंद राहील ही भीती वाटते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत