शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

पक्षांतर नव्हे, हे मूल्यांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:10 IST

आपला पक्ष सोडून दुसरा पक्ष धरणा-याला त्याच्या नव्या निष्ठा जरा जोरात सांगाव्या लागतात. झालेच तर आपल्या जुन्या पक्षाला आणि त्यातील सहका-यांना त्याला बोलही लावावा लागतो.

आपला पक्ष सोडून दुसरा पक्ष धरणा-याला त्याच्या नव्या निष्ठा जरा जोरात सांगाव्या लागतात. झालेच तर आपल्या जुन्या पक्षाला आणि त्यातील सहका-यांना त्याला बोलही लावावा लागतो. तसे केल्याखेरीज नवे सहकारी त्याच्यावर विश्वास ठेवीत नाहीत आणि जुन्या सहकाºयांच्याही त्याच्याविषयीच्या आशा संपत नाहीत. लालूप्रसाद यादव आणि काँग्रेस यांची साथ सोडून भाजप व मोदी यांच्या वळचणीला जाऊन उभे राहणा-या नितीशकुमारांनी नेमके हेच केले आहे. जुने मुख्यमंत्रिपद (महागठबंधनचे) सोडून नवे मुख्यमंत्रिपद (जदयू-भाजपचे) ग्रहण केल्यानंतर पाचव्या दिवशी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपली नवी मूल्ये व नव्या निष्ठा जोरात सांगून टाकल्या आहेत. मोदी हे २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा एकवार देशाचे पंतप्रधान होतील असे सांगताना आज देशात त्यांच्या तोडीचा दुसरा नेता नाही असेही ते म्हणाले आहेत. शिवाय लालूप्रसाद आणि राहुल गांधी यांच्यावर त्याच पत्रपरिषदेत त्यांनी दुगाण्याही झाडल्या आहेत. देश नितीशकुमारांकडे एक गंभीर प्रकृतीचे नेते म्हणून पाहत होता. त्यांच्या समाजवादी व सेक्युलर निष्ठांविषयी त्याला विश्वास होता आणि तशीच त्यांची धारणाही होती. आपल्याविषयीचे हे समज स्वत: नितीशकुमारांनीच निर्माण केले होते. मोदींनी देश ‘काँग्रेसमुक्त’ करण्याची गर्जना केली तेव्हा तिला उत्तर देताना देश ‘संघमुक्त’ करण्याची घोषणा नितीशकुमारांनी केली होती. त्यांचे आजवरचे राजकारणही धर्मांधता व जात्यंधता यांना विरोध करणारे राहिले होते. (त्यांचा विरोध फक्त एका जातीला होता. या देशात ब्राह्मण जातीच्या लोकांना कोणतीही सवलत वा जागा मिळू नये असे ते एकेकाळी जाहीरपणे सांगत. आता भाजपशी केलेल्या जवळिकीमुळे त्यांना त्यांची ही जुनी भूमिका गिळावी लागेल एवढेच. फक्त त्यांच्या अपेक्षेनुसार भाजप व संघ यांना ती विसरता आली पाहिजे.) लालूप्रसाद आणि त्यांचे कुटुंब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि त्यासाठी ते सारे न्यायालयाच्या खेपा टाकत आहेत. आर्थिक अन्वेक्षण विभागाच्या तपासालाही ते सामोरे जात आहेत. मात्र त्यांचा कथित भ्रष्टाचार सांगून नितीशकुमारांनी त्यांच्यापासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला असेल तर तो मात्र लबाडीचा आहे हे त्यांना सांगितले पाहिजे. त्यांनी लालूप्रसादांच्या राजद या पक्षाशी युती करून