शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

एकीकडे जलयुक्त, दुसरीकडे वाळूमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:11 IST

मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त महाराष्ट्र  हे महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेतले आहे. मात्र, महसूल विभागाचे बहुधा ‘वाळूमुक्त नद्या’ हे अभियान सुरू असावे.

मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त महाराष्ट्र  हे महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेतले आहे. मात्र, महसूल विभागाचे बहुधा ‘वाळूमुक्त नद्या’ हे अभियान सुरू असावे. वाळू तस्करीबाबत महसूल प्रशासन ठरवून कुंभकर्णी झोपेत आहे. वाळूत मोठा ‘व्यवहार’ दडला आहे.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे मध्यस्थीसाठी खूपच पक्के आहेत. सेना-भाजपातील भांडणे असोत वा पक्षांतर्गत. प्रत्येकवेळी तोडगा काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. आपल्या शांत व हसतमुख चेह-याने ते सर्वांचे गा-हाणे ऐकतात. एकदा त्यांनी राज्यातील नद्यांशी शांतपणे बोलून त्यांचे दुखणे गंभीरपणे समजावून घेण्याची गरज आहे. नद्यांशी बोलता आले नाही, तर निदान आपली यंत्रणाच नद्यांची कशी वासलात लावत आहे, हे जरी त्यांनी समजावून घेतले तरी राज्यावर व पर्यावरणावर भले थोरले उपकार होतील.अवैध वाळूउपसा होऊ नये, यासाठी शासनाने २०१३ साली वाळू/रेती निर्गती धोरण जाहीर केले आहे. या धोरणात शासन एक बाब स्पष्ट करते, की वाळूतून महसूल मिळविणे हा आमचा उद्देश नव्हे. विकासकामांसाठी वाळू मिळावी, हा शासनाचा उद्देश आहे. वाळूच्या साठ्यांमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये, हेही वाळूचे लिलाव देण्यामागील एक प्रमुख कारण सांगण्यात आले आहे. शासनाचे हे निर्गती धोरण इतके आदर्शवत आहे, की वाळूच्या कणालाही हात लावण्याची कुणाची हिंमत होऊ नये. पण, प्रत्यक्षात काय?या धोरणाच्या आधारे अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने यावर्षी वाळूसाठ्यांच्या लिलावाची प्रक्रिया राबवली. वाळूसाठे देताना ठेकेदारांना अटीशर्ती टाकल्या गेल्या. त्यात एक महत्त्वाची अट आहे, की प्रत्येक ठेकेदाराने वाळूउपसा करताना ठेक्याच्या ठिकाणी हॅलोजन लाईट व सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. वाळू कोठे उपसली जाते, किती उपसली याते, ती कोणत्या वाहनात भरली जाते, या वाहनाचा क्रमांक, वाहनाला दिली जाणारी पावती या सर्व बाबी या कॅमेºयात कैद व्हायला हव्यात, असा यामागील उद्देश. या कॅमेºयात जे चित्रीकरण होईल, ते दर आठवड्याला संबंधित ठेकेदाराने जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाला सादर करावे, असे अटी व शर्तीत स्पष्टपणे नमूद आहे. हे फुटेज नागरिकांना बघायला मिळेल, असेही जिल्हाधिकाºयांचा आदेश सांगतो. उत्सुकता म्हणून ‘लोकमत’ने हे सीसीटीव्ही फुटेज नगरच्या जिल्हाधिकाºयांकडे मागितले. तर खनिकर्म विभागाने उत्तर धाडले, हे फुटेज तुम्हाला संबंधित तहसील कार्यालयाकडे उपलब्ध होईल. आमच्याकडे मनुष्यबळ नसल्याने हे फुटेज आमच्याकडे येत नाही. त्यावर तहसीलदारांकडे विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडेही ते नाही. काही तहसीलदारांनी तर ‘फुटेज टपालात शोधावे लागेल’ असे खास महसुली उत्तर दिले. कितीही वाळू रगडली तरी हे सीसीटीव्ही फुटेज मिळेल, असे वाटत नाही. आडातच नाही, तर पोहºयात येणार कोठून? प्रशासनच कसे कुंभकर्णी झोपेत आहे, याचा हा उत्तम नमुना आहे.ग्रामसभांची परवानगी ही वाळूचा ठेका देण्याची पहिली पायरी आहे. ग्रामसभेच्या परवानगीशिवाय वाळूउपसा करता येणार नाही, असे आपले धोरण सांगते. खरोखरच ग्रामसभा होतात का? हे तपासण्यासाठी या ग्रामसभांचे व्हिडीओ चित्रीकरण केले जावे, असेही कायदा सांगतो. किती ग्रामसभांचे असे चित्रीकरण उपलब्ध आहे, याची शहानिशा झाली, तर आणखी काही वेगळे चित्र समोर येईल.तात्पर्य काय, तर वाळूप्रश्नी महसूल प्रशासनच नियम पाळायला तयार नाही. वाळूउपशाचे फुटेज गेले कोठे? हा जाब महसूलमंत्र्यांनी आपल्या प्रशासनाला विचारायला हवा. लोकप्रतिनिधींनीही ही तपासणी करावी. नगर जिल्ह्यातून गोदावरी, प्रवरा, मुळा, भीमा अशा प्रमुख नद्या वाहतात. या नद्यांचे वाळवंट होताना जिल्हा पाहतो आहे. अवैध व वैध या दोन्ही मार्गाने नद्यांचे व परिसराचे शोषण सुरु आहे. अनेक नदीकाठच्या गावांनाही पाणी राहिलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त महाराष्ट्र  हे महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेतले. दुसरीकडे महसूलची अशी ‘वाळुमुक्ती’ सुरूआहे.- सुधीर लंके