शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

मोकाट जनावरांसाठी नामी मात्रा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 00:14 IST

कोल्हापुरातील मोकाट जनावरांना आळा घालण्याची तयारी महापालिकेने केली आहे. यात महापालिका यशस्वी होईल?

- चंद्रकांत कित्तुरेकोल्हापुरातील मोकाट जनावरांना आळा घालण्याची तयारी महापालिकेने केली आहे. यात महापालिका यशस्वी होईल?रस्त्यावरील मोकाट जनावरे ही प्रत्येक शहरातील समस्या आहे. या जनावरांना आवर घालण्यासाठी प्रत्येक नगरपालिका, महानगरपालिका प्रयत्न करीत असते. मात्र, ती काही रस्त्यांवरून हलत नाहीत. एखादवेळी वाहतूक पोलीस रस्त्यावरून बाजूला जातील; पण ही जनावरे मात्र आपणच या रस्त्याचे रखवालदार या आविर्भावात ठाण मांडून राहिलेली दिसतील. या जनावरांमुळे अनेक छोटेमोठे अपघात होतात. वाहतुकीची कोंडीही होते. यामुळे या जनावरांना आळा घालावा अशी मागणी सर्वच ठिकाणी होत असते. कोल्हापुरातही ती झाली. यावर महानगरपालिकेने नामी मात्रा शोधून काढली आहे. ती म्हणजे रस्त्यावरील मोकाट जनावरांना पकडून ती जप्त करावयाची आणि प्रत्येक जनावरामागे त्याच्या मालकाकडून पाच हजार रुपये दंड वसूल करावयाचा.कुत्रा हा सर्वाधिक इमानी मानला जात असला तरी कोणतेही जनावर मालकाला कधी विसरत नसते. याचाच फायदा पशुपालक घेतात. ग्रामीण भागात जनावरे चरायला सोडण्यासाठी भरपूर जागा असते. सिमेंटच्या जंगलांनी व्यापलेल्या शहरांमध्ये मात्र ती नसते. शिवाय चाऱ्याची उपलब्धताही कमी असते. परिणामी शहरांतील हुशार (?) पशुपालक आपली जनावरे रस्त्यांवर सोडतात. ती शहरातील चौकाचौकांत कळपाने फिरत असलेली दिसतात. यात विशेषत: गाई आणि बैलांचे प्रमाण अधिक आहे.याशिवाय गाढवे, डुकरेही आढळतात. मुख्य रस्त्यावर ठाण मांडणाºया या जनावरांमुळे अपघात होऊन आजवर अनेकजण जखमी झाले आहेत. हॉर्न वाजवूनही ती लवकर बाजूला जात नाहीत. काही वेळा वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक संथ होते. कोल्हापुरात अशी सुमारे तीन हजारांवर जनावरे असल्याचा अंदाज आहे. मात्र, महापालिकेकडे याची कोणतीही आकडेवारी नाही. या जनावरांना पकडून त्यांना ठेवायचे कुठे याचेही ठोस उत्तर नाही. गावाबाहेर सोडणे, गोशाळेत देणे, लगेच दंड आकारून मालकाच्या ताब्यात देणे अशा प्रकारे याची अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले जाते. प्रसंगी फौजदारीही करण्यात येणार आहे. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींमुळे कोल्हापूर महापालिकेने कारवाईचा हा बडगा उगारला आहे खरा; मात्र अपुºया यंत्रणेमुळे तो कितपत यशस्वी होतो याबद्दल साशंकताच आहे. कारण २०१५ मध्येही अशी मोहीम महापालिकेने राबविली होती. त्यावेळी दंड होता ५०० रुपये. तो भरून मालक आपली जनावरे घेऊन जात होते आणि पुन्हा दुसºया दिवशी रस्त्यावर सोडत होते. त्यामुळे मोकाट जनावरांचा प्रश्न कमी न होता दिवसेंदिवस वाढतच राहिला आणि गंभीर बनला आहे.राज्यातही काही महापालिकांनी असे प्रयत्न केले आहेत. जनावरांना कोंडवाड्यात अथवा पांजरपोळात ठेवणे, दंड आकारणे हे उपाय योजले आहेत; मात्र त्यात कुणाला यश आल्याचे दिसत नाही. कोल्हापूर महापालिका मात्र अपुºया यंत्रणेवर का होईना यशस्वी होईल आणि राज्यापुढे आदर्श ठेवेल, हीच अपेक्षा.

टॅग्स :dogकुत्रा