शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

सांसदीय गोंधळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:52 IST

एवढे दिवस संसदेत आरडाओरड करून आम्ही ती बंद पाडली तरी सरकार ‘जनतेचे प्रश्न’ हाती घेत नाही म्हणून काँग्रेसने देशव्यापी उपोषण मांडले, नंतर त्यांनी संसद बंद पाडून लोकशाही मारली म्हणून भाजपने तसेच उपोषण देशभर केले.

एवढे दिवस संसदेत आरडाओरड करून आम्ही ती बंद पाडली तरी सरकार ‘जनतेचे प्रश्न’ हाती घेत नाही म्हणून काँग्रेसने देशव्यापी उपोषण मांडले, नंतर त्यांनी संसद बंद पाडून लोकशाही मारली म्हणून भाजपने तसेच उपोषण देशभर केले. संसद चालविणे याहून ती बंद पाडणे हाच कार्यक्रम आपल्या राजकीय पक्षांनी २०१२ पासून चालविला आहे. डॉ. मनमोहन सिंगांचे सरकार सत्तेवर असताना हा पराक्रम भाजपने केला. आता मोदींचे सरकार सत्तारूढ असताना त्याची परतफेड काँग्रेस करीत आहे. या दोन्ही पक्षांच्या परस्परविरोधी कांगाव्याला त्याचमुळे अर्थ नाही. प्रसिद्धीसाठी फ ायद्याची स्टंटबाजी हेच त्यांच्या संसद बंद पाडण्याच्या व नंतर उपोषण करण्याच्या प्रकारातील तथ्य आहे. आश्चर्य याचे की या दोन्ही राष्ट्रीय म्हणविणाऱ्या पक्षांचे मानांकित नेतेही या गदारोळात सहभाग घेताना, त्यास प्रोत्साहन देताना जसे दिसले तसे त्यांच्यातील कुणी आपल्या निष्ठावंत अनुयायांना, किमान लोकशाहीसाठी, आवर घालतानाही दिसले नाही. त्यामुळे संसदेतील गदारोळ, संसद बंदी आणि त्यानंतरची वेतनबंदी व उपोषण हे सारे एकाच निंद्य नाटकाचे चार अंक आहेत आणि ते मुकाटपणे पाहण्याची पाळी देशाच्या सुबुद्ध मतदारांवर आली आहे. आणखी एक गंमत ही की काँग्रेसचे लोक संसद बंद पाडतात तेव्हा त्या पक्षाचे कार्यकर्ते टाळ्या वाजवितात आणि भाजपावाले आपल्या संसद बंदीच्या वेळीही तसाच जल्लोष करताना दिसतात. वास्तव एवढेच की लोकशाही म्हणजे केवळ आमच्याच पक्षाचे राज्य अशी या साºयांची धारणा आहे. तुमचे राज्य म्हणजे लोकशाही नव्हे असा याचा दुसरा अर्थ आहे. संसदेत राहुल गांधी असतात, सोनियाजी असतात, तसे अडवाणी आणि जोशीही असतात. मात्र या मोठ्या माणसांसह सारे ज्येष्ठ नेतेही अशावेळी मौन बाळगून असतात किंवा ते जे सुरू आहे तोच सद्यस्थितीवरचा खरा उपाय आहे, असे त्यांनाही वाटत असते. तात्पर्य लोकशाहीविषयीची या पक्षांची ही एक मोठी राजकीय ढोंगबाजी आहे. त्यांचे खरे प्रेम सत्तेवर आहे आणि सत्तेतून मिळणाºया अधिकारावर व आणखीही त्यातून मिळणाºया अनुषंगिक लाभांवरच त्यांचा खरा लोभ आहे. त्यामुळे या बतावणीला कुणी बळी पडण्याचे कारण नाही. कालपर्यंत त्यांचा गोंधळ झाला, आता हे गोंधळ करीत आहेत आणि हे गोंधळीच आपले प्रतिनिधी म्हणून आपले भविष्य साकारायला आपण निवडून दिले आहेत. माध्यमांचे बरे आहे, ती या ढोंगाचे विश्लेषण करीत नाहीत आणि त्यांचा इतिहासही लोकांना सांगत नाहीत. आजचा गोंधळ ही आताची ताजी बातमी आणि कालचा गोंधळ ही शिळी झालेली बिनकामाची बातमी. देशात बेरोजगारीने प्रचंड संताप उभा केला आहे. शेतकºयांच्या आत्महत्या थांबत नाहीत. काश्मीरच्या सीमेवर जवानांचे शहीद होणे सुरूच असते, दलितांवरील अत्याचार वाढत असतात आणि अल्पसंख्याकांच्या मनातली धास्तीही मोठी होत असते. तिकडे चीन धमक्या देतो आणि देशाच्या अनेक प्रदेशांवर आपला हक्क सांगतो. बँका नागरिकांचे पैसे बुडवितात, ते बुडविणारे विदेशात मजेत असतात, त्यांच्या तेथे पोहोचण्यास सरकारची मदतही लाभत असते. पंतप्रधान मात्र स्वच्छतेच्या मोहिमा काढतात आणि अमित शहा ‘काँग्रेसमुक्त भारताची’ हाळी देतात. तात्पर्य जनतेचे प्रश्न जेथल्या तेथे, देशासमोरची संकटे आहेत तशीच. जनतेचे प्रतिनिधी वेतन परत करतात (त्या दिवसातील उत्पन्न परत करत नाहीत) आणि आपली हतबलता दाखवायला उपोषणाचे मंडप उभे करतात. त्या मंडपातील भाषणेही प्रचारी आणि मतांचा जोगवा मागणारी. ही सारी गोंधळगाथा भारत माता पाहत असते आणि सामान्य जनतेसारखीच बहुदा तीही व्यथित होत असते. लोकशाहीला काळीमा फासणे हीच लोकशाही वाचविण्याची कृती आहे असे बहुदा आपल्या पुढाºयांचे मत झाले असावे असे सांगणारे हे चित्र आहे.

टॅग्स :ParliamentसंसदBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभा