शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

...अन्यथा माणसे फणफणायला लागली तर उडून जाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 07:34 IST

आपल्याला न जमलेली कामे सांगून फडफडू नये! अन्यथा माणसं फणफणायला लागली तर उडून जाल!

महाराष्ट्रातील नेत्यांनी फालतू बडबड बंद करावी. ज्यांना सत्ता मिळाली आहे त्यांनी जोरदार कामाला लागावे. विरोधकांनी त्यांनानवीन कामे सांगावीत, ती करायला भाग पाडावीत; पण आपल्याला न जमलेली कामे सांगून फडफडू नये! अन्यथा माणसं फणफणायला लागली तर उडून जाल! ‘पक्षी फडफडायला लागला, की समजायचं नेम अचूक बसलाय!’ असे टाळीबाज वक्तव्य सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या जनतेची करमणूक करणारे सध्या कमी पडताहेत वाटते. पु. ल. गेले, व.पु. गेले, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची ओघवती वाणीही दृष्टिआड गेली. आता कोण करमणूक करणार? भाऊ कदम कमी पडतो, असे वाटते. चॅनेल्सवर रंगणाऱ्या चर्चेतील दमही हरविला आहे. (त्यांना बोलून बोलून दमा झाला आहे, असे दिसते.) अशा भयानक वातावरणात मराठी माणसाला करमणुकीच्या दुष्काळाला सामोरे जायला लागू नये; असा सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी चंग बांधलेला दिसतो. महाविकास आघाडीचे बाळ जन्माला येऊन अजून पहिला वाढदिवस व्हायच्या आतच कर्जमाफीसाठी भाजपने सर्व जिल्ह्यांत आणि तालुक्याच्या ठिकाणी आठदहा कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलन केले. पाच वर्षे राज्यात आणि केंद्रातही सत्तेवर असताना ही कामे निपटता आली नाहीत.

अचानक शेतकऱ्यांचा पुळका आला आहे. सत्तेवर असताना शेती अन् शेतकºयांविषयी जाहीर कळवळ्याची भाषा आणि खासगीत माजलेली भाषा वापरणाºयांची ती भाषा आता सत्ता जाताच संपुष्टात आली. अशा भाषेमुळे महाराष्टÑाची वाटचाल विकासाकडे नव्हे तर भकासाकडे चालू आहे. निम्म्याहून अधिक जिल्ह्यांचे दरडोई उत्पन्न राष्टÑीय दरडोई उत्पन्नाच्या खाली आहे. मराठी कामगारांनी झगडून मुंबई मिळविली म्हणून मुंबई- ठाणे-पुणे-नाशिक पट्टा विकसित झाला. त्याच्या जोरावर तुमच्या तिजोरीत चार पैसे खुळखुळत आहेत. कोल्हापूर सांगलीसारख्या जिल्ह्यांनी स्वकर्तृत्वावर थोडीफार प्रगती साधली; अन्यथा काय वाढून ठेवले आहे? मराठवाड्याची वाटचाल वाळवंटाकडे आणि विदर्भ-खान्देशाची वैराणभूमीकडे सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी अत्यंत संयमाने राज्यकारभार हाकण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यांना दिशा द्या ना! निवडणुका जाहीर होताच, एकमेकांचे कपडे उतरवा! ते जमत नसेल तर पाहूया, महाआघाडीला संधी देऊया! भारतीय जनतेने नरेंद्र मोदी यांना एकदा संधी दिली. ‘कॉँग्रेसला साठ वर्षे दिली, मला साठ महिने द्या, देशाचा चेहरा-मोहरा बदलतो,’ असे सांगणारे नरेंद्र मोदी काठावर पास झाले; तरी मतदारांना वाटले की, आणखीन साठ महिने संधी देणे आवश्यक आहे.देशातील सर्वसामान्य मतदारांमध्ये हा समज आहे. तुम्ही तर राजकारणाचे गारदी आहात. आशिष शेलार काय बोलतात त्याबाबत रोहित पवार काय टिष्ट्वट करतात, त्यावर धनंजय मुंडे कोणता बार उडवितात आणि बिचारा तो पक्षी तडफडायला लागतो. त्याचा काय दोष आहे? तुमच्या या वाचाळ राजकीय धुळवडीने महाराष्टÑाचे थोडेबहुत मनोरंजन होत असेल, पण मराठवाड्याचे वाळवंटीकरण थांबणार नाही. सर्व पक्षांनी एकत्र येऊन महाराष्टÑाला भेडसावणाºया दहाच मुख्य प्रश्नांवर एकमत करावे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेवर येताच शिवसेनेची जहाल तलवार म्यान करून एक नवा महाराष्टÑ घडवायचा ठरविले आहे. त्यांना संधी दिल्याशिवाय संघात पुढे खेळू द्यायचे की नाही, हे ठरविण्यासाठी पाच दिवसांची कसोटी तरी संपायला हवी ना? केवळ एका चेंडूवर सामना संपत नाही. यासाठी ही फालतू बडबडनेत्यांनी बंद करावी. सत्ता मिळाली आहे त्यांनी कामाला लागावे.
विरोधकांनी त्यांना नवीन कामे सांगावीत, ती करायला भाग पाडावीत, आपल्याला न जमलेली कामे सांगून फडफडू नये! अन्यथा माणसे फणफणायला लागली तर उडून जाल! सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील पाणी अडवून पश्चिमेकडे वळविले जाते. ते बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेऊन पूर्वेला नद्यांना वाहू द्या ! सौरऊर्जेच्या माध्यमातून मराठवाड्याला पाणी देता येणे शक्य आहे. कृष्णा आणि गोदावरी नदीखोºयांतील उपनद्यांच्या जोडण्याचा प्रयोग यशस्वी करता येईल. असे काही महत्त्वाचे निर्णय घेण्याऐवजी कलगीतुरा रंगविण्याचा छंद कशाला जोपासता? जनतेची कामे करा. सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, अमरावती, जळगाव या शहरांच्या विकासासाठी विशेष योजना आखावी लागेल. मुंबई-पुण्यावरील ताण याशिवाय कमी होणार नाही. केवळ मेट्रो किंवा वरळी सीफेसच्या रस्त्याने प्रश्न सुटेल, असे वाटत असेल तर ती तुमची घोडचूक आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस