शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

NO राडा ! सोलापूरला संकटातून दूर काढा..

By सचिन जवळकोटे | Updated: July 12, 2020 06:41 IST

लगाव बत्ती...

- सचिन जवळकोटे

भरचौकात पोलीस अधिकाºयाला हातवारे करत जोरजोरात जाब विचारणाºया एका राजकीय नेत्याचं वागणं जेवढं चिंताजनक होतं, तेवढंच सर्वांसमक्ष कॉलर पकडून त्याला रस्त्यावर लोळविणाºया एका हवालदाराचं रांगडं कृत्यही खेदजनक होतं. एकेकाळी सोलापूरच्या दोन नंबर धंद्यांमध्ये  हातात हात घालून भरघोस वाटा उचलणारी ही ‘खादी’ अन् ‘खाकी’ अशी चवताळून एकमेकांवर चालली म्हटल्यावर तमाम सोलापूरकरांनाही उगाचंच गोंधळून जायला होतं. ‘खाकी व्हर्सेस खादी’च्या राड्यात गुर्मी कुणाची अन् मस्ती कुणाची.. अशा प्रश्नांचं भूत डोळ्यांसमोर उभं ठाकून नाचायला लागतं.

साहेबां’समोर मर्दुमकी..

 सोलापुरात रोज शेकडो ‘डबलसीट’वाल्यांवर कारवाई केली जातेय, हे माहीत असूनही अनेक जण आपल्या गाड्या दामटताहेत. पद्मशाली चौकातल्या ‘कारमपुरीं’च्या लाडक्या लेकरालाही अशीच डबलसीट जाण्याची अवदसा सुचली. पार्क स्टेडियमजवळ ते लेकरू नेमकं पोलिसांच्या तावडीत सापडलं. मात्र गुपचूप दंड भरून पुढं जाण्याऐवजी त्याच्या अंगातलं ‘पुढाºयाचं पोर’ जागं झालं. वाद घालू लागल्यानंतर थेट पोलिसांच्या व्हॅनमध्येच त्याची रवानगी केली गेली. हे कळाल्यानंतर पूर्व भागातल्या कामगारांचे कनवाळू ‘पिता’मह थेट चौकात आले. ‘डबलसीट’च्या केसमधून कर्तृत्ववान सुपुत्राला सोडविण्यासाठी तेही चक्क ‘डबलसीट’च आले. त्यानंतर जे काही घडलं, ते साºया जगानं व्हायरल व्हिडिओमधून पाहिलं.

  फौजदार चावडीच्या ‘कडक पाटलां’ना जोरजोरात बोलणाºया या नेत्याला कदाचित त्यांच्या कामाची स्टाईल माहीत नसावी. मात्र हवालदाराला तर हे ‘पावतीछाप महाराज’ पूर्णपणे ठाऊक होते. तरीही त्यांचं बकोटं पकडून आपल्या ‘साहेबां’समोर मोठी मर्दुमकी गाजवली. आपण आपल्या ‘बॉस’सोबत किती प्रामाणिक आहोत, हे दाखवल्याबद्दल नंतर कदाचित ‘बक्षिसी’ मिळेल. ‘खुशी’ही मिळेल. मात्र या विचित्र वागण्यापायी अख्ख्या ‘खाकी’ची विश्वासार्हता या पठ्ठ्यानं ‘सोशल मीडिया’वर टांगली, त्याचं काय ?  एकीकडं भरचौकात या ‘खाकी’चा नको तेवढा अति उत्साह नडला; मात्र दुसरीकडं ही ‘खादी’ तर कुठं साव होती ? स्वत:ला ‘महाराज’ म्हणवूून घेत कपाळावर गंध बडवून अशिक्षित कामगारांमध्ये फिरणाºया या नेत्याविरुद्ध आजपावेतो १५ ते २० पेक्षांही जास्त गुन्हे दाखल. यातली कितीतरी कलमं खूपच ‘नाजूक’ अन् ‘गंभीर’.. तरीही ‘खाकी’समोर हातांचा थयथयाट करणाºया या मुजोर ‘खादी’मध्ये एवढी गुर्मी आलीच कुठून ?  आपल्या पक्षाचा ‘सीएम’ म्हणून कसंही वागलं तरी चालतंय, या बालिश भ्रमात भरचौकात स्वत:चं अंग मोकळं करून घेणारा हा ‘महाराज’ शेवटी न्याय मागण्यासाठी तरी कुणाकडं गेला म्हणता ?.. तर ‘घड्याळ’वाल्या ‘मामा इंदापूरकरां’कडं. खरंतर अजूनही सोलापुरात चाचपडत फिरताहेत बिचारे ‘दत्तामामा’च. त्यांना सोलापूरकरांची नस सापडायला जाऊ द्यावे लागतील किमान सहा महिने. इथल्या पाण्याची चवही ओळखायला करावे लागतील अजून काही दौरे. तसंच सोलापुरात ‘खादी’ अन् ‘खाकी’ची भांडणं होतातच कशी, याचा शोध घेण्यासाठीही त्यांना डोकावून पाहावं लागेल तीन दशकं मागं इतिहासात.

