शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

...अन्यथा माणसे फणफणायला लागली तर उडून जाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 07:34 IST

आपल्याला न जमलेली कामे सांगून फडफडू नये! अन्यथा माणसं फणफणायला लागली तर उडून जाल!

महाराष्ट्रातील नेत्यांनी फालतू बडबड बंद करावी. ज्यांना सत्ता मिळाली आहे त्यांनी जोरदार कामाला लागावे. विरोधकांनी त्यांनानवीन कामे सांगावीत, ती करायला भाग पाडावीत; पण आपल्याला न जमलेली कामे सांगून फडफडू नये! अन्यथा माणसं फणफणायला लागली तर उडून जाल! ‘पक्षी फडफडायला लागला, की समजायचं नेम अचूक बसलाय!’ असे टाळीबाज वक्तव्य सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या जनतेची करमणूक करणारे सध्या कमी पडताहेत वाटते. पु. ल. गेले, व.पु. गेले, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची ओघवती वाणीही दृष्टिआड गेली. आता कोण करमणूक करणार? भाऊ कदम कमी पडतो, असे वाटते. चॅनेल्सवर रंगणाऱ्या चर्चेतील दमही हरविला आहे. (त्यांना बोलून बोलून दमा झाला आहे, असे दिसते.) अशा भयानक वातावरणात मराठी माणसाला करमणुकीच्या दुष्काळाला सामोरे जायला लागू नये; असा सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी चंग बांधलेला दिसतो. महाविकास आघाडीचे बाळ जन्माला येऊन अजून पहिला वाढदिवस व्हायच्या आतच कर्जमाफीसाठी भाजपने सर्व जिल्ह्यांत आणि तालुक्याच्या ठिकाणी आठदहा कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलन केले. पाच वर्षे राज्यात आणि केंद्रातही सत्तेवर असताना ही कामे निपटता आली नाहीत.

अचानक शेतकऱ्यांचा पुळका आला आहे. सत्तेवर असताना शेती अन् शेतकºयांविषयी जाहीर कळवळ्याची भाषा आणि खासगीत माजलेली भाषा वापरणाºयांची ती भाषा आता सत्ता जाताच संपुष्टात आली. अशा भाषेमुळे महाराष्टÑाची वाटचाल विकासाकडे नव्हे तर भकासाकडे चालू आहे. निम्म्याहून अधिक जिल्ह्यांचे दरडोई उत्पन्न राष्टÑीय दरडोई उत्पन्नाच्या खाली आहे. मराठी कामगारांनी झगडून मुंबई मिळविली म्हणून मुंबई- ठाणे-पुणे-नाशिक पट्टा विकसित झाला. त्याच्या जोरावर तुमच्या तिजोरीत चार पैसे खुळखुळत आहेत. कोल्हापूर सांगलीसारख्या जिल्ह्यांनी स्वकर्तृत्वावर थोडीफार प्रगती साधली; अन्यथा काय वाढून ठेवले आहे? मराठवाड्याची वाटचाल वाळवंटाकडे आणि विदर्भ-खान्देशाची वैराणभूमीकडे सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी अत्यंत संयमाने राज्यकारभार हाकण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यांना दिशा द्या ना! निवडणुका जाहीर होताच, एकमेकांचे कपडे उतरवा! ते जमत नसेल तर पाहूया, महाआघाडीला संधी देऊया! भारतीय जनतेने नरेंद्र मोदी यांना एकदा संधी दिली. ‘कॉँग्रेसला साठ वर्षे दिली, मला साठ महिने द्या, देशाचा चेहरा-मोहरा बदलतो,’ असे सांगणारे नरेंद्र मोदी काठावर पास झाले; तरी मतदारांना वाटले की, आणखीन साठ महिने संधी देणे आवश्यक आहे.देशातील सर्वसामान्य मतदारांमध्ये हा समज आहे. तुम्ही तर राजकारणाचे गारदी आहात. आशिष शेलार काय बोलतात त्याबाबत रोहित पवार काय टिष्ट्वट करतात, त्यावर धनंजय मुंडे कोणता बार उडवितात आणि बिचारा तो पक्षी तडफडायला लागतो. त्याचा काय दोष आहे? तुमच्या या वाचाळ राजकीय धुळवडीने महाराष्टÑाचे थोडेबहुत मनोरंजन होत असेल, पण मराठवाड्याचे वाळवंटीकरण थांबणार नाही. सर्व पक्षांनी एकत्र येऊन महाराष्टÑाला भेडसावणाºया दहाच मुख्य प्रश्नांवर एकमत करावे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेवर येताच शिवसेनेची जहाल तलवार म्यान करून एक नवा महाराष्टÑ घडवायचा ठरविले आहे. त्यांना संधी दिल्याशिवाय संघात पुढे खेळू द्यायचे की नाही, हे ठरविण्यासाठी पाच दिवसांची कसोटी तरी संपायला हवी ना? केवळ एका चेंडूवर सामना संपत नाही. यासाठी ही फालतू बडबडनेत्यांनी बंद करावी. सत्ता मिळाली आहे त्यांनी कामाला लागावे.
विरोधकांनी त्यांना नवीन कामे सांगावीत, ती करायला भाग पाडावीत, आपल्याला न जमलेली कामे सांगून फडफडू नये! अन्यथा माणसे फणफणायला लागली तर उडून जाल! सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील पाणी अडवून पश्चिमेकडे वळविले जाते. ते बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेऊन पूर्वेला नद्यांना वाहू द्या ! सौरऊर्जेच्या माध्यमातून मराठवाड्याला पाणी देता येणे शक्य आहे. कृष्णा आणि गोदावरी नदीखोºयांतील उपनद्यांच्या जोडण्याचा प्रयोग यशस्वी करता येईल. असे काही महत्त्वाचे निर्णय घेण्याऐवजी कलगीतुरा रंगविण्याचा छंद कशाला जोपासता? जनतेची कामे करा. सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, अमरावती, जळगाव या शहरांच्या विकासासाठी विशेष योजना आखावी लागेल. मुंबई-पुण्यावरील ताण याशिवाय कमी होणार नाही. केवळ मेट्रो किंवा वरळी सीफेसच्या रस्त्याने प्रश्न सुटेल, असे वाटत असेल तर ती तुमची घोडचूक आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस