शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

ग्यानबाची मेख!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:21 IST

लढाऊ विमानांच्या उत्पादनात जगभर नाव असलेल्या बोईंग व लॉकहीड मार्टिन या कंपन्यांनी आॅगस्ट अखेरीस भारतात आपले कारखाने उभारण्याची तयारी दर्शविली.

लढाऊ विमानांच्या उत्पादनात जगभर नाव असलेल्या बोईंग व लॉकहीड मार्टिन या कंपन्यांनी आॅगस्ट अखेरीस भारतात आपले कारखाने उभारण्याची तयारी दर्शविली. बोईंगने एफ/ए १८ सुपर हॉर्नेट विमानांचा, तर लॉकहीड मार्टिनने एफ-१६ विमानांचा कारखाना उभारण्यात रस असल्याचे जाहीर केले. त्यानंतर गुरुवारी ट्रम्प प्रशासनानेही या दोन्ही विमानांची भारताला विक्री करण्याचे जोरदार समर्थन केले. भारताला मोठ्या प्रमाणात लढाऊ विमानांची गरज आहे; मात्र जी कंपनी भारतात उत्पादन करेल, त्याच कंपनीची विमाने घेण्याची भारत सरकारची भूमिका आहे. जागतिक महासत्ता होण्याची मनिषा बाळगणाºया, चंद्र आणि मंगळावर पहिल्याच प्रयत्नात यशस्वी मोहिमा साकारणाºया भारताला अजूनही लढाऊ विमान निर्मितीच्या क्षेत्रात म्हणावे तसे यश मिळालेले नाही. या पाशर््वभूमीवर, लढाऊ विमान निर्मितीचे तंत्रज्ञान आत्मसात करता यावे, खासगी भारतीय कंपन्यांना लढाऊ विमान निर्मितीचा अनुभव मिळावा आणि लढाऊ विमाने तुलनात्मकरित्या स्वस्तात मिळावी, या तिहेरी उद्देशाने सरकारने भारतात उत्पादन करण्याची अट घातली आहे. त्यानुसारच बोईंग व लॉकहीड मार्टिनने ही तयारी दर्शविली हे स्पष्ट आहे. प्रारंभीच म्हटल्यानुसार, दोन्ही कंपन्या लढाऊ विमान निर्मिती क्षेत्रातील दादा कंपन्या आहेत आणि एफ/ए १८ व एफ-१६ ही अत्यंत यशस्वी विमाने आहेत. त्यामुळे दोन्ही कंपन्यांचे प्रस्ताव प्रथमदर्शनी आकर्षक वाटतात; मात्र त्यामध्ये ग्यानबाची मेख ही आहे, की ही दोन्ही विमाने कालबाह्य होऊ लागली आहेत. त्यामुळे ती मोडित काढण्याची प्रक्रिया जगभर सुरू झाली आहे. दोन्ही विमानांच्या कोणत्याही नव्या ‘आॅर्डर' उत्पादकांकडे नाहीत. त्यामुळे एवीतेवी त्यांना अमेरिकेतील त्यांचे कारखाने मोडीत काढावेच लागणार आहेत. तेच कारखाने भारतात स्थलांतरित करण्याचा आणि शेवटची कमाई करून घेण्याचा त्यांचा मानस आहे. भारतीय वायूदल व नौदलाची मागणी पुरविण्यासोबतच आम्ही भारतातून इतर देशांना विमाने निर्यातही करू, असे आमिष उभय उत्पादकांनी दाखविले आहे; पण मागणीच नसेल, तर निर्यात करणार तरी कुणाला? जगभरातील वायूदल आणि नौदलांना आता रडारवर सुगावा न लागणाºया पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांचे वेध लागले आहेत. स्वत: भारतही त्यासाठी रशियाच्या सोबतीने व संपूर्ण स्वदेशी असे दोन प्रकल्प राबवित आहे. परिणामी भारतातून एफ/ए १८ व एफ-१६ विमानांची निर्यात हे गाजरच ठरू शकते. त्यामुळे भारतीय वायूदल व नौदलाची ‘आॅर्डर' पूर्ण झाल्यावर भारतातील कारखानेही मोडीतच निघतील. त्या स्थितीत विमानांच्या उर्वरित आयुष्यात सुट्या भागांची पूर्तता कुठून होणार? सुटे भाग मिळाले नाहीत, तर विमाने कार्यरत तरी कशी ठेवणार? थोडक्यात काय तर एफ/ए १८ व एफ-१६ या दोन्ही विमानांचे अध्याय संपुष्टात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या नादी न लागणेच श्रेयस्कर होईल!