शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
3
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
4
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
5
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
6
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
7
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
8
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
9
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
10
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
11
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
12
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
13
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
14
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
15
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
16
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
17
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
18
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
19
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
20
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?

मोकाट जनावरांसाठी नामी मात्रा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 00:14 IST

कोल्हापुरातील मोकाट जनावरांना आळा घालण्याची तयारी महापालिकेने केली आहे. यात महापालिका यशस्वी होईल?

- चंद्रकांत कित्तुरेकोल्हापुरातील मोकाट जनावरांना आळा घालण्याची तयारी महापालिकेने केली आहे. यात महापालिका यशस्वी होईल?रस्त्यावरील मोकाट जनावरे ही प्रत्येक शहरातील समस्या आहे. या जनावरांना आवर घालण्यासाठी प्रत्येक नगरपालिका, महानगरपालिका प्रयत्न करीत असते. मात्र, ती काही रस्त्यांवरून हलत नाहीत. एखादवेळी वाहतूक पोलीस रस्त्यावरून बाजूला जातील; पण ही जनावरे मात्र आपणच या रस्त्याचे रखवालदार या आविर्भावात ठाण मांडून राहिलेली दिसतील. या जनावरांमुळे अनेक छोटेमोठे अपघात होतात. वाहतुकीची कोंडीही होते. यामुळे या जनावरांना आळा घालावा अशी मागणी सर्वच ठिकाणी होत असते. कोल्हापुरातही ती झाली. यावर महानगरपालिकेने नामी मात्रा शोधून काढली आहे. ती म्हणजे रस्त्यावरील मोकाट जनावरांना पकडून ती जप्त करावयाची आणि प्रत्येक जनावरामागे त्याच्या मालकाकडून पाच हजार रुपये दंड वसूल करावयाचा.कुत्रा हा सर्वाधिक इमानी मानला जात असला तरी कोणतेही जनावर मालकाला कधी विसरत नसते. याचाच फायदा पशुपालक घेतात. ग्रामीण भागात जनावरे चरायला सोडण्यासाठी भरपूर जागा असते. सिमेंटच्या जंगलांनी व्यापलेल्या शहरांमध्ये मात्र ती नसते. शिवाय चाऱ्याची उपलब्धताही कमी असते. परिणामी शहरांतील हुशार (?) पशुपालक आपली जनावरे रस्त्यांवर सोडतात. ती शहरातील चौकाचौकांत कळपाने फिरत असलेली दिसतात. यात विशेषत: गाई आणि बैलांचे प्रमाण अधिक आहे.याशिवाय गाढवे, डुकरेही आढळतात. मुख्य रस्त्यावर ठाण मांडणाºया या जनावरांमुळे अपघात होऊन आजवर अनेकजण जखमी झाले आहेत. हॉर्न वाजवूनही ती लवकर बाजूला जात नाहीत. काही वेळा वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक संथ होते. कोल्हापुरात अशी सुमारे तीन हजारांवर जनावरे असल्याचा अंदाज आहे. मात्र, महापालिकेकडे याची कोणतीही आकडेवारी नाही. या जनावरांना पकडून त्यांना ठेवायचे कुठे याचेही ठोस उत्तर नाही. गावाबाहेर सोडणे, गोशाळेत देणे, लगेच दंड आकारून मालकाच्या ताब्यात देणे अशा प्रकारे याची अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले जाते. प्रसंगी फौजदारीही करण्यात येणार आहे. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींमुळे कोल्हापूर महापालिकेने कारवाईचा हा बडगा उगारला आहे खरा; मात्र अपुºया यंत्रणेमुळे तो कितपत यशस्वी होतो याबद्दल साशंकताच आहे. कारण २०१५ मध्येही अशी मोहीम महापालिकेने राबविली होती. त्यावेळी दंड होता ५०० रुपये. तो भरून मालक आपली जनावरे घेऊन जात होते आणि पुन्हा दुसºया दिवशी रस्त्यावर सोडत होते. त्यामुळे मोकाट जनावरांचा प्रश्न कमी न होता दिवसेंदिवस वाढतच राहिला आणि गंभीर बनला आहे.राज्यातही काही महापालिकांनी असे प्रयत्न केले आहेत. जनावरांना कोंडवाड्यात अथवा पांजरपोळात ठेवणे, दंड आकारणे हे उपाय योजले आहेत; मात्र त्यात कुणाला यश आल्याचे दिसत नाही. कोल्हापूर महापालिका मात्र अपुºया यंत्रणेवर का होईना यशस्वी होईल आणि राज्यापुढे आदर्श ठेवेल, हीच अपेक्षा.

टॅग्स :dogकुत्रा