शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

नोंद - नागरिकांच्या जीवाशी खेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 05:51 IST

वायू प्रदूषणाची समस्या गांभीर्याने न घेतल्यास तिचे परिणाम आमच्या भावी पिढ्यांना भोगावे लागतील.

उठसूठ नागरिकांच्या हिताची काळजी वाहण्याचा आव आणणारे लोक प्रत्यक्षात नागरिकांच्या जीवित्वाविषयी किती निष्काळजी आहेत, याचे प्रत्यंतर माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या एका उत्तरातून आले आहे.

ग्रीनपीस ही जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या पर्यावरणवादी गैरसरकारी संस्था! तिची भारतातील शाखा असलेल्या ग्रीनपीस इंडियाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (सीपीसीबी)माहितीच्या अधिकारात काही माहिती मागितली होती. उत्तरादाखल सीपीसीबीने जी माहिती पुरविली, त्यानुसार महाराष्ट्रातील १७ सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या कर्त्याधर्त्यांकडे वायू प्रदूषण कमी करण्यासाठीचा कृती आराखडाच नाही! या शहरांमध्ये राज्याच्या राजधानी व उपराजधानीसह पुणे, नाशिक, नवी मुंबई व औरंगाबाद ही मोठी शहरे आणि सोलापूर, कोल्हापूर, सांगली, जळगाव, अमरावती, अकोला, चंद्रपूर, जालना, लातूर, उल्हासनगर व बदलापूर या शहरांचा समावेश आहे.या १७ शहरांपैकी सात शहरांनी कृती आराखडे सादर केले होते; परंतु सीपीसीबीने ते फेटाळून लावले आणि सुधारित आराखडे सादर करण्यास बजावले. याचा अर्थ ज्या अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती त्यांनी थातूरमातूर आराखडे सादर केले. उर्वरित १० शहरांनी तर तेवढीही तसदी घेतली नाही.यावर्षी मे महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेचा एक अहवाल आला होता. महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशपाठोपाठ सर्वाधिक प्रदूषित राज्य बनण्याच्या मार्गावर असल्याचा इशारा त्या अहवालातून देण्यात आला होता. राज्यातील किमान सहा शहरांमधील प्रदूषणाची पातळी जागतिक निकषांच्या चार ते आठ पट जास्त असल्याचेही त्या अहवालात नमूद करण्यात आले होते. गत हिवाळ्यात तर राज्यातील प्रदूषणाने चक्क बीजिंगमधील प्रदूषणाशी बरोबरी साधली होती, असे ग्रीनपीसचे म्हणणे आहे. नोव्हेंबर २०१६ मधील हवा गुणवत्ता सूचीनुसार चंद्रपूर हे देशातील सर्वाधिक प्रदूषित ठरले होते.वायू प्रदूषणामुळे श्वसनमार्ग आणि घशाच्या आजारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. एका पाहणीनुसार २०१५ मध्ये या आजारांमुळे देशात तब्बल ११ लाख लोकांना अकाली मृत्यू आला होता. वायू प्रदूषणाचे आव्हान किती मोठे आहे, हे यावरून लक्षात यावे!

वायू प्रदूषण ही अशी समस्या आहे, जिच्याशी कुणीही वैयक्तिक पातळीवर लढू शकत नाही. नागरिकांना समूह म्हणून आपली भूमिका अदा करावी लागेल. परंतु सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका प्रमुख असेल. कचरा न जाळणे, वाहनांमध्ये प्रमाणित इंधनाचाच वापर करणे, त्यांची नीट देखभाल करणे या माध्यमातून नागरिक आपला वाटा उचलू शकतात. परंतु वायू प्रदूषण पसरविणाºया उद्योगांना अटकाव करणे, रस्त्यांवरील वाहनांची कोंडी टाळण्यासाठीच्या उपाययोजना ही जबाबदारी सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थांनाच उचलावी लागणार आहे. दुर्दैवाने त्या पातळीवर सगळाच अंधार दिसत आहे. जिथे समस्येचे गांभीर्यच लक्षात येत नाही, तिथे उपाययोजनांची अपेक्षा करणेच व्यर्थ आहे. ही हलगर्जी अंतत: आम्हाला आणि आमच्या भावी पिढ्यांनाच भोवणार आहे.- रवी टाले

टॅग्स :pollutionप्रदूषणair pollutionवायू प्रदूषण