शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्याअभावी अनुभव नाही, त्यामुळे नोकरी नाही हे बदला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 12:28 IST

राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत उच्चस्तरीय ५०० कंपन्यांमध्ये एक कोटी तरुणांना प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू करून घेण्याची योजना आहे. यातून काय साधू शकेल?

डॉ. सुनील कुटे, अधिष्ठाता, क. का. वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्था, नाशिक - 

कोणत्याही देशाचा विकास केवळ रस्ते, पूल, फ्लायओव्हर, रेल्वे, विमानतळ, पाणी व सांडपाणी व्यवस्था आणि भव्य टोलेजंग इमारती बांधून होत नसतो. देशातील मनुष्यबळात किती गुंतवणूक केली आणि या मनुष्यबळाची कार्यक्षमता किती प्रभावीपणे वापरली जाते, यावर देशाचे भविष्य अवलंबून असते. ज्यांच्यावर देशाचे भवितव्य ठरविण्याची जबाबदारी आहे त्या युवकांवर किती गुंतवणूक केली, यावर देशाचा शाश्वत व दीर्घकालीन विकास अवलंबून आहे.  यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात यादृष्टीने युवकांसाठी अनेक आशादायक योजना प्रस्तावित आहेत. या योजनांची अंमलबजावणी किती प्रभावीपणे केली जाते व ज्यांच्यासाठी या योजना आखल्या आहेत ते युवक किती समर्थपणे त्यांचा लाभ घेतील त्यावर या योजनांचे यश अवलंबून आहे.यंदाच्या अर्थसंकल्पात ४.१ कोटी युवकांसाठी अनेक योजनांद्वारे दोन लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. शिक्षण, रोजगारनिर्मिती, कौशल्य प्रशिक्षण व लहान व्यवसायांना प्रोत्साहन यासाठी १.४८ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हल्ली कौशल्य नसल्याने अनुभव नाही व अनुभव नसल्याने नोकरी नाही या चक्रात युवक अडकले आहेत. देशव्यापी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमामुळे ही परिस्थिती बदलण्यास मदत होईल. राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत देशातील उच्चस्तरीय ५०० कंपन्यांमध्ये एक कोटी तरुणांना प्रशिक्षणार्थी म्हणून काम करता करता शिकण्याची संधी मिळणार आहे. बारा महिने कंपनीत प्रशिक्षणाचा अनुभव घेत असताना युवकांना दरमहा पाच हजार रुपये व वार्षिक एकरकमी साठ हजार रुपये देण्यात येणार आहेत. यातील दहा टक्के खर्च कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (C.S.R.) करण्यात येणार आहे. ही योजना आकर्षक आहे; पण तिची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. प्रत्येक कंपनी उत्पादन व नफा या घटकांसाठी काम करीत असते. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे हा काही कंपनीचा अजेंडा नसतो. उलट अशा प्रकारचे प्रशिक्षण मोठ्या संख्येच्या विद्यार्थ्यांना देणे हा त्यांच्या रोजच्या कामकाजात अडथळा मानला जातो. कंपन्यांना या मानसिकतेतून बाहेर पडून आज प्रशिक्षण दिलेले युवक हे कंपनीचे उद्याचे कुशल मनुष्यबळ आहे या नजरेने त्यांच्याकडे पाहावे लागेल. याउलट विद्यार्थ्यांना देखील अशा प्रशिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. हल्ली अशाप्रकारचे प्रशिक्षण म्हणजे घरी राहून मौजमजा करण्याची संधी आहे असे मानले जाते. ओळखीच्यांकडून अथवा नातेवाइकांकडून प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्याची औपचारिकता पूर्ण केली जाते. यात मुख्य हेतूलाच हरताळ फासला जातो. बहुसंख्य विद्यार्थ्यांना कोविडनंतरच्या काळात शिकण्याची मुळापासून इच्छाच राहिलेली नाही. अनेक विद्यार्थ्यांना अकरावी व बारावीत महाविद्यालयात जावे लागते हेच माहीत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती प्रचंड प्रमाणावर घटली आहे. ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य असतानाही ती नसलेल्यांवर बिनदिक्कतपणे करदात्यांच्या पैशातून शिष्यवृत्तीची खैरात केली जाते. यामुळे निर्माण झालेल्या ऐतखाऊ मानसिकतेमुळे कौशल्य प्रशिक्षणासाठी कंपनीमध्ये जाऊन तेथील ८-१० तासांच्या कार्यसंस्कृतीत युवकांना स्वतःला सामावून घ्यावे लागेल. तेथील प्रशिक्षण केवळ औपचारिकता म्हणून नव्हे तर पुढील नोकरीची संधी म्हणून गांभीर्याने घ्यावे लागेल. विशेषतः ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ओढा प्रशिक्षण काळात घरी जाऊन शेतीला मदत करण्याचा व इकडून-तिकडून प्रमाणपत्र मिळविण्याच्या औपचारिकतेचा असतो. ही मानसिकता बदलली नाही तर ४०१ कोटी तरुणांचे प्रशिक्षण व त्यासाठीचा खर्च कागदावरच राहील. अशा तरुणांच्या प्रशिक्षणासाठी कंपनीला तिच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून १० टक्के खर्च करावा लागणार आहे. कंपन्या हा खर्च खरोखरच सामाजिक उत्तरदायित्व म्हणून करणार, की सरकारी बंधन म्हणून पळवाटा शोधणार हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.  मागील भूतकाळात शाळांमध्ये खोटे विद्यार्थी दाखवून अनुदान उकळण्याचा ‘पटपडताळणी घोटाळा’ कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणात घडू नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. एकूणच सरकारी बंधन म्हणून कंपन्यांनी व फुकटात महिन्याला पाच हजार मिळणार आहेत या नजरेने विद्यार्थ्यांनी या योजनेकडे न पाहता एक संधी म्हणून पाहिले तर या योजना यशस्वी होतील. (पूर्वार्ध)    sunilkute 66@gmail.com.

टॅग्स :Studentविद्यार्थीEmployeeकर्मचारी