शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

संसदेचे अधिवेशन हवेच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 05:36 IST

महामारीचे संकट देशव्यापी बनलेले असले आणि संचार-संमेलनावर निर्बंध आलेले असले, तरी जसे अर्थव्यवस्था गतिमान होणे आवश्यक आहे, तसेच संसदेचे अधिवेशन घटनेने घालून दिलेल्या नियमांच्या चौकटीत व मुदतीत घेणेही क्रमप्राप्त आहे.

संसदेचे अधिवेशन बोलाविण्याची मागणी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष करू लागले आहेत. घटनेनुसार संसदेच्या दोन अधिवेशनांदरम्यान सहा महिन्यांहून अधिक काळ जाता कामा नये. याआधीचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कोविड संकटामुळे २३ मार्च रोजी घाईघाईत आटोपते घेत कामकाज बेमुदत तहकूब करावे लागले होते. सहा महिन्यांचा कालावधी २२ सप्टेेंबर रोजी संपुष्टात येईल.

तत्पूर्वी अधिवेशन घेणे राज्यघटनेनुसार क्रमप्राप्त आहे. वैधानिक सक्तीव्यतिरिक्त अधिवेशन इतरही अनेक कारणांसाठी आवश्यक ठरते. देश अभूतपूर्व अशा स्थित्यंतरातून जात आहे. महामारीची हाताळणी करणाऱ्या सरकारचे यशापयश ऐरणीवर आणत चर्चा होणे अगत्याचे आहे. ढेपाळलेल्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणतानाचा सरकारी कारभार एकारलेपणाचा होऊ नये यासाठी संसदेचा वचक अत्यावश्यक असून, अधिवेशनातूनच ती संधी प्राप्त होईल. त्यातच चीनने गलवान खोºयात केलेली आगळीक देशाच्या चिंतेचा विषय ठरली असून, ही चिंता सर्वोच्च प्रतिनिधीगृहात उमटणे आवश्यक आहे. याच काळात नेपाळच्या संसदेने आपल्या देशाचा नकाशा बदलत भारतीय जमिनीवर दावा केलेला आहे. या कृत्याची चिकित्सा होणेही आवश्यक आहे. कोविडकाळात सरकारने घेतलेल्या बºयाच निर्णयांवरही सांसदीय खल व्हायला हवा. याशिवाय सरकारला काही अध्यादेशांना संसदेची मान्यता मिळवायची आहे. त्यामुळे अधिवेशन अपरिहार्य बनते; पण हे अधिवेशन कसे घ्यायचे याचे चित्र स्पष्ट झालेले नाही. राज्यसभेचे अध्यक्ष- उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यात काही बैठकाही झालेल्या असल्या तरी निर्णय प्रलंबित आहे. संसदेचे ७५० सदस्य, त्यांचे कर्मचारी, दोन्ही सभागृहांचे कर्मचारी, सुरक्षाकर्मी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी अशा किमान चार हजार लोकांची वर्दळ अधिवेशनकाळात दर दिवशी असते. त्यामुळे संसर्गाची टांगती तलवार घेऊनच अधिवेशन भरवावे लागेल. अनेक खासदार हे ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे धोक्याची छाया आणखीनच गडद होते. शारीरिक अंतर राखून अधिवेशन भरवायचे तर त्यासाठी सुरक्षित जागा कुठली निवडायची, हा मुख्य प्रश्न आहे.

संसदेचे नवे प्रशस्त संकुल पूर्ण होण्यास पुढची किमान दोन वर्षे उलटतील. ‘सेंट्रल हॉल’मध्ये लोकसभा तर सध्याच्या लोकसभेच्या दालनात राज्यसभा भरविण्याचा प्रस्ताव असून, सद्य:स्थितीत तो व्यवहार्य वाटतो. दुसरा पर्याय आहे तो प्रत्यक्ष खासदारांच्या उपस्थितीची अट शिथिल करत त्यांना प्रशस्त वाटेल अशा ठिकाणावरून कामकाजात भाग घेण्याची परवानगी देण्याचा. ज्यांना शक्य असेल त्यांनी संसदेत उपस्थित राहावे आणि उर्वरितांनी ‘व्हर्च्युअल’ उपस्थिती लावावी, अशी व्यवस्था करता येईल. इंग्लंड आणि फिलिपाईन्समध्ये हा ‘हायब्रीड’ अधिवेशनाचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. अर्थात आपल्याकडे तो राबविताना अनंत अडचणी येणेही स्वाभाविक. देशाचा भौगोलिक विस्तार आणि खासदारांची एकूण संख्या यापासून वीजपुरवठ्यातले सातत्य आणि आंतरजालाची उपलब्धता अशा अनेक समस्या आहेत. शिवाय असा प्रयोग करण्यासाठी आवश्यक असलेली तंत्रसाक्षरता किती खासदारांकडे असेल, याबाबतीत न बोललेले बरे. अर्थात अडचणी व समस्या असल्या तरी अधिवेशन घेऊन देशासमोरील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणे अत्यावश्यक आहे.

कोविडकाळातही अधिवेशन बोलावून जनतेच्या भावभावना जाणून घेता येतात व खासदारांना उत्तरदायित्वाला न्यायही देता येतो हे युरोपीय संघाबरोबर जर्मनी, स्विडन, इस्रायल, इजिप्त या देशांच्या खासदारांनी दाखवून दिले आहे. आपल्याकडे काय करायचे हा निर्णय अर्थातच केंद्र सरकारवर अवलंबून आहे. विखुरलेल्या विरोधकांना अंगावर घेण्यात काही विशेष वाटू नये. लॉकडाऊनच्या तीव्र झळा निवलेल्या नसताना सरकारच्या निर्णयक्षमतेचे परिशीलन झाले तर त्यातून पुढच्या काळासाठीचे धडे मिळतील. एवीतेवी विषाणू व संसर्ग आपल्यासोबत दीर्घकाळ राहणार असेल तर सांसदीय उत्तरदायित्वाला किती काळ प्रलंबित ठेवणार?

टॅग्स :Parliamentसंसदcorona virusकोरोना वायरस बातम्या