शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Researchers: भारतात दहा लाख लोकांमागे केवळ १५६ संशोधक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 05:38 IST

Researchers: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बहू विद्याशाखीय, आंतर विभागीय आणि विभागांतर्गत संशोधनाची अपेक्षा बाळगण्यात आली आहे. संशोधन संस्कृती वाढून उत्पादनशीलता वाढावी हा हेतू त्यामागे आहे. हे असेच असायला हवे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बहू विद्याशाखीय, आंतर विभागीय आणि विभागांतर्गत संशोधनाची अपेक्षा बाळगण्यात आली आहे. संशोधन संस्कृती वाढून उत्पादनशीलता वाढावी हा हेतू त्यामागे आहे. हे असेच असायला हवे. युनेस्कोच्या संख्याशास्त्रविषयक संस्थेच्या आकडेवारीनुसार भारतात १० लाख लोकांच्या मागे १५६ संशोधक आहेत. सध्या आपण संशोधन आणि विकासावर सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ०.८ टक्के खर्च करतो. हे प्रमाण जास्त असलेल्या देशांशी याची तुलना करता येईल. इस्रायल ४.९५ टक्के खर्च करतो. दक्षिण कोरिया ४.८१, जपान ३.५९, जर्मनी ३.८१, अमेरिका २.८३, फ्रान्स २.२, चीन २.१४, ब्रिटन १.७४, कॅनडा १.५४ अशी ही टक्केवारी आहे. नवनवी  गृहितके आणि संशोधनातून विज्ञानाची जोपासना केली पाहिजे. संशोधनातून अभिनवता येते. त्यातून नव्या कल्पना, स्टार्ट अप्स पुढे येतात. संशोधन ते उत्पादन अशा पुरवठासाखळीतून अर्थव्यवस्था पुढे नेली जाते आणि सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढतेस्टार्टअप्सच्या प्रारंभिक अवस्थेकडे लक्ष देईल अशी उगवण संस्कृती आपल्या विद्यापीठात  निर्माण केली गेली पाहिजे. त्यांच्याकडे औद्योगिक प्रारुप भले नसेल परंतु कल्पना विकसित करून त्याचे रुपांतर उत्पादनात करण्यासाठी आवश्यक अशी व्यवस्था करण्यात मदत होईल. या प्रक्रियेला पैसे लागतील हे सांगायला नको. परंतु आगेकूच करणाऱ्या या देशाच्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी ‘मेक इन इंडिया’ सफल संपूर्ण तर होईल.प्राध्यापकांना संशोधनाला उद्युक्त करील असे वातावरणच  अनेक व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये नाही. उच्च श्रेणीचे संशोधन किंवा ज्ञान नसेल तर नावाजलेल्या नियतकालिकात संशोधनपर निबंध प्रकाशित होणार नाहीत आणि त्याचे संदर्भ पुढे दिले जाणार नाहीत. असा निबंध लिहावयाचा तर प्राध्यापकांना आपले ज्ञान सतत अद्ययावत ठेवावे लागेल. त्यासाठी वाचन, प्रयोग आणि अभिनवता आणावी लागेल. उद्योगांना सल्ला देणारी व्यवस्था निर्माण करावी लागेल. असे झाल्यास प्राध्यापक कालबाह्य गोष्टी शिकवणारच  नाहीत. त्यासाठी बराच पैसा लागेल. सुविधा निर्माण कराव्या लागतील. अनुकूल वातावरण तयार करावे लागेल, जेणेकरून शिक्षक प्रयोगशाळेत अधिक वेळ खर्च करतील. अनावश्यक निर्बंध लावले तर सुमार दर्जाचे निबंध आणि ते छापणारी नियतकालिकेही सुमार असे चित्र निर्माण होईल.संशोधन आणि विकासाच्या बाबतीत जगातल्या सर्वोच्च २५०० कंपन्यांत  चीनच्या ३०१ कंपन्या आहेत, तर भारताच्या फक्त २६. यावरून भारतात संशोधनाची अवस्था काय आहे, हे लक्षात येते.- एस. एस. मंठा, माजी अध्यक्ष, तंत्रशिक्षण परिषद

टॅग्स :scienceविज्ञानIndiaभारत