शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
4
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
5
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
6
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
7
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
8
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
9
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
10
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
11
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
12
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
13
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
14
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
15
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
16
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
17
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
18
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
19
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट

पालघरमधील रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 04:32 IST

पालघर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घोषित झाली आहे. शिवसेनेने आपला उमेदवार श्रीनिवास वनगांच्या रूपाने घोषित करून व त्याचा अर्ज भरून आघाडी घेतली आहे. भाजपाने शिवसेनेचाच कित्ता गिरवून काँग्रेसच्या राजेंद्र गावितांना ‘हायजॅक’ करून उमेदवारी दिली आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घोषित झाली आहे. शिवसेनेने आपला उमेदवार श्रीनिवास वनगांच्या रूपाने घोषित करून व त्याचा अर्ज भरून आघाडी घेतली आहे. भाजपाने शिवसेनेचाच कित्ता गिरवून काँग्रेसच्या राजेंद्र गावितांना ‘हायजॅक’ करून उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने दामू शिंगडांना पुन्हा एकदा उमेदवारीचे बाशिंग बांधायचे ठरविले आहे, तर डाव्यांनी उमेदवारीची माळ गेहलांच्या गळ्यात घालायचे निश्चित केले आहे. एके काळी आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे केडर बांधण्याला सर्वच राजकीय पक्ष महत्त्व आणि प्राधान्य द्यायचे. आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणे हे अत्यंत हीन समजले जायचे. तर पक्षनिष्ठा ही सर्वोच्च होती, परंतु काळासोबत मूल्येही बदलतात. विशेषत: राजकारणातील मूल्ये झपाट्याने बदलतात, त्याचाच हा परिणाम असावा. संधीसाधूपणा हे आजच्या राजकारणातले सर्वांत मोठे मूल्य ठरले आहे. तुम्ही जेवढ्या जास्त पक्षांत फिरून आलात, तेवढी तुमची ज्येष्ठता मोठी असे समजण्याचा हा काळ आहे. त्यामुळेच अशी राजकीय दलदल बनते, परंतु याला केवळ उमेदवारीचे बाशिंग गुडघ्याला बांधणारे बाशिंगवीरच जबाबदार आहेत, असे म्हणता येणार नाही. पक्षांतर्गत गटबाजी निर्माण होऊ देणारे व तिला गांधारी होऊन खतपाणी घालणारे राजकीय पक्षही तेवढेच जबाबदार आहेत. ज्या पक्षाने सत्ता आणि पदे दिली, त्याचा त्याग करावा, असे नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना का वाटते? तर त्यांची पक्षात होणारी गळचेपी आणि उपेक्षा यामुळे. यातूनच असंतोष खदखदू लागतो आणि त्याची परिणती शेवटी होते, ती त्यांना प्रतिपक्षाने योग्य वेळी गळाला लावण्यात व त्यांनी स्वपक्षाचा त्याग करण्यात. त्यामुळे हे दुष्ट चक्र टाळायचे असेल, तर राजकीय पक्षांनी अधिक जागरूक होण्याची गरज आहे. शेवटी पक्ष म्हणजे काय? तर त्यातील नेते आणि कार्यकर्ते. तेच जर पक्षाचा त्याग करू लागले, तर पक्ष उरेल कसा? काँग्रेसने प्रादेशिक नेत्यांची उपेक्षा केली. त्यातून त्यांच्या ताब्यातून एकेक राज्य निसटून गेले. बंगालमध्ये ममता बॅनर्जी, महाराष्टÑात शरद पवार अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. भाजपालाही अशीच लागण झाली आहे. त्यामुळेच श्रीनिवास वनगांना शिवसेनेच्या वळचणीस जावेसे वाटते, तर राजेंद्र गावितांना काँग्रेसच्या दुर्लक्षामुळे भाजपाची साथ धरावीशी वाटते. असेच झटके व फटके सर्वच पक्षांना बसताहेत, परंतु त्यातून धडा शिकण्यास कुणीही तयार नाही. त्यामुळेच आयाराम-गयाराम यांचे महत्त्व वाढते. पालघर मतदार संघात याचेच दर्शन झाले. मतदारराजाही हे सारे उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे, यासारखे दुर्दैव नाही.

टॅग्स :palgharपालघरLoksabhaलोकसभाElectionनिवडणूकnewsबातम्याShiv SenaशिवसेनाBJPभाजपा