शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

सौहार्द, शांतता कुणाला खुपते आहे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 05:24 IST

अहमदनगर येथे कुरिअरमार्फत पाठविल्या जात असलेल्या रेडिओसदृश वस्तूचा स्फोट झाला. हा स्फोट ‘क्रूड’ बॉम्बचा होता हे निष्पन्न झाल्याने हा घातपाताचा कट होता हे लक्षात येते. सर्वात गंभीर बाब म्हणजे ही भेट ‘सरहद’ संस्थेचे संजय नहार यांच्या नावाने पाठविली जात होती.

- सुधीर लंकेअहमदनगर येथे कुरिअरमार्फत पाठविल्या जात असलेल्या रेडिओसदृश वस्तूचा स्फोट झाला. हा स्फोट ‘क्रूड’ बॉम्बचा होता हे निष्पन्न झाल्याने हा घातपाताचा कट होता हे लक्षात येते. सर्वात गंभीर बाब म्हणजे ही भेट ‘सरहद’ संस्थेचे संजय नहार यांच्या नावाने पाठविली जात होती. त्यामुळे हा त्यांच्याच घातपाताचा कट होता हा प्राथमिक निष्कर्ष निघतो. राज्यात नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे या सामाजिक कार्यकर्त्यांची हत्या झाली. त्या प्रकरणांचा उलगडा आपली पोलीस यंत्रणा अद्याप करु शकलेली नाही. या साखळीत आणखी कुणा कार्यकर्त्याचे अथवा सामान्य माणसाचेही नाव यावे हा राज्यावरील आणखी एक कलंक ठरेल.अगोदर पंजाब आणि त्यानंतर काश्मीरच्या शांततेसाठी आयुष्य वाहून घेतलेल्या संजय नहार यांच्यासाठी कुणी ‘बॉम्ब’ची भेट पाठवावी ही बाब अनाकलनीय व यातनादायीही आहे. जेव्हा सत्तर, ऐंशीच्या दशकात पंजाब खलिस्तानी चळवळीत हिंसाचाराने धगधगत होता तेव्हा नहार यांनी पंजाबच्या शांततेसाठी शांतिमार्च काढला. तेथे जाऊन तरुणांशी संवाद साधला. त्यांना राष्टÑवादासाठी प्रवृत्त केले. पंजाब शांत झाला, तेव्हा त्यांनी काश्मीरच्या शांततेसाठी प्रयत्न सुरु केले. त्यासाठीच ‘सरहद’ नावाची संस्था सुरू केली. काश्मीरच्या मुलांना व तरुणांना मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी ते सतत आग्रही आहेत. या मुलांना त्यांनी संपूर्ण देश दाखविला, शिकविले, पुनर्वसन केले. स्वत:च्या शाळेत दाखल करुन घेतले. देशातील पत्रकारांनाही काश्मीरच्या समस्या आवर्जून दाखविल्या. पुणे-काश्मीर फ्रेंडशीप, ‘हिंदू पंडित- काश्मिरी मुस्लीम’ असे फोरम तयार केले. महाराष्टÑ व पंजाब यांच्यात सांस्कृतिक आदानप्रदान वाढविणारे घुमान हे महत्त्वाचे केंद्र पंजाबमध्ये आहे. घुमान ही संत नामदेव यांची कर्मभूमी. तेथे ८८ वे मराठी साहित्य संमेलन व्हावे ही कल्पना व त्यासाठीचे परिश्रमही त्यांचेच.सौहार्द व शांततेसाठी नहार आग्रही असताना त्यांना ही स्फोटके कोण पाठवू इच्छिते आहे? नहार यांच्या नावाने हे जे कुरिअर जाणार होते ते अल्पसंख्यक समाजाच्या मुलीच्या नावाने आहे. अर्थात हे नाव बनावट असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या बनावट चेहऱ्यामागील खरा चेहरा कुणाचा आहे?पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने हाताळायला हवे. घटनेनंतर पोलिसांनी या मुलीच्या नावासह स्फोटकांसोबत लिहिलेल्या चिठ्ठीतील मजकूर माध्यमांसाठी खुला केला. वास्तविकत: अशा घटनांत सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी काही पथ्ये पाळायची असतात. जे नावच बनावट आहे ते उघड करण्याची पोलिसांनीही इतकी घाई का केली? कारण त्यातून लगेचच घटनांना जात, धर्माचे कंगोरे प्राप्त होतात. नगर शहरही या घटनेमुळे चर्चेत आले आहे. घातपाती कारवायांचे मूळ नगरपर्यंत कसे पोहोचले? याला काही राजकीय संदर्भ आहेत का? ही कृती करणाºयाला पुणे अशांत करायचे होते की नगर? अशा अनेक प्रश्नांची मालिका या घटनेने निर्र्माण केली आहे. पोलीस मुळापर्यंत पोहोचून काय सत्य उजेडात आणणार याची राज्याला प्रतीक्षा राहील.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर