शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

आता हिंदी गळ्यालाही घोळवावा लागेल 'ळ'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 2:54 AM

या पार्श्वभूमीवर भाषा अभ्यासक प्रकाश निर्मळ यांचे प्रयत्न फार मोलाचे आहेत. निर्मळ यांच्या पाठपुराव्यामुळं आता मराठीतल्या ‘ळ’चा समावेश हिंदी वर्णमालेत झाला आहे.

सुकृत करंदीकर

मराठी संस्कृतोद‌्भव आहे का यावरून वाद घालण्याची गरज खरं तर अठराव्या शतकातच राजारामशास्री भागवत यांनी मोडीत काढली. सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास असलेली मराठी पूर्ववैदिक भाषा असल्याचं एव्हाना भाषा तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.  भाषा प्रवाही असते. कालौघात संस्कृत, कन्नड, तेलुगूसारख्या अनेक भारतीय भाषांमधले शब्द मराठीत रुळले. बहामनी काळापासून म्हणजे चौदाव्या ते सतराव्या शतकापर्यंतची तीनशे वर्षं महाराष्ट्राच्या सत्ताधीशांची भाषा फारसी होती. या फारसीचं आक्रमण प्रचंडच आहे. इमारत, जागा, जिल्हा, तालुका, जमीन, हवा, गुलाब, गरीब, पैसा असे अक्षरशः शेकडो फारसी शब्द मराठीत ठाण मांडून बसले आहेत. आता या शब्दांचं मूळ मराठी नाही यावर कोण विश्वास ठेवेल? मराठीचं नशीब थोर म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आलं. शिवरायांनी मातृभाषेचं महत्त्व जाणलं आणि राज्याभिषेकानंतर रघुनाथपंत हणमंते या पंडितावर ‘राज्यव्यवहार कोश’ निर्माण करण्याची जबाबदारी सोपवली. त्यामुळं तीनशे वर्षांचं फारसीचं आक्रमण थोपवण्यात मराठीला काहीअंशी यश मिळालं. पुढं इंग्रजी सत्ता आली. या इंग्रजीनं मराठीला चांगलंच ग्रहण लावलं. आता मराठीचा आग्रह धरणं हा गुन्हा वाटावा, इतका इंग्रजीचा थाट आहे. रवींद्रनाथ टागोरांनी ‘आमार शोनार बांगला’ म्हटलं की हृदय उचंबळतात; पण ‘जय महाराष्ट्र’ म्हटलं की मग ‘प्रादेशिक’, ‘संकुचित’ म्हणून हिणवलं जातं. या तथाकथित बुद्धिवाद्यांची ही भोंगळ मांडणी दुर्लक्ष करावी अशीच ! समृद्धीच्या बाबतीत अनेक भाषांच्या तुलनेत मराठी अधिक रसाळ, मधाळ, रसरशीत, टवटवीत, खटकेबाज आणि सौष्ठवपूर्ण असल्याची खूणगाठ मनी बांधावी. दरिद्री असलेच तर मराठीचा आग्रह न धरणारे तुम्ही-आम्ही !!

या पार्श्वभूमीवर भाषा अभ्यासक प्रकाश निर्मळ यांचे प्रयत्न फार मोलाचे आहेत. निर्मळ यांच्या पाठपुराव्यामुळं आता मराठीतल्या ‘ळ’चा समावेश हिंदी वर्णमालेत झाला आहे. ‘ळ’ चा ‘ल’ असा चुकीचा वापर हिंदी पट्ट्यात कोणी केला तर केंद्र सरकारच्या हिंदी आणि राजभाषा विभागाकडे तक्रार करण्याची निर्मळ यांची मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. ‘‘ळ’’ हे व्यंजन द्रविड भाषांमध्ये आहे. मराठीतही आहे. खरं तर हिंदीवगळता चौदा भारतीय भाषांमध्ये आहेच. त्यामुळं मराठीतले काळे, टिळ‌क, गोपाळ, बाळासाहेब फक्त हिंदीत गेले की ‘काले’, ‘तिलक’, ‘गोपाल’, ‘बालासाहेब’ होतात. हे चुकीचे उच्चार आता थांबतील, अशी आशा करूया. 

हिंदीची लिपीदेखील मराठीप्रमाणेच देवनागरी. एकूण १२ स्वर, ३४ व्यंजनं अशा ४६ अक्षरांची ही देवनागरी लिपी. तरीही हिंदी वर्णमालेत एवढी वर्षं ‘ळ’ नव्हता. पण त्यातही मराठी थोडी वेगळीच. ‘चाळा’मधला ‘च’ वेगळा आणि ‘चहा’तला ‘च’ निराळा. ‘जागा’ आणि ‘जग’ यातला ‘ज’ वेगळा.  मराठी माणसांप्रमाणेच मराठी भाषाही तशी अवघडच. ‘मराठी भाषा ही मुमुर्षु आहे’, असा संताप ब्रिटिश राजवटीतच सन १९२६मध्ये इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी व्यक्त केला होता. ‘मुमुर्षु’ म्हणजे मरणासन्न, मरणाची इच्छा धरणारी. राजवाडे कर्ते विचारवंत होते, नुसतेच बोलके नव्हे. ‘मराठीखेरीज दुसऱ्या भाषांतून लिहिणार नाही’, असा पण त्यांनी केला आणि आयुष्यभर कटाक्षाने तो पाळलाही. त्यांना दुसरी भाषाच येत नव्हती, असं मात्र मुळीच नव्हतं. फ्रेंच, रशियन या भाषा मुळातून वाचण्याइतकं ज्ञान राजवाडेंना होतं. गेल्या शतकाच्या प्रारंभी झालेले रानडे, गोखले, टिळक, आगरकर, डॉ. आंबेडकर, सावरकर यासारख्या कितीतरी प्रज्ञावंतांचं  इंग्रजी, संस्कृत, फारसी अशा अनेक भाषांवर प्रभुत्त्व होतं. ते ब्रिटिशांच्या भुवया उंचावतील अशा फर्ड्या इंग्रजीत बोलत. पण मराठीतही ही मंडळी तितकीच बलदंड होती.

राजवाडे म्हणाले तसं मराठी मुमुर्षु नाही, हे गेल्या शंभर वर्षात दिसलं आहे. पण ती वर्धिष्णू व्हायची तर ‘ऑक्सफर्ड’प्रमाणं दरवर्षी त्यात नव्या शब्दांची भर घातली पाहिजे. कालसुसंगत शब्दांची निर्मिती केली पाहिजे. निर्मळ यांनी ‘ळ’ला हिंदीच्या दरबारात जागा मिळवून दिली. पण ळ, ण या व्यंजनांनी सुरू होणारा शब्दही मराठीत नाहीच. ळ आणि णने सुरू होणारे शब्द मायमराठीत प्रसवण्याचं, रुजवण्याचं आव्हान कोणी स्वीकारील का? ‘ळ’च्या निमित्तानं एवढा गळा तर काढलाच पाहिजे.

(लेखक लोकमत पुणे आवृत्तीचे सहसंपादक, आहेत)

टॅग्स :Mumbaiमुंबईmarathiमराठी