शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

ती विटंबना नसते?

By admin | Published: December 29, 2016 3:37 AM

आम्ही तेवढे सहिष्णु, सहनशील, परभावनांची कदर करणारे आणि कलेची बूज राखणारे, पण बाकी सारे याच्या नेमके उलट, हा हिन्दू धर्मातील लोकांचा नेहमीचा आणि आवडता दावा

आम्ही तेवढे सहिष्णु, सहनशील, परभावनांची कदर करणारे आणि कलेची बूज राखणारे, पण बाकी सारे याच्या नेमके उलट, हा हिन्दू धर्मातील लोकांचा नेहमीचा आणि आवडता दावा असला तरी वास्तव त्याच्या किती विपरीत असते याची चर्चा नेहमीच होत असते. विशेषत: अलीकडच्या काळात तर असहिष्णुतेच्या चर्चेने संपूर्ण देशच ढवळून निघाला होता. मुंबईतील भारतीय तंत्रशास्त्र संस्थेच्या (आयआयटी) सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने जे भित्तीचित्र रंगविले गेले आणि त्यावरुन काही ‘सैनिकांनी’ जो गोंधळ घातला तो केवळ असहिष्णुतेचाच नव्हे तर बावळटपणातून निर्माण झालेल्या दंडेलीचाही द्योतक होता. संजीवनी बुटी शोधता आली नाही म्हणून हनुमानाने आख्खा द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला होता, अशी एक आख्यायिका रामायणात वर्णिली गेली आहे. याच आख्यायिकेमधील एका हाताने द्रोणागिरी तोलून धरलेल्या हनुमानाचे चित्र सदर भित्तीचित्रात चितारले गेले होते. फक्त तो हनुमान आधुनिक पेहरावात दाखविला गेला होता. म्हणजे हातात लेखणी, घड्याळ, विजार, चष्मा, टाय वगैरे वगैरे आणि शेपटीच्या जागी भगवा ध्वज. यात असेलच तर थोडी गंमत होती आणि तीदेखील चार भिंतींच्या आत. विटंबना तर अजिबातच नव्हती. पण कुणीतरी खोडसाळपणाने एका मावळ्याला याची खबर दिली व तो पाच-पंचवीस सैनिक घेऊन तिथे धावला. त्याने त्याला जी शिकवण मिळाली होती त्याप्रमाणे तिथे धिंगाणा घातला, ते भित्तीचित्र काढून टाकायला लावले आणि आयोजकांना लेखी माफीदेखील मागायला लावली. त्यांनीदेखील उगा कटकट नको म्हणून दोन्ही मागण्या मान्य करुन टाकल्या. एका अर्थाने तो विषय तिथेच संपला. पण जो बावळटपणा उरला त्याचे काय? पुराणांमध्ये वा धार्मिक पुस्तकांमध्ये देवादिकांचे जे वर्णन येते त्या वर्णनाप्रमाणेच मूर्ती किंवा चित्र रेखाटले जावे असा या नवसहिष्णुतावाद्यांचा आग्रह असेल तर ज्या गणेशोत्सवात याच मंडळींचा पुढाकार असतो, त्या गजाननाच्या पार्थिव मूर्ती तरी कुठे शास्त्रशुद्ध असतात. जी आदिदेवता तिला का कुठे थंडी वाजू शकते? पण तिला स्वेटर घातला जातो, पुढाऱ्याप्रमाणे टोपी चढविली जाते, डोळ्यावर चष्मा चढविला जातो, मोटार चालविताना दाखविले जाते आणि असंख्य गणेश मंडळे तर त्या अधिनायकाला संपूर्ण दहा दिवस तिष्ठत उभे करतात, तेव्हां होत नाही का विटंबना! सारा अचरटपणा, अन्य काय?