शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

पाकची कृती अयोग्यच; पण क्रीडा-राजकारणाची गल्लत नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 05:34 IST

बहिष्कार टाकायचाच असेल, तर केवळ खेळच नाही, तर पाकबरोबरचे सर्व संबंधही तोडून टाकणे उचित ठरेल.

- शरद कद्रेकर ‘आयएसएफएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पाकिस्तानच्या नेमबाजांना व्हिसा नाकारल्यामुळे भारतीय क्रीडा क्षेत्रावर त्याचे दूरगामी परिणाम दिसून येण्याची शक्यता बळावली आहे. पुलवामा हल्ल्यात भारताचे ४० हून अधिक जवान हुतात्मा झाले. या पार्श्वभूमीवर पाक नेमबाजांना व्हिसा नाकारण्यात आला आणि त्याचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रात उमटले. पाकिस्तानची भारतावर हल्ला करण्याची कृती निषेधार्हच आहे, पण क्रीडाक्षेत्र आणि राजकारण यांची गल्लत करण्यात येऊ नये.आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने (आयओसी) यापुढे भारतात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांवर बंदी घालण्याची शक्यता बळावली आहे. लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत केंद्र सरकार व्हिसाबाबत लेखी हमी देण्याची शक्यता नाही. त्यामुळे मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे यजमानपद भारताला भूषविता येणार नाही. आशियाई ज्युनिअर कुस्ती स्पर्धा तसेच राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेचे यजमानपद भारताला लाभले असून या दोन्ही स्पर्धांमध्ये पाकिस्तानचा सहभाग अपेक्षित आहे. भारतीय आॅलिम्पिक असोसिएशन (आयओए) याबाबत सरकारशी चर्चा करत आहे, जेणेकरून स्पर्धा सुरळीत पार पडावी.जुलैमध्ये होणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धेवर सावट असले तरी, भुवनेश्वरच्या कलिंग स्टेडियमवर जूनमध्ये होणाºया हॉकी सीरिज फायनल्सवर याचा परिणाम होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. यजमान भारतासह हॉकी सीरिज स्पर्धेत जपान, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, रशिया, पोलंड, अमेरिका, उझबेकिस्तान या देशांचा सहभाग अपेक्षित आहे. या संघांतील खेळाडूंबाबत व्हिसाची अडचण उद्भवण्याची शक्यता नसल्यामुळे भुवनेश्वरमधील हॉकी स्पर्धा सुरळीत पार पडण्याला आडकाठी येऊ नये असे वाटते. राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धा भुवनेश्वरमध्ये १७-२२ जुलैदरम्यान आयोजित करण्यात आली असून त्यात पाकिस्तानी संघाचा सहभाग अपेक्षित असल्यामुळे या स्पर्धेवर मात्र सावट आहे.टोकियो आॅलिम्पिकआधी संयुक्त नेमबाजी विश्वचषक (रायफल, पिस्तूल, शॉटगन) स्पर्धेचे यजमानपद भारताला लाभले आहे. परंतु आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीच्या आदेशानुसार भारतात होणाºया या स्पर्धेवर सावटच दिसत आहे. इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशनने (आयएसएसएफ) नॅशनल रायफल असोसिएशन आॅफ इंडियाला (एनआरएआय) याबाबत आपला निर्णय कळविलेला आहे. मार्च अखेरपर्यंत याचा निर्णय सरकारकडून मिळणे सध्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत कठीण दिसते. परिणामी या स्पर्धेचे यजमानपद भारताऐवजी दुसºया देशाला मिळण्याची शक्यता बळावली आहे. शिवाय एप्रिल-मे या निवडणुकींच्या धामधुमीत एनआरएआयला सरकारकडून लेखी हमी मिळणे दुरापास्त दिसत आहे.आशिया-ओशियाना आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेचे आयोजन (एप्रिल २०२०) करण्यात भारतीय बॉक्सिंग फेडरेशन उत्सुक आहे. तसेच फिफा २०२० (१७ वर्षांखालील मुली) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाचे अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे स्वप्नदेखील हवेतच विरण्याची शक्यता दिसते. एकूणच आगामी एक-दोन वर्षांतील भारतात होणाºया आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांवरील सावट स्पष्टपणे दिसत आहे. क्रीडाविश्वात भारताला महासत्ता बनविण्याची दिवास्वप्ने विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी (त्यात बहुतांशी राजकारण्यांचाच सहभाग आहे) दाखवत आहेत. २०२६ युवा आॅलिम्पिक, २०३० एशियाड, २०३२ आॅलिम्पिक यजमानपदाचे इमले रचण्यात आयओएचे पदाधिकारी मशगूल असले, तरी दिवास्वप्नच ठरेल.भारत-पाक विश्वचषक सामन्यावर बहिष्काराबाबत अलीकडे बरीच चर्चा, वादविवाद झाले. पाकला विश्वचषक स्पर्धेतून बहिष्कृत करण्याची मागणीही झाली होती. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बीसीसीआयची मागणी फेटाळून लावली. या प्रकरणात आयसीसी आपल्या नियमाप्रमाणेच वागली. कारण आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रतिस्पर्ध्याशी सामना न खेळल्यास गुण तर गमवावेच लागतात, शिवाय आर्थिक दंडही ठोठावला जातो. १६ जूनला होणाºया विश्वचषक स्पर्धेतील भारत-पाक सामन्याला अद्याप मोठा अवधी असून तोपर्यंत याबबत परिस्थितीमध्ये बदल होणे अपेक्षित आहे. त्यात प्रतिस्पर्धी संघावर बहिष्कार घालून फारसे काही साध्य होईल असे वाटत नाही आणि बहिष्कार टाकायचाच असेल, तर केवळ खेळच नाही, तर पाकबरोबरचे सर्व संबंधही तोडून टाकणे उचित ठरेल.(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत)

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान