शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे विनाश अटळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 13:22 IST

- अविनाश कुबल (ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक)  जवळपास २० वर्षांपासून जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे होत असलेले ऋतुबदल याचे छोटे-मोठे परिणाम ...

- अविनाश कुबल(ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक) 

जवळपास २० वर्षांपासून जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे होत असलेले ऋतुबदल याचे छोटे-मोठे परिणाम दिसून येत होते. परंतु, आता गेल्या पाच वर्षांमध्ये याची तीव्रता आणि याचे प्रमाण वाढत चालले आहे. महाराष्ट्राच्या विविध प्रदेशांचे निरीक्षण आणि अभ्यास केला असता सर्वत्र जागतिक तापमानवाढीच्या आणि ऋतुबदलाच्या खाणाखुणा दिसून येत आहेत.

समुद्रकिनाऱ्याला लागून असलेला कोकण, सह्याद्रीच्या पलीकडचा खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्र, त्याच्या पूर्वेला असलेला मराठवाडा आणि सुदूर पूर्वेचा विदर्भ अशा वैविध्यपूर्ण प्रदेशांवर झालेल्या परिणांमामुळे सर्वत्र हलकल्लोळ माजलेला आहे. अर्थातच त्याला जोड आहे ती मानवनिर्मित घटकांचीसुद्धा. 

कोकणात सह्याद्रीमध्ये प्रमाणाबाहेर गेलेले वणवे, सोबतच गेल्या काही वर्षांत सह्याद्रीमध्ये झालेली बेफाम वृक्षतोड, त्याकडे नियंत्रण ठेवणाऱ्या सरकारी यंत्रणांचे अक्षम्य दुर्लक्ष, नष्ट होत असलेली सह्याद्रीतील जैवविविधता, यामुळे बिघडलेले पर्यावरण आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे होणारे डोंगरांचे भूस्खलन आणि पुरांचे वाढलेले प्रमाण. याचा परिणाम म्हणजे शेती, मासेमारी आणि फळबागा या कोकणातील पारंपरिक व्यवसायांचे प्रचंड नुकसान. डोंगर पोखरून केलेले वाढते खाणकाम, जंगले नष्ट झाल्यामुळे अन्नाच्या शोधत जंगलातून बाहेर पडलेले माकडे, गवे, हत्ती यासारखे प्राणी मोठ्या प्रमाणात शेती आणि फळबागांची नासधूस करीत आहेत. 

मराठवाडा : पाण्याचा अतिउपसामराठवाड्याची परिस्थिती सर्वांत जास्त वाईट आहे. पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांचा अभाव, अतिउपशामुळे भूगर्भजलाची खालावलेली पातळी, हा फारच मोठा जटिल प्रश्न या प्रदेशाला भेडसावतो आहे. कोरडवाहू प्रकारच्या शेतीवर प्रामुख्याने अवलंबून असलेला हा प्रदेश सोबतच जमिनीच्या ऱ्हासामुळे झालेले अत्यंत घातक परिणाम भोगत आहे. 

प. महाराष्ट्र : शेती संकटातपश्चिम महाराष्ट्र हा पाण्यासाठी पूर्णपणे सह्याद्रीवर अवलंबून असलेला प्रदेश. पावसाच्या अनियमिततेमुळे आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीमुळे सोबतच भूगर्भजलाचा प्रमाणाबाहेर उपसा यासारख्या मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देणे कठीण झालेले आहे. पाण्याअभावी शेती तर संकटात आलीच आहे, परंतु सोबत भूगर्भातील पाण्याची पातळी प्रमाणाबाहेर खालावल्यामुळे त्याचा परिणाम नैसर्गिकरीत्या वाढणाऱ्या वनस्पती सृष्टीवर झाल्याचे दिसून येत आहे. स्थानिक वनस्पती नष्ट होऊन त्याऐवजी आक्रमकपणे फोफावणाऱ्या वनस्पती प्रजातींनी सुपीक जमिनीवर आक्रमण केले आहे. केवळ व्यावसायिक पिके घेण्यावर असलेला भर, त्यासाठी लागणारे भरमसाठ पाणी, रसायनांचा वापर, त्यामुळे नापिक झालेल्या शेतजमिनी, या सर्वांचा अत्यंत वाईट परिणाम शेतीआधारित उद्योगधंद्यांवर झाला आहे.

खान्देश : शहरांकडे स्थलांतरखान्देश प्रदेशाचा विचार केला असता अत्यंत अनियमित झालेल्या पावसामुळे कधी दुष्काळ, तर कधी पूरस्थिती त्यामुळे शेतीचे आणि इतर पारंपरिक व्यवसाय म्हणजे दूधदुभते वगैरेची झालेली प्रचंड हानी. त्यामुळे खान्देशातील लोकांची झालेली वाताहत रोखण्यासाठी कोणतेही ठोस असे प्रयत्न झालेले दिसून येत नाहीत. परिणामी खान्देशातील लोकांना शहरांकडे स्थलांतराचा पर्याय स्वीकारणे भाग पडत आहे.

विदर्भ : दुष्काळाची भीतीविदर्भ प्रदेशाची परिस्थितीसुद्धा बऱ्याचशा अंशी मराठवाड्यासारखीच झालेली आहे. पाण्याच्या अभावी जवळपास नष्ट झालेली शेती, फळबागा, पशुधन यामुळे जवळपास दुष्काळी स्थिती या प्रदेशात दिसून येते.

जमिनीचे तापमान वाढले आणि...जमिनीचे तापमान वाढल्याने जिवाणू नष्ट झाले आहेत. जमिनीची फळद्रूपता कमी अथवा नष्ट होत आहे. प्रशासनाने अशावेळी वनविभाग, शेती विभाग, जलसंधारण विभाग, अशा सर्वांना एकत्र करून जागतिक तापमानवाढ आणि ऋतुबदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आराखडा तयार करून आणि त्यासाठीची आर्थिक तरतूद करून काम सुरू करायला हवे. समुद्रकिनारपट्टी, डोंगराळ भाग, नद्या, तलाव, पाणथळ जागा, गवताळ प्रदेश आणि शुष्क पठारे अशी कोणत्या प्रकारची भूपृष्ठरचना यातून मुक्त नाही आणि त्यामुळेच आपली सर्व शहरे, खेडी, गावे ही सुद्धा भयानक परिस्थितीला सामोरी जाणार आहेत. हे सर्व थांबवायलाच हवे, अन्यथा मानवजातीचा विनाश अटळ आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