शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

निवडणूक हाच एक मार्ग

By admin | Updated: September 11, 2014 02:00 IST

गेले सहा महिने निलंबित राहिल्यानंतरही दिल्लीची विधानसभा घटनात्मक मार्गावर येण्याची चिन्हे नाहीत

गेले सहा महिने निलंबित राहिल्यानंतरही दिल्लीची विधानसभा घटनात्मक मार्गावर येण्याची चिन्हे नाहीत. विधानसभेत भाजपा व अकाली दल यांच्या युतीचे २९, केजरीवालांच्या आप पार्टीचे २८, तर काँग्रेसचे ८ आमदार आहेत. सभागृहात बहुमत मिळवायला त्यातील ३४ आमदारांची गरज आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या पुढाऱ्यांनी प्रयत्नांची शिकस्त चालविली आहे. या प्रयत्नांत आमदारांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार अर्थातच सामील आहे. भाजपाच्या दिल्ली शाखेचे उपाध्यक्ष शेरसिंग डागर यांनी आप पार्टीच्या एका आमदाराला पक्षांतरासाठी चार कोटी रुपयांची लाच देण्याची तयारी दाखविली. त्याची चित्रफीतच अरविंद केजरीवालांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याकडे सुपूर्द केली. ते पाहून भाजपाला एवढा हादरा बसला, की त्या पक्षाने शेरसिंग डागर यांच्याशी पक्षाचा कोणताही संबंध उरला नसल्याचेच जाहीर करून टाकले. बहुमत तयार होत नाही आणि सरकार बनविण्याची शक्यता नाही, हे दिसत असतानाही आता चार-सहा दिवसांत शपथविधी करण्याची जी घाई भाजपाने केली, त्यामुळे आमदारांच्या घोडेबाजारात तो पक्ष रस घेत असल्याचेच सिद्ध झाले. आता सारे व्यवहार चव्हाट्यावर आल्यानंतर भाजपाचे सरकार बनण्याची शक्यताही जवळजवळ संपली आहे. आप पार्टी सरकार बनवू शकत नाही आणि काँग्रेस बहुमतापासून दूर आहे, या स्थितीत विधानसभेचे निलंबन किती काळ चालू ठेवायचे हा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यात लक्ष घालून जो काय निकाल करायचा तो आॅक्टोबरपूर्वी करा, असेच केंद्राला आता बजावले आहे. त्यामुळे आमदार विकत मिळत नसतील तर विधानसभा बरखास्त करणे व नव्या निवडणुका घेणे एवढाच एक मार्ग नायब राज्यपालांसमोर उरतो व तोच योग्य आहे. अन्य कोणत्याही मार्गाने दिल्लीचे सरकार बनविले तर ते भ्रष्टाचारावर आधारलेले व संशयास्पद असेल यात काही शंका नाही. दिल्ली हे एका शहरापुरते मर्यादित छोटे राज्य आहे. तेथील राजकारणाचा फार मोठा परिणाम देशावर होण्याची शक्यता कमी आहे. मात्र दिल्ली ही देशाची राजधानी आहे आणि तीत घडणाऱ्या लहानसहान गोष्टींची चर्चाही मोठी असते, हा आपला अनुभव आहे. मुळात तेथे प्रथम सत्तेवर आलेल्या अल्पमतातील अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने लोकांच्या अपेक्षा नको तेवढ्या वाढवल्या. काँग्रेसच्या मदतीने त्यांना आपले सरकार काही काळ सत्तेवर राखणे जमणार होते. मात्र, केजरीवालांना आणि त्यांच्या आप पक्षाला तेव्हा चढलेला नीतीचा दंभ एवढा मोठा होता, की भाजपा वाईट आणि काँग्रेस त्याहून वाईट असा घोषाच तेव्हा त्यांनी चालविला. त्या काळात त्याने जनता दरबार भरविले, जनतेसमोर विधानसभा भरविण्याची नाटके केली, मंत्र्यांना लोकांपुढे उत्तरांसाठी उभे केले आणि त्या साऱ्या धावपळीत आपली प्रचंड फटफजिती करून घेतली. परिणामी, केजरीवाल हे गंभीर नेते नसून त्यांना बाललीलांमध्येच अधिक रस आहे, असे जनतेच्या मनाने घेतले. दिल्लीतली रामलीलाही एका दिवसावर थांबते. ती फार काळ चालली की ती पाहायला जाणे लोकांनाही नकोसे होते. केजरीवालांच्या सरकारी लीलाही मग कंटाळवाण्या झाल्या. परिणामी फार मोठ्या अपेक्षांसह सत्तेवर आलेला त्यांचा पक्ष स्वत:हून पायउतार झाला. त्याच्या जाण्याचे कोणाला फारसे दु:खही झाल्याचे दिसले नाही. ज्या सोशल मीडियाने त्याला नको तेवढे उचलून धरले व त्याचा प्रत्येक शब्द प्रमाण मानून तो लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले, तो मीडियाही अखेर त्या सरकारला कंटाळला. नंतरच्या काळात केजरीवाल आणि त्यांचा आप पक्ष यातच हाणामाऱ्या व गटबाजी सुरू होऊन त्यातले अनेक जण पक्षाबाहेर पडले. दिल्लीत मोदींचे सरकार आल्यानंतर केजरीवालांचे उरलेसुरले आकर्षणही संपुष्टात आले. मात्र, सरकार वा प्रशासन ही कोणा केजरीवालासाठी वा शेरसिंग डागरासाठी ठप्प करून ठेवण्याची संघटना नाही. जनतेसाठी ती अखंडपणे चालवावी लागते. आताच्या स्थितीत भाजपा, आप वा काँग्रेस यातला एकही पक्ष स्वबळावर सत्ता मिळवू शकत नाही आणि तसा त्याने प्रयत्न केला तरी तो फार काळ यशस्वी होणार नाही. म्हणून दिल्लीची विधानसभा बरखास्त करणे व तिच्या नव्या निवडणुका घेणे, एवढाच एक मार्ग नायब राज्यपालांसमोर उरतो. केंद्र सरकारच्या मदतीने या मार्गाचा अवलंब करणे हेच आता त्यांचे कर्तव्य आहे. त्यातून त्यांची, केंद्राची, संघराज्याची व घटनेची प्रतिष्ठा कायम राहणार आहे. ही प्रतिष्ठा टिकविणे हे साऱ्या संबंधितांचे कामही आहे.