शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
3
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
4
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
5
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
6
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
7
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
8
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
9
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
10
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
11
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
12
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
13
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
14
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
15
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
16
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
17
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
18
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
19
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
20
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी

पब, बारवरील कारवाईतून ‘वसुली’ वाढ नको; विधानसभा निवडणुकीपूर्वीचा स्टंट ठरू नये

By संदीप प्रधान | Updated: July 1, 2024 06:57 IST

इतकी वर्षे हेच बार बेकायदा शेडखाली ग्राहकांना बसवून अव्याहत  सुरू होते. त्यावेळी ते महापालिका, उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना दिसले नाही

पुण्यामध्ये एका बिल्डरच्या मुलाने दारू पिऊन दोन जणांचा बळी घेतल्यावर तेथील पबवर हातोडा पडला. विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात तरुण-तरुणी ड्रग्सचे सेवन करताना दिसल्यावर कारवाईची तीव्रता प्रचंड वाढली. महाराष्ट्रात मुंबई ठाण्यातही आता कारवाई सुरू झाली आहे. हॉटेल, बार, पब चालवणारे हे समाजातील शक्तिशाली लोक असतात. अनेकांचे राजकीय लागेबांधे असतात. काही बार व पबमध्ये राजकीय नेते आणि सरकारी अधिकारी यांची छुपी पार्टनरशिपही असते. त्यामुळे सरकारने सुरू केलेल्या कारवाईमध्ये सातत्य असले पाहिजे. जर सातत्य राहिले नाही तर कारवाई काही दिवसानंतर थंडावेल आणि महापालिका, पोलिस, उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची वसुली मात्र वाढेल, अशी भीती आहे. 

कदाचित पुण्यातील बारवर कारवाई तीव्र केली तर त्यातून अजित पवार गट नाराज होईल, अशी भीती महायुतीच्या नेत्यांना वाटली असू शकते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वतःच्या ठाणे जिल्ह्यातच त्यांनी कारवाई सुरू केली. कुठल्याही गोष्टीची सुरूवात घरापासून करावी या मुख्यमंत्र्यांच्या कृतीचे स्वागतच आहे. मात्र कारवाईमध्ये पक्षपात होता कामा नये. ठाण्यातील कोठारी कंपाउंड किंवा कल्याण डोंबिवलीतील कल्याण शीळ रस्त्यावरील मानपाडा पोलिस ठाण्यातील ‘बार रोड’ अशी ओळख असलेल्या मार्गावरील रांगेने उभ्या असलेल्या ४५ बारवर पण कारवाई झाली पाहिजे. अन्यथा काही निवडक बारवर आणि पबवर ही कारवाई होते, असा विनाकारण आरोप करण्याची संधी विरोधक व बारमालकांना मिळू शकते. 

महाराष्ट्राचे राज्य उत्पादन शुल्क खात्याचे उत्पन्न हे २३ हजार कोटींच्या पेक्षा जास्त आहे. देशात जीएसटी लागू झाल्यापासून राज्य सरकारे केंद्र सरकारच्या मेहरबानीवर अवलंबून आहेत. जीएसटीचा हप्ता केंद्र सरकार जेव्हा देईल तेव्हाच राज्यांना आर्थिक बळ प्राप्त होते, ही परिस्थिती लक्षात घेता मद्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नावरील अवलंबित्व वाढले आहे. त्याच वेळी ख्यातनाम समाजसेवक अभय बंग यांच्यासारखे समाजसेवक हे राज्याचे मद्य धोरण जाहीर करण्याचा आग्रह धरत आहेत. दारू विक्रीचे देशातील प्रमाण १९८० साली १९ टक्के होते. आता देशातील दारू सेवनाचे प्रमाण हे ५१ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. तरुणाईतील वाढती मद्यलालसा हीच बार व्यावसायिकांची शक्ती आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली की, ते वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणण्याचा प्रयत्न करणार. कदाचित न्यायालय या कारवाईला आव्हान दिले जाऊ शकते. कारवाईत पक्षपात होत असल्याचे दाखवून देण्यात बार चालक यशस्वी झाले तर सगळे मुसळ केरात जाईल.

एक वस्तुस्थिती नाकारता येत नाही की, इतकी वर्षे हेच बार बेकायदा शेडखाली ग्राहकांना बसवून अव्याहत  सुरू होते. त्यावेळी ते महापालिका, उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना दिसले नाही. पुण्याचे प्रकरण घडले नसते तर कदाचित ही कारवाई झाली नसती. त्यामुळे ही कारवाई हा केवळ विधानसभा निवडणुकीपूर्वीचा स्टंट ठरू नये. त्यामध्ये सातत्य राखणे ही सरकारची जबाबदारी आहे.