शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

विरोधकांचा धाक वाटेनासा झाला!

By यदू जोशी | Updated: December 18, 2017 00:04 IST

नागपूरचे अधिवेशन म्हटले की पूर्वी मुख्यमंत्री अन् मंत्रीही टेन्शनमध्ये असायचे. विरोधक सरकारला मेटाकुटीला आणायचे. कोंडी करायचे आणि ती फोडण्यासाठी मग सत्तापक्षाला विरोधकांसमोर नमावे लागायचे.

नागपूरचे अधिवेशन म्हटले की पूर्वी मुख्यमंत्री अन् मंत्रीही टेन्शनमध्ये असायचे. विरोधक सरकारला मेटाकुटीला आणायचे. कोंडी करायचे आणि ती फोडण्यासाठी मग सत्तापक्षाला विरोधकांसमोर नमावे लागायचे. हा धसका यावेळी बेपत्ता दिसत आहे. नागपूरच्या गुलाबी थंडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गरम कपडे न घालता निर्धास्त फिरत आहेत. संभाजी पाटील निलंगेकर, गिरीश महाजन, राजकुमार बडोले, बबनराव लोणीकर, विनोद तावडे या मंत्र्यांविरुद्ध भरपूर दारूगोळा आहे, पण विरोधकांचे गारठलेले हात तो उचलायला तयार नाहीत. प्रकाश मेहतांना विरोधकांकडून अभय मिळालेले दिसते. इतके ‘कूल’ अधिवेशन पाहिले नव्हते. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला जवळ करीत राष्ट्रवादीवर डोळे वटारले आहेत. हल्लाबोलच्या इराद्याने आलेले विरोधक डल्लामारच्या धमकीने की काय पण दोन दिवसांच्या गोंधळानंतर अन् पदरी काहीही न पडता शांत झाले आहेत.सरसकट कर्जमाफी, बोंडअळी आणि तुडतुडा रोगामुळे कापूस, धानाच्या झालेल्या नुकसान भरपाईबाबत सरकारकडून ठोस घोषणा करवून घेण्यात विरोधक कमी पडले आहेत. विरोधकांनी मोर्चाद्वारे जे कमावले ते त्यांना सभागृहात टिकवता आले नाही. उद्या गुजरातच्या निकालानंतर अधिवेशनाच्या उर्वरित दिवसांच्या कामकाजाचा मूड ठरणार आहे. पण स्कॉलरशिप, आयटीतील घोटाळे, राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती, समृद्धी महामार्ग या मुद्यांवर सरकारला घेरण्याची संधी विरोधकांना आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या जोडगोळीने विदर्भात कामांचा धडाका लावला आहे. बुलडाणा, अकोला या मागास जिल्ह्यांना स्वप्न वाटावे इतका प्रचंड निधी सिंचन, रस्त्यांसाठी मिळाला आहे. ही सुरुवात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाज वाटणारे, मुख्यमंत्र्यांची पेशवा म्हणून खिल्ली उडविण्यातच पुरोगामित्व मानणाºयांनी स्वत:ला वेळीच दुरुस्त करून विकासावर बोललेले बरे!लाड यांचा निरोप काय होता?चालू अधिवेशनात सुरुवातीचे दोन-तीन दिवस विरोधकांनी विधान परिषदेत चांगलेच ताणून धरले. बोंडअळीच्या नुकसानीला मदत दिल्याशिवाय कामकाज चालू दिले जाणार नाही, असे वाटत होते. पण चर्चा अशी आहे की, भाजपाचे नवे आमदार प्रसाद लाड यांनी एक निरोप राष्ट्रवादीच्या गोटात दिला अन् हल्लाबोलची धार बोथट झाली. लाडांचा निरोप सिंचनाबाबत होता का, तो त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून आणला होता का, याचा तपशील काही मिळू शकला नाही. धनंजय मुंडेजी! सरकारविरुद्ध आपली कितीही कडवट, कठोर भूमिका असली तरी काही वेळा मुरड घालावी लागते. आघाडीची सत्ता असताना भाजपाचे काही नेते कधी कधी सबुरीने घ्यायचेच ना!जाता जाता : गोष्ट तशी जुनी आहे, पण नवीन संदर्भात चर्चिली जात आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाच्या एका नेत्याने पुण्यातील काही बड्या लोकांकडून पक्षासाठी पैसा घेतला होता, पण नंतर तो उमेदवारांना मिळालाच नाही. उमेदवारांवर माधवा, माधवा म्हणण्याची पाळी आली. सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाºया राज्यातील दीडएकशे शिक्षण संस्था पूर्ण अनुदानावर आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी संस्थांकडून काही कलेक्शन करण्याचा ‘माधव’ पॅटर्न राबविला जात असल्याचीही चर्चा आहे.- यदु जोशी

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस