शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नोंद - नागरिकांच्या जीवाशी खेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 05:51 IST

वायू प्रदूषणाची समस्या गांभीर्याने न घेतल्यास तिचे परिणाम आमच्या भावी पिढ्यांना भोगावे लागतील.

उठसूठ नागरिकांच्या हिताची काळजी वाहण्याचा आव आणणारे लोक प्रत्यक्षात नागरिकांच्या जीवित्वाविषयी किती निष्काळजी आहेत, याचे प्रत्यंतर माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या एका उत्तरातून आले आहे.

ग्रीनपीस ही जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या पर्यावरणवादी गैरसरकारी संस्था! तिची भारतातील शाखा असलेल्या ग्रीनपीस इंडियाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (सीपीसीबी)माहितीच्या अधिकारात काही माहिती मागितली होती. उत्तरादाखल सीपीसीबीने जी माहिती पुरविली, त्यानुसार महाराष्ट्रातील १७ सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या कर्त्याधर्त्यांकडे वायू प्रदूषण कमी करण्यासाठीचा कृती आराखडाच नाही! या शहरांमध्ये राज्याच्या राजधानी व उपराजधानीसह पुणे, नाशिक, नवी मुंबई व औरंगाबाद ही मोठी शहरे आणि सोलापूर, कोल्हापूर, सांगली, जळगाव, अमरावती, अकोला, चंद्रपूर, जालना, लातूर, उल्हासनगर व बदलापूर या शहरांचा समावेश आहे.या १७ शहरांपैकी सात शहरांनी कृती आराखडे सादर केले होते; परंतु सीपीसीबीने ते फेटाळून लावले आणि सुधारित आराखडे सादर करण्यास बजावले. याचा अर्थ ज्या अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती त्यांनी थातूरमातूर आराखडे सादर केले. उर्वरित १० शहरांनी तर तेवढीही तसदी घेतली नाही.यावर्षी मे महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेचा एक अहवाल आला होता. महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशपाठोपाठ सर्वाधिक प्रदूषित राज्य बनण्याच्या मार्गावर असल्याचा इशारा त्या अहवालातून देण्यात आला होता. राज्यातील किमान सहा शहरांमधील प्रदूषणाची पातळी जागतिक निकषांच्या चार ते आठ पट जास्त असल्याचेही त्या अहवालात नमूद करण्यात आले होते. गत हिवाळ्यात तर राज्यातील प्रदूषणाने चक्क बीजिंगमधील प्रदूषणाशी बरोबरी साधली होती, असे ग्रीनपीसचे म्हणणे आहे. नोव्हेंबर २०१६ मधील हवा गुणवत्ता सूचीनुसार चंद्रपूर हे देशातील सर्वाधिक प्रदूषित ठरले होते.वायू प्रदूषणामुळे श्वसनमार्ग आणि घशाच्या आजारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. एका पाहणीनुसार २०१५ मध्ये या आजारांमुळे देशात तब्बल ११ लाख लोकांना अकाली मृत्यू आला होता. वायू प्रदूषणाचे आव्हान किती मोठे आहे, हे यावरून लक्षात यावे!

वायू प्रदूषण ही अशी समस्या आहे, जिच्याशी कुणीही वैयक्तिक पातळीवर लढू शकत नाही. नागरिकांना समूह म्हणून आपली भूमिका अदा करावी लागेल. परंतु सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका प्रमुख असेल. कचरा न जाळणे, वाहनांमध्ये प्रमाणित इंधनाचाच वापर करणे, त्यांची नीट देखभाल करणे या माध्यमातून नागरिक आपला वाटा उचलू शकतात. परंतु वायू प्रदूषण पसरविणाºया उद्योगांना अटकाव करणे, रस्त्यांवरील वाहनांची कोंडी टाळण्यासाठीच्या उपाययोजना ही जबाबदारी सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थांनाच उचलावी लागणार आहे. दुर्दैवाने त्या पातळीवर सगळाच अंधार दिसत आहे. जिथे समस्येचे गांभीर्यच लक्षात येत नाही, तिथे उपाययोजनांची अपेक्षा करणेच व्यर्थ आहे. ही हलगर्जी अंतत: आम्हाला आणि आमच्या भावी पिढ्यांनाच भोवणार आहे.- रवी टाले

टॅग्स :pollutionप्रदूषणair pollutionवायू प्रदूषण