शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आत्मनिर्भर बनताना अडथळे नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 13:10 IST

मिलिंद कुलकर्णी कोरोनामुळे देशव्यापी लॉकडाऊनला चार महिने उलटले. मिशन बिगेनिंग, पुनश्च हरिओम या नावाने अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्याची घोषणा ...

मिलिंद कुलकर्णीकोरोनामुळे देशव्यापी लॉकडाऊनला चार महिने उलटले. मिशन बिगेनिंग, पुनश्च हरिओम या नावाने अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्याची घोषणा करुन पावणे दोन महिने उलटले असले तरी केंद्र, राज्य सरकार व स्थानिक प्रशासन अशा तिन्ही पातळीवर मोठा सावळागोंधळ दिसून येत आहे. रेल्वे, एस.टी. सेवा जोवर सुरु होत नाही, तोवर जीवनवाहिनी सुरु झाली असे म्हणता येणार नाही. उद्योग-व्यापार सुरु करण्याला परवानगी दिलेली असली तरी बंधने खूप आहेत. मुख्य म्हणजे, स्थानिक पातळीवर जाहीर होणारे लॉकडाऊन, जनता कर्फ्यूमुळे नियमित जनजीवनाला खीळ बसत आहे.

कोरोनाशी लढण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच जनजीवन पूर्वपदावर आणण्याची नितांत आवश्यकता आहे. आता चार महिन्यांनंतर जे चित्र निर्माण झाले आहे, ते अधिक गोंधळाचे आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरु करताना केंद्र सरकारने दिशानिर्देश जारी केले, आणि उर्वरित गोष्टी राज्य सरकारवर सोपवल्या. राज्य सरकारने त्याच दिशानिर्देशांबर हुकूम काम करीत स्थानिक पातळीवर काही अधिकार दिले. कोरोनाचे रुग्ण वाढू लागले की, जिल्हा प्रशासन ‘लॉकडाऊन’ हा एकमेव रामबाण उपाय असल्याचे मानत आहे. जळगावात नुकताच आठवड्याचा लॉकडाऊन आटोपला, आता नंदुरबारच्या चार शहरांमध्ये आठवड्याचा लॉक डाऊन सुरु झाला आहे. धुळ्यातही ‘जनता कर्फ्यू’ सुरु होत आहे. यातून काय साधले जात आहे, याचा कोणताही आढावा घेतला नाही.

लॉकडाऊनच्या काळाचा सदुपयोग पालिका व आरोग्य प्रशासन करीत असेल तर असेही काही चित्र नाही. जळगावात घरोघर जाऊन आरोग्य तपासणी व सर्वेक्षण करण्याची घोषणा करण्यात आली. त्यासाठी सामाजिक व स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याचा निर्णय झाला. मात्र बैठकीला उपस्थित राहून जिल्हाधिकाऱ्यांसमोर होकार देणाºया संस्था प्रत्यक्ष मैदानात उरतल्याच नाही. त्यामुळे किती नागरिकांचे सर्वेक्षण झाले, याची घोषणा अद्याप महापालिका प्रशासन करु शकलेले नाही. या काळात निर्जंतुकीकरण, कचरा उचलणे अशी कामेदेखील झालेली नाहीत. त्यामुळे नागरिकांना केवळ घरात कोंडणे हा हेतू लॉकडाऊनचा असेल तर तो फारसा सफल होणार नाही. चार महिने घरात अडकून पडलेल्या नागरिकांना आता थोपवून धरणे अवघड आणि अशक्य आहे. त्याचा प्रत्यय लॉकडाऊन आणि जनता कर्फ्यू लावलेल्या शहरांमध्ये दिसून येत आहे.

लॉकडाऊन किंवा जनता कर्फ्यू लागू करताना प्रशासनाकडून जे कारण दिले जाते, ते तरी साध्य होत आहे काय, याचाही अभ्यास व्हायला हवा. कोरोनाची साखळी तोडायचे कारण सांगितले जाते. जळगाव जिल्ह्याचे उदाहरण घेऊया. ७ ते १४ जुलै असा आठवड्याचा लॉकडाऊन होता. या ७ दिवसांपैकी केवळ एक दिवस १५० पर्यंत रुग्णसंख्या होती. ४ दिवस २०० च्या वर तर दोन दिवस २५० च्या वर रुग्णसंख्या होती. लॉकडाऊन संपल्यानंतर १५ ते २१ जुलैची रुग्णसंख्या पाहिली तर केवळ एक दिवस बाधित रुग्णांची संख्या १७५ पर्यंत नोंदवली गेली. ३ दिवस २०० तर उर्वरित ३ दिवस ३०० रुग्णसंख्या होती. याचा अर्थ लॉकडाऊन काळात एकूण रुग्णसंख्या १५८२ होती तर लॉकडाऊन नंतरच्या आठवड्यात ती १७९४ झाली. लॉकडाऊनचा हेतू कितपत साध्य झाला, हा संशोधनाचा विषय ठरावा.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे रोजगाराच्यादृष्टीने आत्मनिर्भर, रोजगार योजना अशा घोषणा करीत आहेत. प्रशासकीय पातळीवर त्याची अंमलबजावणी किती होते, हे बघायला हवे. मुळात शासकीय कार्यालयांमध्ये ठराविक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे बंधन आहे. त्यामुळे हे प्रस्ताव कार्यालयात गेले तरी मनुष्यबळाअभावी ते कधी मंजूर होतील? झाले तर बँका सहजगत्या कर्ज देतील काय? शेतकºयांच्या पीककर्जाचा अनुभव जमेला धरता, फार आशा करता येणार नाही. चार महिन्यांच्या काळात रोजगार गमावलेल्या तरुणांनी भाजीपाला, रेडीमेड कपडे विक्री, सॅनिटायझेशन युनिट विक्री असे उद्योग सुरु केले आहेत. प्रयत्न चांगला आहे. पण रस्त्यांवर विक्री केल्यास पालिकेची आडकाठी असते. वाहतुकीच्यादृष्टीने ते चुकीचे असले तरी ग्राहकांच्या सुविधेच्यादृष्टीने मोकळ्या जागा देऊन या विक्रेत्यांना बसविता येऊ शकते. पण अतिक्रमण निर्मूलनचे भूत स्वार झालेल्या पालिका अधिकाºयांना माणुसकी, लॉकडाऊनचे भान ठेवावे असे सांगण्याची गरज आहे. गर्दी टाळण्याचा उद्देश असला तरी रोजगारावर गदा येणार नाही, हे सुध्दा बघायला हवे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव