शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख : अतिउत्साहातील घोडचूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 04:20 IST

राज्यघटनेच्या अनुच्छेद ३५७ नुसार राष्ट्रपती राजवट संसदेने मंजूर केली, तरच सहा महिने लागू राहू शकते.

राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये जम्मू-काश्मीरला असलेला विशेष दर्जा काढून त्या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याचा मोदी सरकारचा निर्णय लागू होऊन महिना उलटला तरी त्याचे कवित्व संपलेले नाही. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. यास सर्वोच्च न्यायालयातही आव्हान दिले गेले. त्याचा निर्णय सहा महिन्यांत लागणे अपेक्षित नाही. यातच सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील गोपाळ शंकरनारायणन यांनी एक मूलगामी मुद्दा चर्चेत आणला आहे. तो सर्वोच्च न्यायालयानेही उचलून धरला तर सारे मुसळ केरात जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतींकडून ही अधिसूचना करताना मोदी सरकारकडून घोडचूक झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू असल्याने विधानसभा निलंबित आहे, असे गृहित धरून राज्यपालांच्या सल्ल्याने ही अधिसूचना काढली गेली. मात्र, ती काढताना जम्मू-काश्मीरची विधानसभा निलंबित असल्याचे सरकारचे गृहितकच गैरसमजावर आधारित असल्याचे शंकरनारायणन यांचे म्हणणे आहे.

राज्यघटनेच्या अनुच्छेद ३५७ नुसार राष्ट्रपती राजवट संसदेने मंजूर केली, तरच सहा महिने लागू राहू शकते. राष्ट्रपती राजवटीच्या मुदतवाढीला संसदेने मंजुरी दिल्यास तीही सहा महिने लागू राहते. जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटीची पहिली अधिसूचना १९ डिसेंबर २०१८ ला काढण्यात आली. लोकसभेने २८ डिसेंबर २०१८ व राज्यसभेने ३१ जानेवारी २०१९ ला त्यास मंजुरी दिली. ती जानेवारीत मिळाली असली, तरी ती अधिसूचनेच्या मूळ तारखेपासून लागू होणारी होती, म्हणजेच तिची मुदत १८ जून २०१९ ला संपणार होती. मुदतवाढीची नवी अधिसूचना व त्यासाठी संसदेची मंजुरी त्याआधी मिळायला हवी होती; परंतु सरकारने संसदेच्या मंजुरीपासून पुढे सहा महिन्यांचा हिशेब केला. त्यामुळे मूळ अधिसूचना व मुदतवाढीची अधिसूचना या दोन्हींची मिळून मुदत ३ जुलै २०१९ ला संपत आहे, असे गृहित धरून सरकारने २८ जून व १ जुलै २०१९ ला संसदेची दुसरी मंजुरी घेतली. पहिल्या अधिसूचनेची आणि मंजुरीची मुदत संपण्याआधी दुसरी अधिसूचना व तिला मंजुरी न दिल्याने दुसरी मंजुरी असंवैधानिक ठरते. सर्वोच्च न्यायालयाने १९९४ मध्ये एस. आर. बोम्मई प्रकरणात दिलेल्या निकालानुसार अशा त्रुटीमुळे राज्याची निलंबित केलेली विधानसभा पूर्वलक्षी प्रभावाने पुनरुज्जीवित होते. अशा वेळी राष्ट्रपती राजवटीची पूर्णपणे नवी अधिसूचना काढणे, हाच मार्ग शिल्लक राहतो.

जम्मू काश्मीरच्या ताज्या प्रकरणात असेच झाले. मुदतवाढीची दुसरी अधिसूचना न काढता पुन्हा नवी अधिसूचना काढायला हवी होती. तसे न झाल्याने जेव्हा मुदतवाढीची अधिसूचना काढली गेली तेव्हा जम्मू-काश्मीरची विधानसभा पुनरुज्जीवित झालेली होती. ही चूक लक्षात न घेता ५ जुलैला राष्ट्रपतींनी अनुच्छेद ३७० ची अधिसूचना काढली तेव्हा जम्मू-काश्मीरची विधानसभा निलंबित आहे, या समजापोटी राज्यपालांच्या सल्ल्याने तो निर्णय घेण्यात आला. मूळ गृहितकच चुकीचे असल्याने हा नवा निर्णयही घटनाबाह्य ठरतो. इन्कार करताना सरकारने असा खुलासा केला की, अनुच्छेद ३५७ च्या चौथ्या कलमात ४२ व्या घटनादुरुस्तीने सुधारणा केल्या गेल्या व नंतर ४४ व्या घटनादुरुस्तीने त्या दुरुस्त्या निरस्त करून पुन्हा मूळ तरतुदी लागू केल्या गेल्या. मात्र, जम्मू-काश्मीरच्या बाबतीत ही ४४ वी घटनादुरुस्ती लागू केलेली नाही. त्यामुळे त्या राज्याबाबत अजूनही ४२ व्या घटनादुरुस्तीने केलेल्या तरतुदीच लागू आहेत. या किचकट घटनात्मक मुद्द्याचा सोक्षमोक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानेच लागेल. यात सरकार चुकीचे ठरले तर जगभर मोेठे हसे होईल. महत्त्वाच्या विषयात सरकारकडून अशा चुकीची अपेक्षाही नाही. सुरक्षा आणि एकसंघता यासाठी जम्मू-काश्मीरची देशाशी एकात्मकता नक्कीच महत्त्वाची आहे; पण हे करताना सरकारने राज्यघटनेची पायमल्ली करून निर्णय दामटून नेला, असे झाले तर निकोप लोकशाहीला ते खूपच हानिकारक ठरेल. जनमताचा कौल असला तरी सरकारला हे शोभनीय नाही. या बाबतीत संशयाचे धुके जेवढे लवकर दूर होईल तेवढे चांगले.
जम्मू-काश्मिरातील कलम ३७० रद्द करून त्या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करण्याचा निर्णय घेताना विधानसभा निलंबित असल्याचे गृहितक गैरसमजावर आधारित असल्याचे न्यायालयात सिद्ध झाले, तर हसे होईल. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Borderसीमारेषा