शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

पालघरमधील रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 04:32 IST

पालघर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घोषित झाली आहे. शिवसेनेने आपला उमेदवार श्रीनिवास वनगांच्या रूपाने घोषित करून व त्याचा अर्ज भरून आघाडी घेतली आहे. भाजपाने शिवसेनेचाच कित्ता गिरवून काँग्रेसच्या राजेंद्र गावितांना ‘हायजॅक’ करून उमेदवारी दिली आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घोषित झाली आहे. शिवसेनेने आपला उमेदवार श्रीनिवास वनगांच्या रूपाने घोषित करून व त्याचा अर्ज भरून आघाडी घेतली आहे. भाजपाने शिवसेनेचाच कित्ता गिरवून काँग्रेसच्या राजेंद्र गावितांना ‘हायजॅक’ करून उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने दामू शिंगडांना पुन्हा एकदा उमेदवारीचे बाशिंग बांधायचे ठरविले आहे, तर डाव्यांनी उमेदवारीची माळ गेहलांच्या गळ्यात घालायचे निश्चित केले आहे. एके काळी आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे केडर बांधण्याला सर्वच राजकीय पक्ष महत्त्व आणि प्राधान्य द्यायचे. आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणे हे अत्यंत हीन समजले जायचे. तर पक्षनिष्ठा ही सर्वोच्च होती, परंतु काळासोबत मूल्येही बदलतात. विशेषत: राजकारणातील मूल्ये झपाट्याने बदलतात, त्याचाच हा परिणाम असावा. संधीसाधूपणा हे आजच्या राजकारणातले सर्वांत मोठे मूल्य ठरले आहे. तुम्ही जेवढ्या जास्त पक्षांत फिरून आलात, तेवढी तुमची ज्येष्ठता मोठी असे समजण्याचा हा काळ आहे. त्यामुळेच अशी राजकीय दलदल बनते, परंतु याला केवळ उमेदवारीचे बाशिंग गुडघ्याला बांधणारे बाशिंगवीरच जबाबदार आहेत, असे म्हणता येणार नाही. पक्षांतर्गत गटबाजी निर्माण होऊ देणारे व तिला गांधारी होऊन खतपाणी घालणारे राजकीय पक्षही तेवढेच जबाबदार आहेत. ज्या पक्षाने सत्ता आणि पदे दिली, त्याचा त्याग करावा, असे नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना का वाटते? तर त्यांची पक्षात होणारी गळचेपी आणि उपेक्षा यामुळे. यातूनच असंतोष खदखदू लागतो आणि त्याची परिणती शेवटी होते, ती त्यांना प्रतिपक्षाने योग्य वेळी गळाला लावण्यात व त्यांनी स्वपक्षाचा त्याग करण्यात. त्यामुळे हे दुष्ट चक्र टाळायचे असेल, तर राजकीय पक्षांनी अधिक जागरूक होण्याची गरज आहे. शेवटी पक्ष म्हणजे काय? तर त्यातील नेते आणि कार्यकर्ते. तेच जर पक्षाचा त्याग करू लागले, तर पक्ष उरेल कसा? काँग्रेसने प्रादेशिक नेत्यांची उपेक्षा केली. त्यातून त्यांच्या ताब्यातून एकेक राज्य निसटून गेले. बंगालमध्ये ममता बॅनर्जी, महाराष्टÑात शरद पवार अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. भाजपालाही अशीच लागण झाली आहे. त्यामुळेच श्रीनिवास वनगांना शिवसेनेच्या वळचणीस जावेसे वाटते, तर राजेंद्र गावितांना काँग्रेसच्या दुर्लक्षामुळे भाजपाची साथ धरावीशी वाटते. असेच झटके व फटके सर्वच पक्षांना बसताहेत, परंतु त्यातून धडा शिकण्यास कुणीही तयार नाही. त्यामुळेच आयाराम-गयाराम यांचे महत्त्व वाढते. पालघर मतदार संघात याचेच दर्शन झाले. मतदारराजाही हे सारे उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे, यासारखे दुर्दैव नाही.

टॅग्स :palgharपालघरLoksabhaलोकसभाElectionनिवडणूकnewsबातम्याShiv SenaशिवसेनाBJPभाजपा