शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
6
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
7
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
8
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
9
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
10
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
11
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
12
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
13
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव
14
लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्तात, गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र
15
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
16
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
17
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
18
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
19
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
20
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?

पालघरमधील रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 04:32 IST

पालघर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घोषित झाली आहे. शिवसेनेने आपला उमेदवार श्रीनिवास वनगांच्या रूपाने घोषित करून व त्याचा अर्ज भरून आघाडी घेतली आहे. भाजपाने शिवसेनेचाच कित्ता गिरवून काँग्रेसच्या राजेंद्र गावितांना ‘हायजॅक’ करून उमेदवारी दिली आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घोषित झाली आहे. शिवसेनेने आपला उमेदवार श्रीनिवास वनगांच्या रूपाने घोषित करून व त्याचा अर्ज भरून आघाडी घेतली आहे. भाजपाने शिवसेनेचाच कित्ता गिरवून काँग्रेसच्या राजेंद्र गावितांना ‘हायजॅक’ करून उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने दामू शिंगडांना पुन्हा एकदा उमेदवारीचे बाशिंग बांधायचे ठरविले आहे, तर डाव्यांनी उमेदवारीची माळ गेहलांच्या गळ्यात घालायचे निश्चित केले आहे. एके काळी आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे केडर बांधण्याला सर्वच राजकीय पक्ष महत्त्व आणि प्राधान्य द्यायचे. आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणे हे अत्यंत हीन समजले जायचे. तर पक्षनिष्ठा ही सर्वोच्च होती, परंतु काळासोबत मूल्येही बदलतात. विशेषत: राजकारणातील मूल्ये झपाट्याने बदलतात, त्याचाच हा परिणाम असावा. संधीसाधूपणा हे आजच्या राजकारणातले सर्वांत मोठे मूल्य ठरले आहे. तुम्ही जेवढ्या जास्त पक्षांत फिरून आलात, तेवढी तुमची ज्येष्ठता मोठी असे समजण्याचा हा काळ आहे. त्यामुळेच अशी राजकीय दलदल बनते, परंतु याला केवळ उमेदवारीचे बाशिंग गुडघ्याला बांधणारे बाशिंगवीरच जबाबदार आहेत, असे म्हणता येणार नाही. पक्षांतर्गत गटबाजी निर्माण होऊ देणारे व तिला गांधारी होऊन खतपाणी घालणारे राजकीय पक्षही तेवढेच जबाबदार आहेत. ज्या पक्षाने सत्ता आणि पदे दिली, त्याचा त्याग करावा, असे नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना का वाटते? तर त्यांची पक्षात होणारी गळचेपी आणि उपेक्षा यामुळे. यातूनच असंतोष खदखदू लागतो आणि त्याची परिणती शेवटी होते, ती त्यांना प्रतिपक्षाने योग्य वेळी गळाला लावण्यात व त्यांनी स्वपक्षाचा त्याग करण्यात. त्यामुळे हे दुष्ट चक्र टाळायचे असेल, तर राजकीय पक्षांनी अधिक जागरूक होण्याची गरज आहे. शेवटी पक्ष म्हणजे काय? तर त्यातील नेते आणि कार्यकर्ते. तेच जर पक्षाचा त्याग करू लागले, तर पक्ष उरेल कसा? काँग्रेसने प्रादेशिक नेत्यांची उपेक्षा केली. त्यातून त्यांच्या ताब्यातून एकेक राज्य निसटून गेले. बंगालमध्ये ममता बॅनर्जी, महाराष्टÑात शरद पवार अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. भाजपालाही अशीच लागण झाली आहे. त्यामुळेच श्रीनिवास वनगांना शिवसेनेच्या वळचणीस जावेसे वाटते, तर राजेंद्र गावितांना काँग्रेसच्या दुर्लक्षामुळे भाजपाची साथ धरावीशी वाटते. असेच झटके व फटके सर्वच पक्षांना बसताहेत, परंतु त्यातून धडा शिकण्यास कुणीही तयार नाही. त्यामुळेच आयाराम-गयाराम यांचे महत्त्व वाढते. पालघर मतदार संघात याचेच दर्शन झाले. मतदारराजाही हे सारे उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे, यासारखे दुर्दैव नाही.

टॅग्स :palgharपालघरLoksabhaलोकसभाElectionनिवडणूकnewsबातम्याShiv SenaशिवसेनाBJPभाजपा