शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

...अन्यथा माणसे फणफणायला लागली तर उडून जाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 07:34 IST

आपल्याला न जमलेली कामे सांगून फडफडू नये! अन्यथा माणसं फणफणायला लागली तर उडून जाल!

महाराष्ट्रातील नेत्यांनी फालतू बडबड बंद करावी. ज्यांना सत्ता मिळाली आहे त्यांनी जोरदार कामाला लागावे. विरोधकांनी त्यांनानवीन कामे सांगावीत, ती करायला भाग पाडावीत; पण आपल्याला न जमलेली कामे सांगून फडफडू नये! अन्यथा माणसं फणफणायला लागली तर उडून जाल! ‘पक्षी फडफडायला लागला, की समजायचं नेम अचूक बसलाय!’ असे टाळीबाज वक्तव्य सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या जनतेची करमणूक करणारे सध्या कमी पडताहेत वाटते. पु. ल. गेले, व.पु. गेले, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची ओघवती वाणीही दृष्टिआड गेली. आता कोण करमणूक करणार? भाऊ कदम कमी पडतो, असे वाटते. चॅनेल्सवर रंगणाऱ्या चर्चेतील दमही हरविला आहे. (त्यांना बोलून बोलून दमा झाला आहे, असे दिसते.) अशा भयानक वातावरणात मराठी माणसाला करमणुकीच्या दुष्काळाला सामोरे जायला लागू नये; असा सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी चंग बांधलेला दिसतो. महाविकास आघाडीचे बाळ जन्माला येऊन अजून पहिला वाढदिवस व्हायच्या आतच कर्जमाफीसाठी भाजपने सर्व जिल्ह्यांत आणि तालुक्याच्या ठिकाणी आठदहा कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलन केले. पाच वर्षे राज्यात आणि केंद्रातही सत्तेवर असताना ही कामे निपटता आली नाहीत.

अचानक शेतकऱ्यांचा पुळका आला आहे. सत्तेवर असताना शेती अन् शेतकºयांविषयी जाहीर कळवळ्याची भाषा आणि खासगीत माजलेली भाषा वापरणाºयांची ती भाषा आता सत्ता जाताच संपुष्टात आली. अशा भाषेमुळे महाराष्टÑाची वाटचाल विकासाकडे नव्हे तर भकासाकडे चालू आहे. निम्म्याहून अधिक जिल्ह्यांचे दरडोई उत्पन्न राष्टÑीय दरडोई उत्पन्नाच्या खाली आहे. मराठी कामगारांनी झगडून मुंबई मिळविली म्हणून मुंबई- ठाणे-पुणे-नाशिक पट्टा विकसित झाला. त्याच्या जोरावर तुमच्या तिजोरीत चार पैसे खुळखुळत आहेत. कोल्हापूर सांगलीसारख्या जिल्ह्यांनी स्वकर्तृत्वावर थोडीफार प्रगती साधली; अन्यथा काय वाढून ठेवले आहे? मराठवाड्याची वाटचाल वाळवंटाकडे आणि विदर्भ-खान्देशाची वैराणभूमीकडे सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी अत्यंत संयमाने राज्यकारभार हाकण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यांना दिशा द्या ना! निवडणुका जाहीर होताच, एकमेकांचे कपडे उतरवा! ते जमत नसेल तर पाहूया, महाआघाडीला संधी देऊया! भारतीय जनतेने नरेंद्र मोदी यांना एकदा संधी दिली. ‘कॉँग्रेसला साठ वर्षे दिली, मला साठ महिने द्या, देशाचा चेहरा-मोहरा बदलतो,’ असे सांगणारे नरेंद्र मोदी काठावर पास झाले; तरी मतदारांना वाटले की, आणखीन साठ महिने संधी देणे आवश्यक आहे.देशातील सर्वसामान्य मतदारांमध्ये हा समज आहे. तुम्ही तर राजकारणाचे गारदी आहात. आशिष शेलार काय बोलतात त्याबाबत रोहित पवार काय टिष्ट्वट करतात, त्यावर धनंजय मुंडे कोणता बार उडवितात आणि बिचारा तो पक्षी तडफडायला लागतो. त्याचा काय दोष आहे? तुमच्या या वाचाळ राजकीय धुळवडीने महाराष्टÑाचे थोडेबहुत मनोरंजन होत असेल, पण मराठवाड्याचे वाळवंटीकरण थांबणार नाही. सर्व पक्षांनी एकत्र येऊन महाराष्टÑाला भेडसावणाºया दहाच मुख्य प्रश्नांवर एकमत करावे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेवर येताच शिवसेनेची जहाल तलवार म्यान करून एक नवा महाराष्टÑ घडवायचा ठरविले आहे. त्यांना संधी दिल्याशिवाय संघात पुढे खेळू द्यायचे की नाही, हे ठरविण्यासाठी पाच दिवसांची कसोटी तरी संपायला हवी ना? केवळ एका चेंडूवर सामना संपत नाही. यासाठी ही फालतू बडबडनेत्यांनी बंद करावी. सत्ता मिळाली आहे त्यांनी कामाला लागावे.
विरोधकांनी त्यांना नवीन कामे सांगावीत, ती करायला भाग पाडावीत, आपल्याला न जमलेली कामे सांगून फडफडू नये! अन्यथा माणसे फणफणायला लागली तर उडून जाल! सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील पाणी अडवून पश्चिमेकडे वळविले जाते. ते बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेऊन पूर्वेला नद्यांना वाहू द्या ! सौरऊर्जेच्या माध्यमातून मराठवाड्याला पाणी देता येणे शक्य आहे. कृष्णा आणि गोदावरी नदीखोºयांतील उपनद्यांच्या जोडण्याचा प्रयोग यशस्वी करता येईल. असे काही महत्त्वाचे निर्णय घेण्याऐवजी कलगीतुरा रंगविण्याचा छंद कशाला जोपासता? जनतेची कामे करा. सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, अमरावती, जळगाव या शहरांच्या विकासासाठी विशेष योजना आखावी लागेल. मुंबई-पुण्यावरील ताण याशिवाय कमी होणार नाही. केवळ मेट्रो किंवा वरळी सीफेसच्या रस्त्याने प्रश्न सुटेल, असे वाटत असेल तर ती तुमची घोडचूक आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस