शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

दृष्टिकोन - पर्यावरणासाठी काम करणाऱ्या पक्षालाच ‘मत’ दान करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 06:37 IST

डॉ. राजेंद्र सिंह   राजकीय पक्ष सत्ता काबीज करण्यासाठी मग्न आहेत. कोणत्याच राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यात पाणी, पर्यावरण किंवा जागतिक ...

डॉ. राजेंद्र सिंह  राजकीय पक्ष सत्ता काबीज करण्यासाठी मग्न आहेत. कोणत्याच राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यात पाणी, पर्यावरण किंवा जागतिक तापमान वाढीला गांभीर्याने घेण्यात आलेले नाही. राजकीय पक्ष मतांचा जोगवा मागण्यात गुंतले आहेत तर दुसरीकडे मत दान करणारेही संभ्रमावस्थेत आहेत. आजघडीला राज्यकर्ते समाजव्यवस्थेला संभ्रमित करू पाहत आहेत; आणि समाजव्यवस्थाही राज्यकर्त्यांना संभ्रमित करू पाहते आहे. महत्त्वाचे म्हणजे दोघेही एकमेकांचा घात करीत आहेत.

शेतकऱ्यांची कर्जातून मुक्ती करण्याऐवजी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे हा निवडणुकीचा मुद्दा बनू पाहत आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पर्यावरणाची हानी करणारे मत विकत घेणार आहेत. पाणी आणि हवा प्रदूषित करणारे मत विकत घेणाºयांचे काम करत आहेत. जागतिक तापमानवाढीमुळे अवकाळी पावसाचा वेग वाढेल; आणि माती वाहत राहील. असेच होत राहिले तर पृथ्वीवरील दुष्काळ आणि महापुरांचे संकट वाढतच राहील. आणि महापूर, दुष्काळ व दिलासा देण्याच्या नावाखाली देशातला खजिना रिता होत राहील.जागतिक तापमान वाढीच्या नावाखाली नवनवीन योजना येतच राहतील आणि राज्यकर्त्यांचे खिसे भरतच जातील. राज्यकर्ते ‘नमामी गंगा’सारख्या भ्रष्टाचारी योजना आखतच राहतील. राजकीय पक्षांचे जाहीरनामे मतदारांना आकर्षित करत मतदान खेचण्याचे जाळे फेकतच जातील. जो राजकीय पक्ष अगदी सफाईने जेवढे खोटे बोलेल तेवढ्या वेगाने तो राजकीय पक्ष आपल्या मतांची कमाई करेल. आज भारतात ‘सत्यमेव जयते’चे रूपांतरण ‘झूठ मे जयते’मध्ये केले जात आहे. राजकीय पक्षच अशा प्रकारच्या कामात यशस्वी होतात; ही वस्तुस्थिती आहे.

कोणत्याच राजकीय पक्षाला भविष्यातील पर्यावरणाची चिंता नाही. संस्कृतीचे रक्षण करण्याच्या नावाखाली संघटनांनी तर मर्यादाच ओलांडली आहे. गंगेच्या संवर्धनासाठी ज्यांनी ज्यांनी आवाज उठविला; त्यांचा आवाज दाबण्यात आला आहे. त्यांचा आक्रोश ऐकला जात नाही. विरोधी पक्षही गंगेच्या शुद्धीकरणावर काहीच बोलत नाही. जे पर्यावरणाच्या नावाखाली निसर्ग जपण्याचा आव आणत आहेत; तेदेखील निवडणुकांत काही बोलण्यास तयार नाहीत. भ्रष्टाचार आणि कर्जमाफी या दोन मुद्द्यांवर आवाज उठविला म्हणजे आपले काम झाले, असा भ्रम त्यांनी करून घेतला आहे. चुकून चुकायचे आणि क्षमा मागायची; हे नेहमीचे झाले आहे. पण कर्ज काढून दिवाळी साजरी करणे हे आपल्याकडे शुभ मानत नाहीत हेच हे लोक विसरले आहेत. शेतकºयावर कर्जाचा डोंगर येणार नाही; अशी व्यवस्थाच आपल्याकडे नाही.दिल्लीसारखी राजकीय राजधानी आता प्रदूषणाने दूषित झाली आहे. मुंबईसारख्या आर्थिक राजधानी असलेल्या शहरातील मिठी, दहिसर, पोयसरसारख्या नद्यांचे नाले झाले आहेत. विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या काशीने गंगेबाबत काहीच केले नाही. गंगेला आई म्हणतात खरे, पण त्यांनी तिचे रूपांतरण प्रदूषणात केले आहे. राज्यकर्त्यांनी गंगेला पैसा कमाविण्याचे साधन मानले आहे. पटना, पुणे, मुंबई आणि चेन्नईसारखी शहरे पुराच्या पाण्याखाली जात आहेत. राजकीय पक्षांनी असत्याचा आधार घेत आपले साध्य साध्य करण्याकडे लक्ष दिले आहे.

प्रत्येक दिवशी नव्या राजकीय पक्षाचा जन्म होत आहे. नव्या राज्यकर्त्याचा जन्म होत आहे. नवी मैदाने आणि नवे योद्धे तर आपण प्रत्येक दिवशी जन्माला घालत आहोत. मात्र जुन्या राजकीय पक्षांच्या कामावरून कोणीच धडा घेत नाही. कारण राजकारण म्हणजे आपल्या बापाची जहागिरी असल्याचे राजकीय पक्षांनी जणूकाही जाहीरच करून टाकले आहे. असत्याची कास धरून, हुजरेगिरी करून खालच्या पदावरचा नेता महान पदावर विराजमान होत आहे. आणि असत्याचा विजय होत आहे. हे सगळे सुरू असतानाच जेव्हा असत्याचा पडदा उघडा पडतो तोवर एखाद्या राजकीय पक्षाचा, राजकीय नेत्याचा कार्यकाळ संपलेला असतो.

परिणामी, पर्यावरणाची हानी दिवसागणिक वाढतच असून, आपण मात्र अशाच काहीशा बेजबाबदार लोकांवर देश चालविण्याची जबाबदारी सोपविली आहे. मात्र आता हे चित्र बदलले पाहिजे. ज्यांचे जीवन साधे आहे. जे पर्यावरणासाठी आयुष्य वेचत आहेत. अशा लोकांना, अशा पक्षांना आपण संधी दिली पाहिजे. ज्यांना खुर्चीचा मोह आहे. लालसा आहे. अशांना आपण सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे. प्रदूषणाचा स्तर दिवसागणिक वाढत असून, सर्वच शहरांचा कोंडमारा होत आहे. आता राजकीय पक्षांची गरज नाही. जो कोणी पर्यावरणासाठी काम करीत आहे; त्यास मत दान करण्याची गरज आहे.

( लेखक सिंह यांना जलपुरुष संबोधले जाते )

टॅग्स :environmentवातावरणVotingमतदानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक