शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

आता ‘बालरक्षक’ येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:01 IST

आपल्या शिक्षण विभागात गेल्या काही वर्षांपासून नवनवीन अभिनव प्रयोग सुरु आहेत.

आपल्या शिक्षण विभागात गेल्या काही वर्षांपासून नवनवीन अभिनव प्रयोग सुरु आहेत. मध्यंतरी प्रयोगांच्या या ‘अभिनव’ शृंखलेत शाळाबाह्य मुलांच्या उपस्थितीसाठी शिक्षकांनी मुलांसमवेत सेल्फी काढून सरकारच्या सरल प्रणालीवर अपलोड करण्याचा फतवा शिक्षण विभागाने काढला होता. त्या फतव्याचा पुढे कसा फज्जा उडाला हे सर्वज्ञात आहे. आता शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्याकरिता बालरक्षक नावाची एक नवीन संकल्पना अस्तित्वात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नागपूर आणि अमरावती विभाग स्तरावर गेल्या आठवड्यातच बैठक झाली. त्यामध्ये या बालरक्षक चळवळीचे संपूर्ण नियोजन करण्यात आले. हे बालरक्षक शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांपर्यंत पोहोचतील, त्यांच्या मनात शिक्षणाविषयी गोडी निर्माण करतील, त्यांच्या अडचणी सोडवतील आणि त्यांना शाळेत घेऊन येतील अशी योजना आहे. कल्पना अर्थात उत्तमच. पण बालरक्षकांच्या भूमिकेत शिक्षकांसोबतच अधिकारी, केंद्रप्रमुख, शाळा व्यवस्थापन सदस्य आणि अगदी सामान्य नागरिकांचासुद्धा समावेश करण्याचे जे स्वप्न बघितले जात आहे आणि त्यातून यश पदरी पडेल अशी आशा बाळगली जात आहे, त्याबद्दल शंका आहे. कारण हे काम शिक्षकच किती मनापासून करताहेत हे आपण बघतोच आहे. अर्थात येणाऱ्या दिवसात त्याचे यशापयश कळेलच. पण मुळात शाळाबाह्य मुलांचा प्रश्न बालरक्षक, सेल्फी अथवा यासम उथळ प्रयोगांनी सुटणारा नाही. या गंभीर समस्येच्या मुळात जावे लागणार आहे. राज्यात पाच लाख मुले शाळाबाह्य असून, यात ग्रामीण भागातील प्रमाण अधिक आहे. ही मुले शाळेत का जात नाहीत, शिक्षण अर्धवट का सोडतात, या प्रश्नांची उत्तरे प्रथम शोधावी लागतील. बहुतांश शाळाबाह्य मुले गरीब, शेतकरी आणि मोलमजुरी करणाºयांची आहेत. आणि शिक्षणाने नोकरी मिळणार नसेल तर पोटापाण्यासाठी पारंपरिक काम करणेच बरे, अशी या कुटुंबांची मानसिकता आहे. दुसरीकडे शासनाने प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क देणारा कायदा तर तयार केला पण त्याच्या अंमलबजावणीकडे मात्र कुणाचे लक्ष नाही. आपल्या मुलांना शाळेत न पाठविता कामास जुंपणाºया पालकांवर कुणाचा अंकुश नाही. याशिवाय शिक्षणाचा अफाट खर्च हेसुद्धा या शाळाबाह्य मुलांच्या संख्यावाढीमागील महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे शिक्षणातून आपला विकास साधेल याची खात्री पटल्याशिवाय ही मुले शाळेत येणार नाहीत,हे वास्तव आम्ही समजले पाहिजे.

टॅग्स :educationशैक्षणिकVinod Tawdeविनोद तावडे