शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

सांसदीय गोंधळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:52 IST

एवढे दिवस संसदेत आरडाओरड करून आम्ही ती बंद पाडली तरी सरकार ‘जनतेचे प्रश्न’ हाती घेत नाही म्हणून काँग्रेसने देशव्यापी उपोषण मांडले, नंतर त्यांनी संसद बंद पाडून लोकशाही मारली म्हणून भाजपने तसेच उपोषण देशभर केले.

एवढे दिवस संसदेत आरडाओरड करून आम्ही ती बंद पाडली तरी सरकार ‘जनतेचे प्रश्न’ हाती घेत नाही म्हणून काँग्रेसने देशव्यापी उपोषण मांडले, नंतर त्यांनी संसद बंद पाडून लोकशाही मारली म्हणून भाजपने तसेच उपोषण देशभर केले. संसद चालविणे याहून ती बंद पाडणे हाच कार्यक्रम आपल्या राजकीय पक्षांनी २०१२ पासून चालविला आहे. डॉ. मनमोहन सिंगांचे सरकार सत्तेवर असताना हा पराक्रम भाजपने केला. आता मोदींचे सरकार सत्तारूढ असताना त्याची परतफेड काँग्रेस करीत आहे. या दोन्ही पक्षांच्या परस्परविरोधी कांगाव्याला त्याचमुळे अर्थ नाही. प्रसिद्धीसाठी फ ायद्याची स्टंटबाजी हेच त्यांच्या संसद बंद पाडण्याच्या व नंतर उपोषण करण्याच्या प्रकारातील तथ्य आहे. आश्चर्य याचे की या दोन्ही राष्ट्रीय म्हणविणाऱ्या पक्षांचे मानांकित नेतेही या गदारोळात सहभाग घेताना, त्यास प्रोत्साहन देताना जसे दिसले तसे त्यांच्यातील कुणी आपल्या निष्ठावंत अनुयायांना, किमान लोकशाहीसाठी, आवर घालतानाही दिसले नाही. त्यामुळे संसदेतील गदारोळ, संसद बंदी आणि त्यानंतरची वेतनबंदी व उपोषण हे सारे एकाच निंद्य नाटकाचे चार अंक आहेत आणि ते मुकाटपणे पाहण्याची पाळी देशाच्या सुबुद्ध मतदारांवर आली आहे. आणखी एक गंमत ही की काँग्रेसचे लोक संसद बंद पाडतात तेव्हा त्या पक्षाचे कार्यकर्ते टाळ्या वाजवितात आणि भाजपावाले आपल्या संसद बंदीच्या वेळीही तसाच जल्लोष करताना दिसतात. वास्तव एवढेच की लोकशाही म्हणजे केवळ आमच्याच पक्षाचे राज्य अशी या साºयांची धारणा आहे. तुमचे राज्य म्हणजे लोकशाही नव्हे असा याचा दुसरा अर्थ आहे. संसदेत राहुल गांधी असतात, सोनियाजी असतात, तसे अडवाणी आणि जोशीही असतात. मात्र या मोठ्या माणसांसह सारे ज्येष्ठ नेतेही अशावेळी मौन बाळगून असतात किंवा ते जे सुरू आहे तोच सद्यस्थितीवरचा खरा उपाय आहे, असे त्यांनाही वाटत असते. तात्पर्य लोकशाहीविषयीची या पक्षांची ही एक मोठी राजकीय ढोंगबाजी आहे. त्यांचे खरे प्रेम सत्तेवर आहे आणि सत्तेतून मिळणाºया अधिकारावर व आणखीही त्यातून मिळणाºया अनुषंगिक लाभांवरच त्यांचा खरा लोभ आहे. त्यामुळे या बतावणीला कुणी बळी पडण्याचे कारण नाही. कालपर्यंत त्यांचा गोंधळ झाला, आता हे गोंधळ करीत आहेत आणि हे गोंधळीच आपले प्रतिनिधी म्हणून आपले भविष्य साकारायला आपण निवडून दिले आहेत. माध्यमांचे बरे आहे, ती या ढोंगाचे विश्लेषण करीत नाहीत आणि त्यांचा इतिहासही लोकांना सांगत नाहीत. आजचा गोंधळ ही आताची ताजी बातमी आणि कालचा गोंधळ ही शिळी झालेली बिनकामाची बातमी. देशात बेरोजगारीने प्रचंड संताप उभा केला आहे. शेतकºयांच्या आत्महत्या थांबत नाहीत. काश्मीरच्या सीमेवर जवानांचे शहीद होणे सुरूच असते, दलितांवरील अत्याचार वाढत असतात आणि अल्पसंख्याकांच्या मनातली धास्तीही मोठी होत असते. तिकडे चीन धमक्या देतो आणि देशाच्या अनेक प्रदेशांवर आपला हक्क सांगतो. बँका नागरिकांचे पैसे बुडवितात, ते बुडविणारे विदेशात मजेत असतात, त्यांच्या तेथे पोहोचण्यास सरकारची मदतही लाभत असते. पंतप्रधान मात्र स्वच्छतेच्या मोहिमा काढतात आणि अमित शहा ‘काँग्रेसमुक्त भारताची’ हाळी देतात. तात्पर्य जनतेचे प्रश्न जेथल्या तेथे, देशासमोरची संकटे आहेत तशीच. जनतेचे प्रतिनिधी वेतन परत करतात (त्या दिवसातील उत्पन्न परत करत नाहीत) आणि आपली हतबलता दाखवायला उपोषणाचे मंडप उभे करतात. त्या मंडपातील भाषणेही प्रचारी आणि मतांचा जोगवा मागणारी. ही सारी गोंधळगाथा भारत माता पाहत असते आणि सामान्य जनतेसारखीच बहुदा तीही व्यथित होत असते. लोकशाहीला काळीमा फासणे हीच लोकशाही वाचविण्याची कृती आहे असे बहुदा आपल्या पुढाºयांचे मत झाले असावे असे सांगणारे हे चित्र आहे.

टॅग्स :ParliamentसंसदBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभा