शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

Researchers: भारतात दहा लाख लोकांमागे केवळ १५६ संशोधक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 05:38 IST

Researchers: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बहू विद्याशाखीय, आंतर विभागीय आणि विभागांतर्गत संशोधनाची अपेक्षा बाळगण्यात आली आहे. संशोधन संस्कृती वाढून उत्पादनशीलता वाढावी हा हेतू त्यामागे आहे. हे असेच असायला हवे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बहू विद्याशाखीय, आंतर विभागीय आणि विभागांतर्गत संशोधनाची अपेक्षा बाळगण्यात आली आहे. संशोधन संस्कृती वाढून उत्पादनशीलता वाढावी हा हेतू त्यामागे आहे. हे असेच असायला हवे. युनेस्कोच्या संख्याशास्त्रविषयक संस्थेच्या आकडेवारीनुसार भारतात १० लाख लोकांच्या मागे १५६ संशोधक आहेत. सध्या आपण संशोधन आणि विकासावर सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ०.८ टक्के खर्च करतो. हे प्रमाण जास्त असलेल्या देशांशी याची तुलना करता येईल. इस्रायल ४.९५ टक्के खर्च करतो. दक्षिण कोरिया ४.८१, जपान ३.५९, जर्मनी ३.८१, अमेरिका २.८३, फ्रान्स २.२, चीन २.१४, ब्रिटन १.७४, कॅनडा १.५४ अशी ही टक्केवारी आहे. नवनवी  गृहितके आणि संशोधनातून विज्ञानाची जोपासना केली पाहिजे. संशोधनातून अभिनवता येते. त्यातून नव्या कल्पना, स्टार्ट अप्स पुढे येतात. संशोधन ते उत्पादन अशा पुरवठासाखळीतून अर्थव्यवस्था पुढे नेली जाते आणि सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढतेस्टार्टअप्सच्या प्रारंभिक अवस्थेकडे लक्ष देईल अशी उगवण संस्कृती आपल्या विद्यापीठात  निर्माण केली गेली पाहिजे. त्यांच्याकडे औद्योगिक प्रारुप भले नसेल परंतु कल्पना विकसित करून त्याचे रुपांतर उत्पादनात करण्यासाठी आवश्यक अशी व्यवस्था करण्यात मदत होईल. या प्रक्रियेला पैसे लागतील हे सांगायला नको. परंतु आगेकूच करणाऱ्या या देशाच्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी ‘मेक इन इंडिया’ सफल संपूर्ण तर होईल.प्राध्यापकांना संशोधनाला उद्युक्त करील असे वातावरणच  अनेक व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये नाही. उच्च श्रेणीचे संशोधन किंवा ज्ञान नसेल तर नावाजलेल्या नियतकालिकात संशोधनपर निबंध प्रकाशित होणार नाहीत आणि त्याचे संदर्भ पुढे दिले जाणार नाहीत. असा निबंध लिहावयाचा तर प्राध्यापकांना आपले ज्ञान सतत अद्ययावत ठेवावे लागेल. त्यासाठी वाचन, प्रयोग आणि अभिनवता आणावी लागेल. उद्योगांना सल्ला देणारी व्यवस्था निर्माण करावी लागेल. असे झाल्यास प्राध्यापक कालबाह्य गोष्टी शिकवणारच  नाहीत. त्यासाठी बराच पैसा लागेल. सुविधा निर्माण कराव्या लागतील. अनुकूल वातावरण तयार करावे लागेल, जेणेकरून शिक्षक प्रयोगशाळेत अधिक वेळ खर्च करतील. अनावश्यक निर्बंध लावले तर सुमार दर्जाचे निबंध आणि ते छापणारी नियतकालिकेही सुमार असे चित्र निर्माण होईल.संशोधन आणि विकासाच्या बाबतीत जगातल्या सर्वोच्च २५०० कंपन्यांत  चीनच्या ३०१ कंपन्या आहेत, तर भारताच्या फक्त २६. यावरून भारतात संशोधनाची अवस्था काय आहे, हे लक्षात येते.- एस. एस. मंठा, माजी अध्यक्ष, तंत्रशिक्षण परिषद

टॅग्स :scienceविज्ञानIndiaभारत