शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

आता ‘बालरक्षक’ येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:01 IST

आपल्या शिक्षण विभागात गेल्या काही वर्षांपासून नवनवीन अभिनव प्रयोग सुरु आहेत.

आपल्या शिक्षण विभागात गेल्या काही वर्षांपासून नवनवीन अभिनव प्रयोग सुरु आहेत. मध्यंतरी प्रयोगांच्या या ‘अभिनव’ शृंखलेत शाळाबाह्य मुलांच्या उपस्थितीसाठी शिक्षकांनी मुलांसमवेत सेल्फी काढून सरकारच्या सरल प्रणालीवर अपलोड करण्याचा फतवा शिक्षण विभागाने काढला होता. त्या फतव्याचा पुढे कसा फज्जा उडाला हे सर्वज्ञात आहे. आता शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्याकरिता बालरक्षक नावाची एक नवीन संकल्पना अस्तित्वात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नागपूर आणि अमरावती विभाग स्तरावर गेल्या आठवड्यातच बैठक झाली. त्यामध्ये या बालरक्षक चळवळीचे संपूर्ण नियोजन करण्यात आले. हे बालरक्षक शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांपर्यंत पोहोचतील, त्यांच्या मनात शिक्षणाविषयी गोडी निर्माण करतील, त्यांच्या अडचणी सोडवतील आणि त्यांना शाळेत घेऊन येतील अशी योजना आहे. कल्पना अर्थात उत्तमच. पण बालरक्षकांच्या भूमिकेत शिक्षकांसोबतच अधिकारी, केंद्रप्रमुख, शाळा व्यवस्थापन सदस्य आणि अगदी सामान्य नागरिकांचासुद्धा समावेश करण्याचे जे स्वप्न बघितले जात आहे आणि त्यातून यश पदरी पडेल अशी आशा बाळगली जात आहे, त्याबद्दल शंका आहे. कारण हे काम शिक्षकच किती मनापासून करताहेत हे आपण बघतोच आहे. अर्थात येणाऱ्या दिवसात त्याचे यशापयश कळेलच. पण मुळात शाळाबाह्य मुलांचा प्रश्न बालरक्षक, सेल्फी अथवा यासम उथळ प्रयोगांनी सुटणारा नाही. या गंभीर समस्येच्या मुळात जावे लागणार आहे. राज्यात पाच लाख मुले शाळाबाह्य असून, यात ग्रामीण भागातील प्रमाण अधिक आहे. ही मुले शाळेत का जात नाहीत, शिक्षण अर्धवट का सोडतात, या प्रश्नांची उत्तरे प्रथम शोधावी लागतील. बहुतांश शाळाबाह्य मुले गरीब, शेतकरी आणि मोलमजुरी करणाºयांची आहेत. आणि शिक्षणाने नोकरी मिळणार नसेल तर पोटापाण्यासाठी पारंपरिक काम करणेच बरे, अशी या कुटुंबांची मानसिकता आहे. दुसरीकडे शासनाने प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क देणारा कायदा तर तयार केला पण त्याच्या अंमलबजावणीकडे मात्र कुणाचे लक्ष नाही. आपल्या मुलांना शाळेत न पाठविता कामास जुंपणाºया पालकांवर कुणाचा अंकुश नाही. याशिवाय शिक्षणाचा अफाट खर्च हेसुद्धा या शाळाबाह्य मुलांच्या संख्यावाढीमागील महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे शिक्षणातून आपला विकास साधेल याची खात्री पटल्याशिवाय ही मुले शाळेत येणार नाहीत,हे वास्तव आम्ही समजले पाहिजे.

टॅग्स :educationशैक्षणिकVinod Tawdeविनोद तावडे