खाकी’ अन् ‘खादी’ची नको तेवढी जवळीक..

 गेल्या तीन-चार दशकांत ‘मंथली’ला चटावलेल्या ‘खाकी’ची दोस्ती ‘खादी’शी जमलेली. नको तेवढी जवळीक वाढत गेलेली. यामुळेच  शहराच्या विकासासाठी लोकांनी निवडून दिलेली ‘मेंबर’ मंडळी आपल्या कार्यकर्त्यांची नसती लफडी सोडवण्यासाठीच पोलीस ठाण्यात पडिक दिसू लागलेली. ‘जगा अन् जगू द्या’च्या धर्तीवर ‘खा अन् खाऊ द्या’चा ‘सोलापुरी मंत्र’ही अनेक अधिकाºयांच्या पचनी पडलेला. यातूनच एकेकाळी ‘जेलरोड’च्या ‘पोस्टिंग’चा ‘रेट’ अख्ख्या महाराष्ट्रात टॉप फाईव्हमध्ये पोहोचलेला.

 या ‘अभद्र युती’तून काही अधिकाºयांच्या बंगल्यांवर मजले चढत गेले असले तरी ‘खाकी’चा दरारा मात्र या खादीमुळं पुरता झाकोळून गेला होता. ‘शहीद कामटें’पासून ‘उपाध्यायां’पर्यंत अनेक कर्तव्यदक्ष आयुक्तांनी सोलापूरच्या ‘खाकीची प्रतिष्ठा’ उंचावण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात तो यशस्वीही ठरला. सध्याचे ‘शिंदे’ सरकारही अशा ‘तोडपाणी’ बहाद्दरांवर ‘अंकुश’ ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करताहेत. त्यांना सोलापूरकरांचीही साथ नक्कीच मिळेल. मात्र भरचौकात विनाकारण ‘फुकटची फौजदारी’ करणाºया त्यांच्या अतिउत्साही सहकाºयांनीही यापुढं किमान सार्वजनिक ठिकाणी तरी संयम दाखविणं गरजेचं. तसंच घरदार विसरून रस्त्यावर ड्यूटी बजावणाºया या ‘खाकी वॉरियर्स’ची शान जपणंही जनतेसाठी महत्त्वाचं.

सोलापूरकरांच्या आत्मसन्मानाला ठेच नको..

 सुमारे १९९३-९४ ची एक आठवण. सोलापुरात नुकतंच आयुक्तालय सुरू झालेलं. डायरेक्ट पोस्टिंगवर आलेल्या एका नव्या ‘डीसीपीं’च्या तरुण रक्तात आक्रमकता सळसळू लागलेली. सात रस्त्याजवळ त्यांच्या गाडीला पाठीमागून ठोकर बसली म्हणून ते तावातावात एका उद्योजकाच्या चालकाला मारण्यासाठी धावलेले. तेव्हा ‘लोकमत’नं ‘खाकी वर्दीतली गुंडगिरी’ नावाची आक्रमक मालिका बरेच दिवस चालविलेली. गाजविलेलीही. सोलापूरकरांनीही त्यावेळी आपल्या तीव्र भावना व्यक्त केलेल्या. संतप्त जनता रस्त्यावर उतरलेली. मग काय.. अखेर त्या अधिकाºयाला ‘सिद्धेश्वर एक्सप्रेस’चं रिटर्न तिकीट काढावं लागलेलं. असो. आताही पुन्हा ‘खाकी’नं सर्वसामान्य सोलापूरकरांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवू नये, हीच जनतेची प्रामाणिक इच्छा.. कारण सोलापूरकर जेवढे शांत; तेवढेच सटकले तर ‘गये काम से’..  लगाव बत्ती.

( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिसPoliticsराजकारण