शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

किन्नरांच्या राष्ट्रीय संमेलनाच्या निमित्ताने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:25 IST

किन्नरांचे अ.भा. मंगलामुखी किन्नर संमेलन १ फेब्रुवारीपासून अकोल्यात सुरू झाले आहे. या संमेलनामध्ये किन्नरांचे प्रश्न व समस्यांवरील चर्चेसोबतच, नव्या नात्यांचीही गुंफण होत आहे.

- राजेश शेगोकारकिन्नरांचे अ.भा. मंगलामुखी किन्नर संमेलन १ फेब्रुवारीपासून अकोल्यात सुरू झाले आहे. या संमेलनामध्ये किन्नरांचे प्रश्न व समस्यांवरील चर्चेसोबतच, नव्या नात्यांचीही गुंफण होत आहे. संमेलन सुरू असतानाच महाराष्ट्र सरकारने किन्नर कल्याण बोर्ड स्थापन करण्याची घोषणा केली. त्यामुळे किन्नर आनंदले आहेत.अकोल्यात देशभरातील किन्नरांचे राष्ट्रीय संमेलन १ फेब्रुवारीपासून सुरू झाले आहे. येत्या १० फेब्रुवारीपर्यंत चालणा-या या अ. भा. मंगलामुखी राष्ट्रीय संमेलनामध्ये देशभरातील ६००पेक्षा जास्त किन्नर सहभागी झाले आहेत. प्रत्येकाची भाषा वेगळी आहे, देहबोली वेगळी आहे; पण ‘आम्ही सारे किन्नर आहोत’ हा अभिमान व किन्नर पंरपरेशी निष्ठा, हे समान सूत्र त्या सगळ्यांना एकत्र जोडते. किन्नर हा शब्द उच्चारला तरी तोंडावर बोट व डोक्यात प्रश्नांचा भुंगा, अशी सर्वसामान्यांची स्थिती होते. महिला व पुरुष या दोन विश्वांसोबतच किन्नर हे सुद्धा एक स्वतंत्र विश्व आहे. आपण ही वस्तुस्थिती समजून घेणार आहोत का, हा प्रश्न या संमेलनाच्या निमित्ताने प्रकर्षाने उपस्थित आला आहे.एखादे शुभकार्य असो, वा घरात अपत्य जन्माला येवो, अशा अनेक शुभप्रसंगी किन्नरांचे आशीर्वाद घेण्यासाठी पुढे येणारा समाज एरव्ही मात्र किन्नरांपासून फटकून राहतो. रेल्वेस्थानकावर, गर्दीच्या ठिकाणी किंवा इतरत्र कुठेही किन्नर दिसले, त्यांच्यावर पडणारी नजर तिरस्काराची, हेटाळणीचीच असते. असे का? स्त्री, पुरुषांना समाजात जो मानसन्मान मिळतो तो आम्हाला का नाही? आम्हाला भावना नाहीत का? माणूस म्हणून आम्हाला काहीच दर्जा नाही का? किन्नरांद्वारा उपस्थित केल्या जाणारे हे प्रश्न कोणत्याही सुजाण मनुष्यास निरुत्तर होण्यास भाग पाडतात. भुतदयेला अनन्यसाधारण महत्त्व देणाºया आपल्या समाजामध्ये, किन्नर या मनुष्य जातीतीलच मोठ्या घटकाचा मात्र विचार केला जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे गत काही काळापासून किन्नर त्यांच्या हक्कांसाठी एकवटू लागले आहेत. अकोल्यात २०१४ मध्ये पहिल्यांदा किन्नरांचे राष्ट्रीय संमेलन झाले. त्यानंतर चार वर्षांनी होत असलेल्या संमेलनामध्ये, हक्कांसाठी लढा ही भावना तीव्र झाल्याचे प्रत्यंतर येत आहे. योगायोगाने याच आठवड्यात किन्नरांसाठी ‘किन्नर कल्याण मंडळ’ स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला. त्याचीही चर्चा संमेलनात होत आहे. अलीकडे किन्नरांची संघटित शक्ती वाढली आहे. अनेक युवा किन्नर चांगले शिकलेले आहेत. कमलाबुवा, हिराबाई या किन्नरांनी महापौर, उपमहापौर अशा पदापर्यंत मजल मारली. शबनम मावशी तर आमदारही झाली; मात्र ही बोटावर मोजता येण्याएवढी उदाहरणे वगळली, तर इतरांची स्थिती हलाखीचीच आहे. त्यांना स्त्रियांच्या विशेष योजनांचा लाभ तर मिळू शकत नाहीच; पण त्यांच्या लैंगिकतेच्या निकषांवर कोणत्याही सामान्य योजनांचाही लाभ त्यांना दिल्या जात नाही. शिक्षण, नोकरी, घर आणि आरोग्य योजनांचा लाभ मिळावा, ही त्यांची अपेक्षा आहे. किन्नर कल्याण मंडळांच्या निमित्ताने त्या अपेक्षेची पूर्तता होईल, अशी त्यांना आशा आहे. किन्नर कल्याण मंडळ स्थापन करणारे महाराष्टÑ हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत हे मंडळ स्थापन होणार असून, सामाजिक न्याय विभाग या मंडळाच्या योजनांची अंमलजबजावणी करणार आहे. पहिल्या टप्यात पाच कोटींचा निधी मंडळासाठी देण्यात आला आहे. किन्नरांची संख्या व प्रश्नांचे स्वरूप पाहता, तो अपुराच आहे; मात्र किन्नरांना स्वतंत्र ओळख देण्याचा व त्यांच्या कल्याणाचा विचार राज्य सरकारने सुरू केला आहे याचे समाधान आहेच! आता किन्नर कल्याण मंडळाच्या कामास चालना देऊन, नवा आदर्श राज्य शासनाने देशापुढे ठेवला पाहिजे.