बिहार विधान परिषदेची निवडणूक लढविली तेव्हाही लालूप्रसाद या आरोपांच्या घेºयात होते. त्यांच्या कुटुंबातील माणसे या आरोपांना तेव्हाही उत्तरे देत होते. तो सारा प्रकार ठाऊक असताना नितीशकुमार यांनी त्यांच्याशी युती करून निवडणूक लढविली व जिंकली असेल तर आताचे त्यांचे शहाणपण वा नीतिमूल्यांची त्यांना झालेली आठवण या उशिरा सुचलेल्या गोष्टी आहेत, असे म्हटले पाहिजे. शिवाय २०१९ मध्ये मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील असे त्यांना आताच कळले असेल असेही नाही. काही माणसांना सत्तेची चाहूल आणि अधिकाराचा वास इतरांच्या तुलनेत अगोदर येतो. नितीशकुमार हे असे तीक्ष्ण नाकाचे राजकारणी आहेत. लालूप्रसादांचे आमदार त्यांच्या आमदारांहून जास्तीच्या संख्येने निवडून आले तरी मुख्यमंत्रिपदी आपणच राहू अशी भूमिका त्यांनी घेतली आणि लालूप्रसादांनीही ती मान्य केली. आता लालूप्रसादांहून मोदी जास्तीचे बलदंड व उद्याचे सत्ताधारी आहेत हे लक्षात येताच त्यांनी जुनी साथ सोडली व नवी साथ घेतली आहे. असलेच तर यात सत्तेचे राजकारण आहे, मूल्याची चाड नाही आणि भ्रष्टाचारावरचा रोषही नाही. कथित संशयिताची साथ घेऊन सत्ता बळकवायची आणि मग शहाजोगपणे आपण त्यातले वा तिकडचे नसून इकडचे आहोत असे म्हणण्यात केवळ लबाडी नाही, जनतेची फसवणूक आहे. नितीशकुमारांना बिहारच्या जनतेने जो जनाधार दिला तो त्यांचा एकट्याचा नव्हता. जदयू, राजद व काँग्रेस या तीन पक्षांच्या महागठबंधनाला तो मिळाला होता. एकवेळ त्या आघाडीत मुलायमसिंग यांचा समाजवादी पक्ष व मायावतींचा बहुजन समाज पक्ष सहभागी करून घेण्याचेही प्रयत्न झाले. ते निष्फळ ठरले तरी जनतेने उर्वरित महागठबंधनाला मते दिली. तो व्यापक जनाधार एका क्षणात विसरून नितीशकुमारांना संघ परिवाराचे भरते आले असेल आणि त्यासाठी ते त्यांची धर्मनिरपेक्षतेवरील निष्ठा वाºयावर सोडायला सिद्ध झाले असतील तर त्याची कारणे राजदच्या कथित भ्रष्टाचारात वा काँग्रेसच्या आजच्या दुबळ्या अवस्थेत शोधायची नसतात. ती नितीशकुमारांच्या सत्ताकांक्षेत पहायची असतात. जो माणूस वाजपेयी आणि मनमोहनसिंग या दोघांच्याही सरकारात राहतो, धर्मनिरपेक्षतेचे मूल्य सांगतो, लोहिया आणि जयप्रकाशांचे शिष्यत्व जाहीर करतो तो एकाएकी भाजप व संघासोबत जात असेल तर तो मुळातच कच्चा आणि निसरड्या निष्ठेचा माणूस आहे असे म्हटले पाहिजे. अशी माणसे त्यांच्या उत्तरकाळात जशी वागतात तसेच आता नितीशकुमार वागत आहेत. म्हणूनच त्यांचे बोलणे वा वागणे फारशा गंभीरपणे न घेता साशंक वृत्तीनेच आपण पाहिले पाहिजे. पक्षांतर ही देशाच्या राजकारणात आता फार जुनी व रुळलेली बाब झाली आहे. ती आताशा बातमीचाही विषय होत नाही. नितीशकुमारांचे पक्षांतर हे बातमीचा विषय झाले याचे कारण ते पक्षांतर नसून मूल्यांतर आहे, हे आहे.