शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

- या रावजी, बसा भाऊजी!

By सुधीर महाजन | Published: January 31, 2018 12:42 AM

वसंताची चाहूल लागली आणि राजकीय फड रंगण्यास प्रारंभ झाला. आता लक्ष धुळवडीकडे. सगळ्यांनाच २०१९ चे वेध लागले. त्यामुळे मराठवाड्याच्या फडावर गणगवळणीला सुरुवात झाली. चाळ बांधून सगळेच तयारीत होते. जुळवा-जुळव, फेरबदल, नाराजांची मोट, मनधरणी अशा एक ना अनेक वगांची तयारी सुरू आहे. त्यापूर्वी कडक लावणीचा फेर झाला पाहिजे म्हणून यात्रा, हल्लाबोल, तिरंगा यात्रा, संविधान बचाव, अशा बतावणीला सुरुवात झाली.

सगळ्यांनाच २०१९ चे वेध लागले. त्यामुळे मराठवाड्याच्या फडावर गणगवळणीला सुरुवात झाली. चाळ बांधून सगळेच तयारीत होते. जुळवा-जुळव, फेरबदल, नाराजांची मोट, मनधरणी अशा एक ना अनेक वगांची तयारी सुरू आहे. त्यापूर्वी कडक लावणीचा फेर झाला पाहिजे म्हणून यात्रा, हल्लाबोल, तिरंगा यात्रा, संविधान बचाव, अशा बतावणीला सुरुवात झाली. याचा अर्थच ढोलकीवर थाप पडताच गणगवळणीने रंग धरला म्हणजे लावणीचा कडका असेल आणि वगाचा उत्तररंग किती उत्सुकता वाढवणार, असे अपेक्षेचे मजले उंचावत आहेत. कुणाच्या इशाºयावर कोण शिटी मारतो, कोण टोपी उडवतो आणि दौलतजादा किती होते, याचीच अटकळ बांधण्यास सुरुवात झाली.शिवसेनेने औरंगाबाद, परभणी आणि नांदेडचे पालकमंत्री बदलले. सेनेसाठी औरंगाबादचा गड महत्त्वाचा आणि येथूनच मराठवाड्याची सूत्रे हलतात; पण औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांना नांदेडला पाठवले, तर नांदेडचे डॉ. दीपक सावंत यांना औरंगाबादला आणले. दिवाकर रावतेंना उस्मानाबादला पाठविले. नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला केवळ एक जागा मिळाली, शिवाय त्यांचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे उघड उघड भाजपचे काम करतात. एक जागा जिंकणे ही सेनेसाठी नामुश्की होती, तर औरंगाबादेत खा. चंद्रकांत खैरे आणि रामदास कदमांमधून विस्तवही जात नव्हता.प्रारंभी अडीच वर्षे त्यांनी खैरेंची जागोजागी कोंडी केली; पण वेळ येताच खैरेंनी सगळा हिशेब चुकता करीत कदमांना नांदेडला पाठविण्यास भाग पाडले. शिवाय त्यांची नेतेपदी निवड करून उद्धव ठाकरेंनी स्पष्ट संकेत दिला. परभणीत आमदार राहुल पाटील आणि खासदार बंडू जाधव यांच्यातील उघड बेबनावामुळे दिवाकर रावतेंना बदलले. येथे रावते या दोघांमध्ये समेट घडवू शकले नाहीत. राहुल नवघरे हे आदित्य ठाकरेंच्या वर्तुळातील ओळखले जातात आणि सेनेच्या आमदार आणि खासदारांमध्येच एवढी गटबाजी आहे की, विरोधी पक्षांना येथे काही कामच नाही.राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेने तुळजापुरातून सुरुवात केली. अपेक्षेप्रमाणे बीडमध्ये पक्षामधील विसंवाद उघड झाला. ‘हल्लाबोल’च्या नियोजन बैठकीत मुंबईला आणि तुळजापूरला उपस्थित असलेले आमदार जयदत्त क्षीरसागर बीडमध्ये गैरहजर होते. येथे या यात्रेचे सगळे नियोजन संदीप क्षीरसागर या पुतण्याकडे. अजित पवारांनी या धाकट्या पातीलाच समर्थन दिले असल्याने क्षीरसागर घराण्यातील काका-पुतण्याच्या राजकारणाने रंगत आणली. आपलेच घर फोडले म्हणून जयदत्त अण्णांची नाराजी आजची नाही आणि ती उघड आहे.आज मोदी सरकार आपला पाचवा आणि या कार्यकाळाचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. निवडणुका कधी, याचे उत्तर या अर्थसंकल्पातूनच मिळणार, असा अनेकांचा होरा आहे, म्हणून ढोलकीवर थाप पडली.मतदारांची मनधरणी करण्यासाठी तरी प्रारंभी सगळ्याच तंबूत ‘या रावजी, बसा भाऊजी’ ही लावणी पेश करणे सुरू झाले. पुढे सवाल-जवाब झडतील आणि धुळवड सुरू होईल. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaharashtraमहाराष्ट्र